शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor: 'पहलगाममध्ये दहशतवाद्यांच्या पापाचा घडा भरला अन् त्यानंतर...', भारताचे डीजीएमओ घई काय बोलले?
2
Operation Sindoor : "हौसले बुलंद हो, तो..." क्रिकेटचा किस्सा ऐकवत DGMO नी दिला स्पष्ट मेसेज, पाकचा 'खेळ खल्लास' कसा केला ते सांगितलं!
3
भारत-पाकिस्तान डीजीएमओंची हॉटलाईन कनेक्ट होऊ शकली नाही; थोड्या वेळाने पुन्हा प्रयत्न करणार
4
जग कधीच विसरू शकणार नाही विराट कोहलीचे हे 10 कसोटी विक्रम; कुण्याही भारतीयाला जमला नाही असा पराक्रम
5
"मी विराटचे अश्रू पाहिलेत..."; 'किंग कोहली'च्या कसोटी निवृत्तीनंतर अनुष्का शर्माची भावनिक पोस्ट
6
स्मिता पाटील यांच्या मृत्यूनंतर प्रतीकला दत्तक घेणार होती बॉलिवूडची 'ही' प्रसिद्ध जोडी! अभिनेत्याचा मोठा खुलासा 
7
"जितके संयमी, तितकेच धाडसी"; ऑपरेशन सिंदूरच्या यशाने कंगना राणौत खूश, मोदींचं केलं कौतुक
8
'युद्ध रोमँटिक चित्रपट नाही, गंभीर मुद्दा आहे', माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांचे सूचक विधान
9
संरक्षण दलांसोबत अधिक समन्वयाने काम करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे सुतोवाच
10
सेव्हिंग अकाऊंटमध्ये पैसे ठेवूनही मिळेल FD इतकं व्याज; फक्त करावं लागेल 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताच्या सीमेवर अवकाशातूनही करडी नजर; ISRO लॉन्च करणार RISAT-1B, काय आहे खास वैशिष्टे?
12
विराट कोहलीच्या कसोटी निवृत्तीवर 'हेड कोच' गौतम गंभीरचे ट्विट, सिंहाशी तुलना करत म्हणाला...
13
अमेरिका आणि चीनमधील व्यापार युद्धाला अखेर पूर्णविराम; ट्रम्प आता किती टॅरिफ आकारणार?
14
Technology: तुटलेल्या केबलचे चार्जर वापरणे ताबडतोब थांबवा; होईल मोठे नुकसान!
15
एल्विशची सिस्टम हँग होणार! सापाचे विष आणि ड्रग्जच्या वापराप्रकरणात युट्यूबरला कोर्टाचा दणका
16
पाकिस्तानात आज पुन्हा भूकंपाचे धक्का; ७ दिवसांत तिसऱ्यांदा हादरली पाकची जमीन
17
सचिन वर्सेस विराट; कसोटीत कोण ठरलं भारी! इथं पाहा खास रेकॉर्ड
18
एका झटक्यात सोन्याच्या दरात २००० रुपयांपेक्षा अधिक घसरण; खरेदीपूर्वी पाहा सोन्या-चांदीचे नवे दर
19
Mehraj Malik : "रेशनचा मोठा तुटवडा; दुकानांमध्ये पीठ, तांदूळ, साखर उपलब्ध नाही, जनतेमध्ये भीतीचं वातावरण"
20
Virat Kohli Test Retirement: 'किंग कोहली'ची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती; १४ वर्षांचा 'विराट' प्रवास थांबवला!

नापिकीच्या पैशांसाठी शेतकरी आक्रमक

By admin | Updated: March 13, 2015 00:15 IST

परिसरातील शेतकऱ्यांना नापिकीचा मोबदला मिळाला नाही. शेकडो शेतकरी नापिकीच्या लाभापासून वंचित राहिलेत.

सावरखेड : परिसरातील शेतकऱ्यांना नापिकीचा मोबदला मिळाला नाही. शेकडो शेतकरी नापिकीच्या लाभापासून वंचित राहिलेत. शेतकऱ्यांचा बँकेचे चुकीचे खाते क्रमांक महसूल प्रशासनाकडून पाठविल्यामुळे त्यांचे पैसे तीन वेळा परत गेले. ही चूक तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी केल्यामुळे शेतकऱ्यांना नापिकीचा लाभ मिळाला नाही. शेतकऱ्यांना त्वरित लाभाची रक्कम मिळावी त्यांच्यावर झालेल्या अन्यायाचे निराकरण शासनाकडून केला जावा अन्यथा तहसीलवर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा संबंधित शेतकऱ्यांनी दिला आहे. सन २०१२-१३मध्ये नापिकीची स्थिती होती. त्यावेळी राज्य शासनाने शेतकऱ्यांना मदत जाहीर केली. शासनाकडून केलेल्या सर्वेक्षणानुसार नापिकीग्रस्त शेतकऱ्यांची यादी बनविण्यात आली. शेतकऱ्यांचे बँक खाते क्र. संबंधित तलाठ्यांकडे देण्यास सांगितले. तलाठ्यांनी शेतकऱ्यांच्या यादीसह बँक खाते क्रमांक तहसील कार्यालय मोर्शी येथे सादर केली. काही शेतकऱ्यांच्या नावांच्या याद्या करुन तहसील कार्यालयाकडून बँकेकडे पाठविण्यात आल्या. या यादीमध्ये शेकडो शेतकऱ्यांचे बँकेचे खाते क्रमांक चुकीच्या पद्धतीने पाठविण्यात आल्याने त्यांचे पैसे खात्यात जमा न होता परत गेले, अशी चर्चा आहे. ही चूक सुधारावी व शासनाने देऊ केलेली रक्कम आपल्या खात्यात जमा व्हावी, यासाठी संबंधित शेतकरी शासकीय कार्यालयांच्या पायऱ्या झिजवित आहेत.५० टक्क्यांहून अधिक शेतकऱ्यांचे बँक खाते क्रमांकात बदल दिसून आला. दुरुस्तीकरिता पुन्हा खाते क्रमांक मागविण्यात आले. पुन्हा तोच घोळ झाल्याने नुकसान भरपाईपासून शेतकरी वंचित राहिले. त्यांना लाभ मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी आता ओरड सुरु केली आहे. एक वर्षापासून शेतकरी तहसीलकडे तक्रारी व चकरा मारीत आहेत. परिसरातील नेरपिंगळाई, कमळापूर, राजूरवाडी, सिरलस, लिहिदा या भागातील शेतकऱ्यांना याचा चांगला फटका बसला आहे. नेरपिंगळाई भाग १ व भाग २ मधील शेतकऱ्यांचा सर्वाधिक घोळ झाला. याचे तीन वेळा पैसे परत गेल्याची माहिती आहे. नुकसानभरपाई मिळत नसल्याने शेतकरी कंटाळले आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून टोलवाटोलवी होत आहे. एका अधिकाऱ्याकडून दुसऱ्याकडे कामाचा भार येत असल्याने हा घोळ आपल्या कारकिर्दीत झाला नाही. म्हणून दुर्लक्ष करीत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. झालेल्या घोळाला जबाबदार कोण असा प्रश्न शेतकरी विचारित आहे. सिरलस, राजुरवाडी, कमळापूर, नेरपिंगळाई, लिहिदा येथील शेतकऱ्यांना झळ बसली आहे. शेतकऱ्यांना न्याय न मिळाल्यास तहसील कार्यालयावर ठिया आंदोलन करण्याचे शेतकऱ्यांनी निर्णय गेतला आहे. भाजपा नेरपिंगळाई शाखाध्यक्ष अनिल फंदे यांच्या सह शेकडो शेतकरी आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला संबंधित प्रशासनाकडे दिलेल्या निवेदनाद्वारे हा इशारा दिला असून या निवेदनात ४५ पीडित शेतकऱ्यांचा समावेश आहे.