शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

शेतक-याने उभ्या कपाशीतच फिरविला ट्रॅक्टर, धामणगाव तालुक्यातील प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2018 16:36 IST

बोंडअळीच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे कापूस उत्पादन होणे नाही, याची खात्री करून तालुक्यातील निंबोली येथील एका शेतक-याने दोन एकरातील डौलात असलेल्या कपाशी पिकावर रविवारी ट्रॅक्टर फिरविला.  

- मोहन राऊत

धामणगाव रेल्वे (अमरावती) : बोंडअळीच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे कापूस उत्पादन होणे नाही, याची खात्री करून तालुक्यातील निंबोली येथील एका शेतक-याने दोन एकरातील डौलात असलेल्या कपाशी पिकावर रविवारी ट्रॅक्टर फिरविला.  तालुक्यातील शेतकरी पूर्वी कपाशीऐवजी सोयाबीन पिकाची शेती करायचे. मात्र, काही वर्षांपासून सोयाबीन उत्पादनात प्रचंड घट झाली. जेमतेम हाती आलेल्या शेतमालाला शासनदरबारी योग्य भाव मिळत नसल्याने शेतक-यांनी सोयाबीन उत्पादनाकडे पाठ फिरवीत कपाशी लागवडीकडे वळले. मात्र, या पिकांवर गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव झाल्याने शेतक-यांवर उभे पीक उपटण्याची वेळ आली आहे. सध्या कपाशी पीक फुल-पात्यांसह लहान-लहान बोंडावर आहे. त्यातच बोंडअळीचे प्रमाण प्रचंड वाढल्याचे प्रत्येक झाडाचे निरीक्षणांती दिसून आले. बोंडअळी हा प्रकार सहजरीत्या नष्ट होत नसल्याचे मागील वर्षीचे अनुभव पाहता ते परिसरातील पीक नष्ट करणार, हे शतप्रतिशत खात्री झाल्याने निंबोली भोंगे येथील शेतकरी अरविंद विठोबाजी सोनोने तीन एकरांतील बोंडअळी बाधित कपाशी छटकभरही कापूस घरी आले नसताना पूर्णत: पीकच ट्रॅक्टरने मोडून काढले. कारण त्याच तीन एकराच्या आजूबाजूला त्याचीच दोन एकर लागवणने केलेली शेती असून, त्यातही कपाशी पीक बहरले आहे. अशा शेतकºयांनी शेतात फेरोमोन ट्रॅप लावावा, असा सल्लाही त्यांनी दिला आहे. येथील बोंडअळी बाजूच्या शेतात जाण्याच्या भीतीने त्याने तीन एकरातील बोंडअळी बाधित संपूर्ण पीकच रविवारी ट्रॅक्टरच्या सहाय्याने दोन एकराती पºहाटी उपटून ते वाळवून जाळण्याचा निर्णय घेतला असल्याचे ते 'लोकमत'शी बोलताना म्हणाले.

बीजी-३ ची परवानगी दिल्यास शेतकºयांचे नुकसान टळणारशासनाने बीटी बियाण्यात बीजी-२ परवानगी दिली आहे. मात्र, बीजी-२ हे निकामी झाल्याचे पत्र मोन्सॅन्टो कंपनीने शासनाला दिले असून, बीजी-३ ची परवानगी मागितली होती. ती मिळाल्यास शेतकºयांचे नुकसान टळणार होते. मात्र, शासनाने ती नाकारली. कारण बीजी-३ ची परवानगी दिल्यास पर्यावरणाला त्यापासून धोका निर्माण होण्याचे संकेत आहे.

 कपाशी लागवडीचा ४५ हजार रुपये खर्चअरविंद सोनोने यांनी तीन एकरात केलेल्या कपाशी लागवडीसाठी ४५ हजार रुपये खर्च केले. कपाशीवर बोंडअळीने आक्रमण केल्यामुळे  ट्रॅक्टर फिरविले.  यामुळे त्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.  तालुक्यातील प्रत्येक गावात बोंडअळीवर उपाययोजनेसाठी शेतकºयांची कार्यशाळा घेतली. शेतकºयांना कृषी विभागामार्फत मार्गदर्शन करण्यात आले. बोंडअळीग्रस्त भागातील शेतकºयांनी कृषी विभागाशी संपर्क साधावा.- अजय तळेगावकर, तालुका कृषी अधिकारी

गतवर्षी नोव्हेंबर महिन्यात बोंडअळी पडली. १० डिसेंबरपर्यंत तीन एकरात २७ क्विंटल कापूस घरी आले. त्यानंतरही प्रत्येक झाडाला ५० ते ६० बोंडे होती. मात्र, प्रकोपामुळे बोंडे किडल्याने किलोभरही कापूस आला नाही. अखेर पूर्ण पीक मोडीत काढले. यावर्षीही तीच स्थिती दिसून आल्याने इतरही शेतातील पीक बाधित होऊ नये, यासाठी बोंडअळीबाधित कपाशी पीक मी त्वरेने नष्ट करण्याचा निर्णय घेतला. - अरविंद सोनोने, शेतकरी निंबोली

टॅग्स :Amravatiअमरावती