शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

दर ३२ तासांत एक शेतकरी आत्महत्या : गतवर्षी ऑगस्ट महिन्यात सर्वाधिक २९ प्रकरणे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2020 19:11 IST

नापिकी अन् नैसर्गिक आपत्ती शेतक-यांच्या पाचवीलाच पुजली आहे. यामुळे झालेले कर्ज अन् जगावं कसं, या विवंचनेने शेतकरी नैराश्याच्या गर्तेत आहे.

अमरावती : नापिकी अन् नैसर्गिक आपत्ती शेतक-यांच्या पाचवीलाच पुजली आहे. यामुळे झालेले कर्ज अन् जगावं कसं, या विवंचनेने शेतकरी नैराश्याच्या गर्तेत आहे. यातून सावरण्यासाठी झालेले शासनप्रयत्न निष्फळ ठरल्याने जिल्ह्यात दर बत्तीस तासांत एक शेतकरी मृत्यूला कवटाळत आहे. वर्षभरात २६० शेतकरी आत्महत्या झाल्याचे धक्कादायक वास्तव आहे.जिल्ह्यातील शेतकरी सलग पाच वर्षांपासून दुष्काळाच्या दुष्टचक्रात अडकला आहे. यापूर्वीच्या शासनाने दीड लाखांपर्यंतची कर्जमाफी झाली केली. मात्र, अटी व शर्तीमध्ये अनेक शेतकरी कर्जबाजारी राहिलेत. मुला-मुलींचे शिक्षण, लग्न आदींमुळे शेतकरी कर्जबाजारी होत आहेत. यंदादेखील खरिपाच्या दोन महिन्यांत पावसात खंड पडल्यामुळे मूग व उडीद बाद झाले. त्यानंतर सोयाबीनच्या हंगामात १० दिवस अवकाळी पावसाने ‘कॅश क्रॉप’ची दैना केली. कपाशीचेही नुकसान झाले. एकूण ८० टक्के हंगाम बाधित झाला. त्यातुलनेत शासन मदत अल्प आहे. त्यामुळे खासगी सावकारांचे कर्जदेखील मोठ्या प्रमाणात होत असल्याने कर्जाच्या तगाद्यामुळेही शेतकरी मृत्यूला कवटाळत असल्याचे चित्र दुर्दैवी आहे. शेतकरी आत्महत्यांची नोंद १ जानेवारी २००१ पासून येथील जिल्हाधिकारी कार्यालयात घेतली जाते. त्यानुसार आतापर्यंत ३ हजार ८१७ शेतकरी आत्महत्या झालेल्या आहेत. यामध्ये १६९९ प्रकरणे शासन मदतीसाठी पात्र ठरलीत. २०४६ अपात्र, तर अद्यापही ७२ प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित आहेत. शेतकरी आत्महत्यासारख्या गंभीर विषयावर प्रशासन संवेदनशील नाही. त्यामुळेच तब्बल तीन महिन्यांपासूनच्या शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबाला अद्यापही शासन मदत मिळू शकली नाही, हीदेखील तितकीच धक्कादायक बाब आहे.

सन २००१ पासून ३८१७ शेतकरी आत्महत्याजिल्ह्यात १९ वर्षांत ३८१७ शेतकरी आत्महत्या झालेल्या आहेत. यामध्ये सर्वाधिक ३६२ आत्महत्या या ऑगस्ट महिन्यात झाल्या आहेत. जानेवारी महिन्यात २८७, फेब्रुवारी ३०९, मार्च ३२८, एप्रिल २६५, मे ३२५, जून २९२, जुलै ३०७, सप्टेंबर ३६२, ऑक्टोबर ३३४ नोव्हेंबर ३२२ व डिसेंबर महिन्यात ३१४ शेतक-यांनी मृत्यूला कवटाळले. यंदा २६० शेतकरी आत्महत्या झालेल्या आहेत. याध्ये जानेवारी महिन्यात २०, फेब्रुवारी १९, मार्च २४, एप्रिल १७, मे २५, जून २०, जुलै २२, ऑगस्ट २९, सप्टेंबर २८, आॅक्टोबर १८, नोव्हेंबर २३ व डिसेंबर महिन्यात १९ शेतक-यांनी मृत्यूला कवटाळले.