शहरं
Join us  
Trending Stories
1
२० वर्षांनी राज ठाकरे घरी गेले, सक्रीय होताच संजय राऊतांना भेटले; अर्धा तास चर्चा, काय घडले?
2
"हे लोक अणुबॉम्बला एवढे घाबरत नाहीत, जेवढे...!" जमीयत उलेमा-ए-हिंदचे अध्यक्ष अरशद मदनी यांचं विधान
3
दिल्ली पोटनिवडणुकीत भाजपाला धक्का, काँग्रेसने खाते उघडले; आम आदमी पक्षाचे काय झाले?
4
शतकातील सर्वात दीर्घ सूर्यग्रहण, ६ मिनिटे २३ सेकंदांपर्यंत पसरेल अंधकार, कोणकोणत्या देशांत दिसणार? भारतात कुठे-कुठे दिसणार? जाणून घ्या
5
इंडिगोच्या ७० हून अधिक विमानांचे उड्डाण रद्द! क्रूच्या कमतरतेमुळे मुंबई, पुणे, नागपूरसह देशभरातील हजारो प्रवासी हैराण
6
'मी खोटे काम केलं नाही!' छत्रपती संभाजीनगरची बोगस 'IAS' कल्पना भागवत अखेर 'बोलली'...
7
₹६७००००० चं टॉयलेट, ₹७६००० चा ब्रश अन्... किती श्रीमंत आहेत रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन? रहस्यमय आहे संपत्ती!
8
MS धोनीचा लाडका, वर्ल्डकपही खेळला; पण नंतर १० वर्ष संघाबाहेर बसला... अखेर क्रिकेटला रामराम
9
पुतिन यांच्या भारत दौऱ्यामुळे शेअर बाजारात खळबळ, 'हे' शेअर्स फोकसमध्ये राहणार...
10
Team India's New Jersey For T20 World Cup 2026: रोहितनं दाखवली टीम इंडियाची नवी जर्सी; कॉलरवरील तिरंगा चर्चेत!
11
मोठी बातमी! बिजापूरमध्ये भीषण चकमक; 7 नक्षलवादी ठार, तर 2 जवान शहीद
12
सायको काकी! सुंदर मुलांचा काटा काढायची अन् पार्टी करायची, स्वत:च्या मुलालाही सोडलं नाही
13
India's Squad For T20I vs SA: टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा! हार्दिक पांड्यासह गिलचं कमबॅक!
14
एलॉन मस्कची धडकी भरवणारी भविष्यवाणी, म्हणाला- येत्या काळात महायुद्ध अटळ! २०३० पर्यंत...
15
हाहाकार! जमिनीतून अचानक विषारी गॅस बाहेर पडू लागला; धनबादमध्ये मुलाचा मृत्यू, शेकडो पक्षी दगावले
16
फोनचा पासवर्ड विसरलात? सर्व्हिस सेंटरला जायची गरज नाही; 'अशा' प्रकारे ५ मिनिटांत घरबसल्या करू शकता अनलॉक!
17
गुरुनिष्ठेचा आदर्श, रामदास स्वामींचे दर्शन; संप्रदायाचा समर्थ प्रचार करणारे श्रीधर स्वामी!
18
चमत्कार! कडाक्याच्या थंडीत निर्दयी आईने रस्त्यावर फेकलं, भटक्या कुत्र्यांनी नवजात बाळाला वाचवलं
19
"भारताचे तुकडे झाले, तरच...!"; बांगलादेशच्या माजी लष्करी अधिकाऱ्याचे विषारी फुत्कार, कोण आहेत अब्दुल्लाहिल अमान आजमी?
20
Virat Kohli Century : किंग कोहलीचा 'शतकी रोमान्स'! रायपूरच्या मैदानातही विक्रमांची 'बरसात'
Daily Top 2Weekly Top 5

कृषिमंत्र्यांच्या जिल्ह्यातील शेतकरी पीक कर्जापासून वंचित!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2019 13:29 IST

सलग दुष्काळ, नापिकी यामुळे गंभीर आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मदतीचा हात देणारा खरीप कर्ज वितरण हंगाम बँकांनी अवघ्या ३२ टक्क्यांवर गुंडाळून टाकला.

ठळक मुद्दे३२ टक्क्यांवर गुंडाळला खरीप हंगाम११४५ कोटींचे कर्जवाटप झालेच नाही

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : सलग दुष्काळ, नापिकी यामुळे गंभीर आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मदतीचा हात देणारा खरीप कर्ज वितरण हंगाम बँकांनी अवघ्या ३२ टक्क्यांवर गुंडाळून टाकला. शेतकऱ्यांना पीक कर्जापासून वंचित ठेवणारी, शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ चोळणारी ही विदारक स्थिती राज्याचे कृषिमंत्री अनिल बोंडे यांच्या जिल्ह्यातील आहे.यंदाच्या हंगामात बँकांना १६८५ कोटी रुपयांचे लक्ष्यांक देण्यात आले होते. त्यापैकी अवघे ५४२ कोटी ८८ लाख रुपयांचे कर्जवाटप करण्यात आले. १,१४५ कोटींचे कर्जवाटप बँकांनी केलचे नाही. शेतकऱ्यांना मदत न करण्याच्या या भूमिकेबाबत बँकांना राज्याचे कृषिमंत्री तथा अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल बोंडे यांनी ना जाब विचारला, ना कारवाईचे आदेश दिले.अटी-शर्तींच्या जाचक अटींमुळे हजारो शेतकरी कर्जमाफीपासून वंचित आहेत. नापिकी कायम आहे. शेतकरी आत्महत्यांचा सिलसिला सुरूच आहे. अशा स्थितीत आवर्जून मदत करण्याऐवजी बँकांनी कर्जवाटपात हात आखडता घेतल्याने शेतकऱ्यांसमोरील मार्गच बंद करण्यात आले आहेत. मुळात कर्जवाटपाची प्रक्रिया उशिरा म्हणजे जूनअखेर आरंभली गेली. ऑगस्टअखेर ती थांबविली गेली. यंदाच्या खरिपासाठी जिल्ह्यातील बँकांना १,६८,५०० शेतकरी खातेदारांना १,६८५ कोटींच्या कर्जवाटपाचे लक्ष्यांक असताना सद्यस्थितीत ४९,०६६ शेतकऱ्यांना ५४२ कोटी ८८ लाखांचे कर्जवाटप केले आहे. यामध्ये सर्वाधिक शेतकरी खातेदार असलेल्या जिल्हा बँकेनेदेखील शेतकऱ्यांची निराशा केली. या बँकेला ९२ हजार शेतकऱ्यांना ५३० कोटींच्या कर्जवाटपाचे लक्ष्यांक असताना, २१,३८० शेतकऱ्यांना १६६.५३ कोटींचे कर्जवाटप केले. ही टक्केवारी ३१ इतकी आहे. राष्ट्रीयीकृत बँकांच्या १,६६,५५७ सभासदांना ११४०.५० कोटींच्या कर्जवाटपाचे लक्ष्यांक असताना २७,२२५ शेतकऱ्यांना ३७१.३२ कोटींचे कर्जवाटप केले. ही टक्केवारी ३३ आहे. ग्रामीण बँकांना २,००० शेतकऱ्यांना १४.५० कोटींच्या कर्जवाटपाचे लक्ष्यांक असताना, ४६१ शेतकऱ्यांना ५.०२ कोटींचे कर्जवाटप केले. ही टक्केवारी ३५ आहे.साप्ताहिक बैठकीचा फार्सकर्जवाटपाचा टक्का वाढावा, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली दर आठवड्याच्या मंगळवारी पीक आढावा बैठक घेण्यात आली. मात्र, कर्जवाटपाचा टक्का अखेरपर्यंत वाढलाच नाही. पालकमंत्री अनिल बोंडे अन् जिल्हाधिकारी शैलेश नवाल केवळ इशारे देत राहिले. कारवाई करण्याचे धाडस कुणीच दाखविलेच नाही. त्यामुळेच बँकांचे फावले. कर्जवाटपाचा टक्का माघारला अन् साप्ताहिक बैठकी दिशाभूल करणाऱ्या  ठरल्या. गावनिहाय मेळावे आदी प्रकार केवळ फार्स ठरले आहेत.हंगामअखेर बँकनिहाय कर्जवाटपअलाहाबाद बँकद्वारे २.६७ कोटी, आंध्रा बँक १.१३ कोटी, बँक ऑफ बडोदा ३.२५ कोटी, बँक ऑफ इंडिया ९.४४ कोटी, बँक ऑफ महाराष्ट्र ६७.९७ कोटी, कॅनरा बँक ३.९६ कोटी, सेंट्रल बँक ऑफ इंडिया ६७.९६ कोटी, कार्पोरेशन बँक १७ लाख, देना बँक १०.३२ कोटी, आयडीबीआय २.८५ कोटी, इंडियन बँक ४.५१ कोटी, इंडियन ओव्हरसीज बँक ३.४९ कोटी, पंजाब नॅशनल बँक ३.७२ कोटी, एसबीआय १३८.८५ कोटी, सिंडिकेट बँक ११ लाख, युको बँक २.१३ कोटी, युनियन बँक ऑफ इंडिया १४.८३ कोटी, विजया बँक ११ लाख, अ‍ॅक्सीस बँक ३.९३ कोटी, एचडीएफसी २१.०३ कोटी, आयसीआयसीआय १०.८५ कोटी, रत्नाकर बँक ४० लाख व विदर्भ कोकण ग्रामीण बँकद्वारे ५.०२ कोटींचे वाटप करण्यात आले.त्या कारवाईची आजही चर्चातत्कालीन जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांची पीक कर्जाबाबतची दक्षता परिणामकारक होती. वारंवार दिलेल्या तंबीला न जुमानणाऱ्या बँकांची जिल्हाधिकारी कार्यालयातील सात बँक खाती एका झटक्यात त्यांनी बंद करवून या मुजोर बँकांना वठणीवर आणले होते. आता खुद्द कृषिमंत्रीच पालकमंत्री असताना शेतकरी नागावला जात असताना त्या कारवाईची अनेकांना आवर्जून आठवण येते.लक्ष्यांक हा सात लाख हेक्टरसाठी नाबार्डने दिलेला आहे. प्रत्यक्षात सर्वच शेतकरी पीककर्ज घेत नाहीत, त्यामुळे झालेले वाटप जवळपास ८० टक्के म्हणता येईल. अनेक शेतकऱ्यांनी कर्जाचे पुनर्गठन केलेले नाही, काही बँकांनी प्रामुख्याने जिल्हा बँकेने शेतकऱ्यांना सहकार्य केलेले नाही.अनिल बोंडे, कृषिमंत्री

टॅग्स :agricultureशेती