शहरं
Join us  
Trending Stories
1
दिवाळीपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज, महागाई भत्त्यात 3% वाढ; आता 'एवढा' पगार मिळणार
2
दसरा मेळाव्यासाठी ६३ कोटींचा खर्च, शेतकऱ्यांना द्या; भाजपच्या मागणीवर ठाकरे म्हणाले, "उद्या बिल पाठवतो"
3
दिवाळीनंतर लगेच निवडणुकीचा धुराळा! राज्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती मतदारसंघ आरक्षणाचा कार्यक्रम जाहीर
4
“शिशुपालाप्रमाणे RSSची शंभरी भरली, मनुस्मृती, बंच ऑफ थॉटचे दहन करून संघ विसर्जित करा”: सपकाळ
5
समस्त बॉलिवूड हादरले! पैशांची तंगी होती, हा अभिनेता बनला ड्रग स्मगलर; ४० कोटींच्या ड्रगसह पकडले तेव्हा बिंग फुटले...
6
किती धोक्याची? सॅमसंगची स्मार्ट रिंग बॅटरी फुगली, बोटात खुपली; वापरकर्ता विमानतळावरून थेट हॉस्पिटलमध्ये
7
८ दिवसांच्या घसरणीला ब्रेक! RBI च्या घोषणेनंतर बाजारात जोरदार उसळी! टॉप गेनर्स-लूजर्स पाहा
8
भारतावर टॅरिफ लादणाऱ्या ट्रम्पवर काय वेळ आली, कर्मचाऱ्यांना पगार द्यायला पैसे नाहीत; शटडाऊनची नामुष्की
9
जिंकलंस मित्रा! कॉन्स्टेबलने IPS बनून घेतला अपमानाचा बदला; बॅक टू बॅक क्रॅक केली UPSC
10
UPSC Result 2025: यूपीएससी आयईएस आयएसएसचा निकाल जाहीर; सोलापूरचा मयुरेश वाघमारे देशात आठवा!
11
मोठ्या पडद्यावर फ्लॉप पण बिझनेसमध्ये केली कमाल, चालवतोय १०००० कोटींची कंपनी; कमाईच्या बाबतीत अनेकांना टाकलं मागे
12
ट्रम्पसमोर नेतन्याहूंनी फोनवर कुणाची माफी मागितली? इस्रायल-गाझा युद्ध थांबवण्यात महत्वाची भूमिका
13
अब्जाधीशांच्या यादीत पहिल्यांदाच सामील झाला शाहरुख खान, पाहा किती झाली संपत्ती?
14
सारा तेंडुलकर जेव्हा पापाराझी समोर मराठीत बोलते...; Viral Video पाहून नेटकरीही पडले प्रेमात
15
गुरुवारी दसरा २०२५: ‘अशी’ करा स्वामी सेवा, वर्षभर पुण्य लाभेल; देवी लक्ष्मी लाभच लाभ देईल!
16
गुरुवारी दसरा २०२५: राहु काळ कधी? पाहा, शुभ विजय मुहूर्त; महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता
17
इलेक्ट्रीक टु-व्हीलर विक्रीत मोठा उलटफेर! ओलाची जागा बजाज, बजाजची जागा ओलाने घेतली, टीव्हीएस, एथरने टिकवली...
18
Chaitanyananda Saraswati : अय्याशीसाठी संस्थेत बांधली लग्झरी रुम... स्वयंघोषित बाबाचे काळे कारनामे, अश्लील चॅट्सने खळबळ
19
अर्थव्यवस्थेला ५ मोठे 'बूस्टर डोस'! रेपो दर जैसे थे, पण RBI च्या 'या' निर्णयाने मार्केटमध्ये येणार पैसा
20
"तुझी मैत्रिण किंवा ज्युनियर आहे का, दुबईतल्या शेखला..."; चैतन्यानंदचे हादरवणारे व्हॉट्सअॅप चॅट समोर

दर ३२ तासांत एक शेतकरी आत्महत्या : गतवर्षी ऑगस्ट महिन्यात सर्वाधिक २९ प्रकरणे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2020 19:11 IST

नापिकी अन् नैसर्गिक आपत्ती शेतक-यांच्या पाचवीलाच पुजली आहे. यामुळे झालेले कर्ज अन् जगावं कसं, या विवंचनेने शेतकरी नैराश्याच्या गर्तेत आहे.

अमरावती : नापिकी अन् नैसर्गिक आपत्ती शेतक-यांच्या पाचवीलाच पुजली आहे. यामुळे झालेले कर्ज अन् जगावं कसं, या विवंचनेने शेतकरी नैराश्याच्या गर्तेत आहे. यातून सावरण्यासाठी झालेले शासनप्रयत्न निष्फळ ठरल्याने जिल्ह्यात दर बत्तीस तासांत एक शेतकरी मृत्यूला कवटाळत आहे. वर्षभरात २६० शेतकरी आत्महत्या झाल्याचे धक्कादायक वास्तव आहे.जिल्ह्यातील शेतकरी सलग पाच वर्षांपासून दुष्काळाच्या दुष्टचक्रात अडकला आहे. यापूर्वीच्या शासनाने दीड लाखांपर्यंतची कर्जमाफी झाली केली. मात्र, अटी व शर्तीमध्ये अनेक शेतकरी कर्जबाजारी राहिलेत. मुला-मुलींचे शिक्षण, लग्न आदींमुळे शेतकरी कर्जबाजारी होत आहेत. यंदादेखील खरिपाच्या दोन महिन्यांत पावसात खंड पडल्यामुळे मूग व उडीद बाद झाले. त्यानंतर सोयाबीनच्या हंगामात १० दिवस अवकाळी पावसाने ‘कॅश क्रॉप’ची दैना केली. कपाशीचेही नुकसान झाले. एकूण ८० टक्के हंगाम बाधित झाला. त्यातुलनेत शासन मदत अल्प आहे. त्यामुळे खासगी सावकारांचे कर्जदेखील मोठ्या प्रमाणात होत असल्याने कर्जाच्या तगाद्यामुळेही शेतकरी मृत्यूला कवटाळत असल्याचे चित्र दुर्दैवी आहे. शेतकरी आत्महत्यांची नोंद १ जानेवारी २००१ पासून येथील जिल्हाधिकारी कार्यालयात घेतली जाते. त्यानुसार आतापर्यंत ३ हजार ८१७ शेतकरी आत्महत्या झालेल्या आहेत. यामध्ये १६९९ प्रकरणे शासन मदतीसाठी पात्र ठरलीत. २०४६ अपात्र, तर अद्यापही ७२ प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित आहेत. शेतकरी आत्महत्यासारख्या गंभीर विषयावर प्रशासन संवेदनशील नाही. त्यामुळेच तब्बल तीन महिन्यांपासूनच्या शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबाला अद्यापही शासन मदत मिळू शकली नाही, हीदेखील तितकीच धक्कादायक बाब आहे.

सन २००१ पासून ३८१७ शेतकरी आत्महत्याजिल्ह्यात १९ वर्षांत ३८१७ शेतकरी आत्महत्या झालेल्या आहेत. यामध्ये सर्वाधिक ३६२ आत्महत्या या ऑगस्ट महिन्यात झाल्या आहेत. जानेवारी महिन्यात २८७, फेब्रुवारी ३०९, मार्च ३२८, एप्रिल २६५, मे ३२५, जून २९२, जुलै ३०७, सप्टेंबर ३६२, ऑक्टोबर ३३४ नोव्हेंबर ३२२ व डिसेंबर महिन्यात ३१४ शेतक-यांनी मृत्यूला कवटाळले. यंदा २६० शेतकरी आत्महत्या झालेल्या आहेत. याध्ये जानेवारी महिन्यात २०, फेब्रुवारी १९, मार्च २४, एप्रिल १७, मे २५, जून २०, जुलै २२, ऑगस्ट २९, सप्टेंबर २८, आॅक्टोबर १८, नोव्हेंबर २३ व डिसेंबर महिन्यात १९ शेतक-यांनी मृत्यूला कवटाळले.