शहरं
Join us  
Trending Stories
1
‘आनंदाचा शिधा’वर पुन्हा गदा! आर्थिक चणचणीमुळे योजनेसाठी निधीच नाही; गरिबांची दिवाळी फराळाविना
2
मोठी बातमी! राज्यातील २४७ नगरपालिका, १४७ नगरपंचायतींसाठी आरक्षण जाहीर; कोण मिळवणार सत्तेची खुर्ची?
3
“मनोज जरांगेंना आता देव झाल्यासारखे वाटतेय, काही झाले तर चिठ्ठीत लिहिणार की...”: वडेट्टीवार
4
अंबानींच्या अँटिलियाला कडवी टक्कर! 'या' अब्जाधीश राजकारण्याची इमारत अँटिलियापेक्षा उंच आणि अलिशान
5
सरन्यायाधीशांवर बूट फेकण्याचा प्रयत्न; गोंधळ घालणाऱ्या 'त्या' वकिलाला काय शिक्षा होणार?
6
"गर्लफ्रेंडमुळे तीन वर्षे जगायला मिळाली, आता..."; नाशिकमध्ये विद्यार्थ्याने इंजिनिअरिंग कॉलेजमध्येच आयुष्य संपवलं
7
'बुर्का चलेगा तो घूंघट भी चलेगा...!', भाजप मंत्री कृष्णनंदन पासवान यांचं मोठं विधान; बिहारमध्ये राजकारण तापलं
8
सरन्यायाधीश बी.आर. गवई यांच्यावर वकिलाने वस्तू फेकली, सर्वोच्च न्यायालयात सुनावणीवेळी गोंधळ
9
फेस्टीव सीझनमध्ये ऑनलाईन खरेदी करताना सावधान! 'या' चुकांमुळे क्रेडिट स्कोअर होईल खराब
10
मोहम्मद सिराजने लावला 'पिंपल पॅच'? Gen Z ची लोकप्रिय स्किनकेअर हॅक, 'असं' होतं त्वचेचं संरक्षण
11
Gold Silver Price Today 6 October: सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले; एकाच दिवसात सोनं ₹२१०० पेक्षा अधिकनं वाढलं, चांदीत ४ हजारांची तेजी
12
VIRAL : जत्रेतल्या ब्रेकडान्सवर बसायला आवडतं? 'हा' व्हिडीओ बघाल तर पुढच्यावेळी स्वतःला थांबवाल!
13
गायिका मैथिली ठाकूर भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवणार? विनोद तावडेंची घेतली भेट
14
Viral Video: १५ पत्नी, ३० मुले आणि १०० नोकर! विमानतळावर आफ्रिकन राजाचा थाट पाहून सगळेच चक्रावले
15
'उपमुख्यमंत्र्यांनी तुमच्याकडून मदत घेण्याचे सांगितले' अकोल्याच्या माजी आमदारांना बदमाशांकडून फसवण्याचा प्रयत्न
16
IND vs PAK: पाकिस्तानचं 'संडे' रूटीन- भारताविरूद्ध खेळा, हरा आणि घरी जा! सलग ४ रविवार पराभव
17
Gautami Patil: अपघात प्रकरणात गौतमी पाटीलला 'क्लीन चीट', पोलिसांनी सांगितले, 'गुन्हा दाखल होऊ शकत नाही'
18
गिफ्ट मिळालेली 'HAVAL H9' कार अभिषेक शर्मा भारतात चालवू शकणार नाही; कारण ऐकून व्हाल हैराण
19
शाहरुख खानच्या मागे उभी असलेली ज्युनिअर आर्टिस्ट, आज आहे प्रसिद्ध अभिनेत्याची बायको
20
हृदयद्रावक! छोट्या भावाच्या मृत्यूचा धक्का, दादाला आला हार्ट अटॅक; प्रेग्नंट वहिनी कोसळली अन्...

नापिकीच्या पैशांसाठी शेतकरी आक्रमक

By admin | Updated: March 13, 2015 00:15 IST

परिसरातील शेतकऱ्यांना नापिकीचा मोबदला मिळाला नाही. शेकडो शेतकरी नापिकीच्या लाभापासून वंचित राहिलेत.

सावरखेड : परिसरातील शेतकऱ्यांना नापिकीचा मोबदला मिळाला नाही. शेकडो शेतकरी नापिकीच्या लाभापासून वंचित राहिलेत. शेतकऱ्यांचा बँकेचे चुकीचे खाते क्रमांक महसूल प्रशासनाकडून पाठविल्यामुळे त्यांचे पैसे तीन वेळा परत गेले. ही चूक तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी केल्यामुळे शेतकऱ्यांना नापिकीचा लाभ मिळाला नाही. शेतकऱ्यांना त्वरित लाभाची रक्कम मिळावी त्यांच्यावर झालेल्या अन्यायाचे निराकरण शासनाकडून केला जावा अन्यथा तहसीलवर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा संबंधित शेतकऱ्यांनी दिला आहे. सन २०१२-१३मध्ये नापिकीची स्थिती होती. त्यावेळी राज्य शासनाने शेतकऱ्यांना मदत जाहीर केली. शासनाकडून केलेल्या सर्वेक्षणानुसार नापिकीग्रस्त शेतकऱ्यांची यादी बनविण्यात आली. शेतकऱ्यांचे बँक खाते क्र. संबंधित तलाठ्यांकडे देण्यास सांगितले. तलाठ्यांनी शेतकऱ्यांच्या यादीसह बँक खाते क्रमांक तहसील कार्यालय मोर्शी येथे सादर केली. काही शेतकऱ्यांच्या नावांच्या याद्या करुन तहसील कार्यालयाकडून बँकेकडे पाठविण्यात आल्या. या यादीमध्ये शेकडो शेतकऱ्यांचे बँकेचे खाते क्रमांक चुकीच्या पद्धतीने पाठविण्यात आल्याने त्यांचे पैसे खात्यात जमा न होता परत गेले, अशी चर्चा आहे. ही चूक सुधारावी व शासनाने देऊ केलेली रक्कम आपल्या खात्यात जमा व्हावी, यासाठी संबंधित शेतकरी शासकीय कार्यालयांच्या पायऱ्या झिजवित आहेत.५० टक्क्यांहून अधिक शेतकऱ्यांचे बँक खाते क्रमांकात बदल दिसून आला. दुरुस्तीकरिता पुन्हा खाते क्रमांक मागविण्यात आले. पुन्हा तोच घोळ झाल्याने नुकसान भरपाईपासून शेतकरी वंचित राहिले. त्यांना लाभ मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी आता ओरड सुरु केली आहे. एक वर्षापासून शेतकरी तहसीलकडे तक्रारी व चकरा मारीत आहेत. परिसरातील नेरपिंगळाई, कमळापूर, राजूरवाडी, सिरलस, लिहिदा या भागातील शेतकऱ्यांना याचा चांगला फटका बसला आहे. नेरपिंगळाई भाग १ व भाग २ मधील शेतकऱ्यांचा सर्वाधिक घोळ झाला. याचे तीन वेळा पैसे परत गेल्याची माहिती आहे. नुकसानभरपाई मिळत नसल्याने शेतकरी कंटाळले आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून टोलवाटोलवी होत आहे. एका अधिकाऱ्याकडून दुसऱ्याकडे कामाचा भार येत असल्याने हा घोळ आपल्या कारकिर्दीत झाला नाही. म्हणून दुर्लक्ष करीत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. झालेल्या घोळाला जबाबदार कोण असा प्रश्न शेतकरी विचारित आहे. सिरलस, राजुरवाडी, कमळापूर, नेरपिंगळाई, लिहिदा येथील शेतकऱ्यांना झळ बसली आहे. शेतकऱ्यांना न्याय न मिळाल्यास तहसील कार्यालयावर ठिया आंदोलन करण्याचे शेतकऱ्यांनी निर्णय गेतला आहे. भाजपा नेरपिंगळाई शाखाध्यक्ष अनिल फंदे यांच्या सह शेकडो शेतकरी आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला संबंधित प्रशासनाकडे दिलेल्या निवेदनाद्वारे हा इशारा दिला असून या निवेदनात ४५ पीडित शेतकऱ्यांचा समावेश आहे.