शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
3
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
4
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
5
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
6
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
7
...तर तलवारीचा डौलही राहील आणि शानही !
8
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
9
मेडिकल कॉलेजमधील खर्डेघाशी थांबवा ! ‘एचएमआयएस’च्या इंटरनेट सुविधेसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडून ३२ कोटी २१ लाख रुपये
10
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
11
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
12
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
14
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
15
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
16
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
17
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
18
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
19
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
20
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...

दर ३२ तासांत एक शेतकरी आत्महत्या : गतवर्षी ऑगस्ट महिन्यात सर्वाधिक २९ प्रकरणे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2020 19:11 IST

नापिकी अन् नैसर्गिक आपत्ती शेतक-यांच्या पाचवीलाच पुजली आहे. यामुळे झालेले कर्ज अन् जगावं कसं, या विवंचनेने शेतकरी नैराश्याच्या गर्तेत आहे.

अमरावती : नापिकी अन् नैसर्गिक आपत्ती शेतक-यांच्या पाचवीलाच पुजली आहे. यामुळे झालेले कर्ज अन् जगावं कसं, या विवंचनेने शेतकरी नैराश्याच्या गर्तेत आहे. यातून सावरण्यासाठी झालेले शासनप्रयत्न निष्फळ ठरल्याने जिल्ह्यात दर बत्तीस तासांत एक शेतकरी मृत्यूला कवटाळत आहे. वर्षभरात २६० शेतकरी आत्महत्या झाल्याचे धक्कादायक वास्तव आहे.जिल्ह्यातील शेतकरी सलग पाच वर्षांपासून दुष्काळाच्या दुष्टचक्रात अडकला आहे. यापूर्वीच्या शासनाने दीड लाखांपर्यंतची कर्जमाफी झाली केली. मात्र, अटी व शर्तीमध्ये अनेक शेतकरी कर्जबाजारी राहिलेत. मुला-मुलींचे शिक्षण, लग्न आदींमुळे शेतकरी कर्जबाजारी होत आहेत. यंदादेखील खरिपाच्या दोन महिन्यांत पावसात खंड पडल्यामुळे मूग व उडीद बाद झाले. त्यानंतर सोयाबीनच्या हंगामात १० दिवस अवकाळी पावसाने ‘कॅश क्रॉप’ची दैना केली. कपाशीचेही नुकसान झाले. एकूण ८० टक्के हंगाम बाधित झाला. त्यातुलनेत शासन मदत अल्प आहे. त्यामुळे खासगी सावकारांचे कर्जदेखील मोठ्या प्रमाणात होत असल्याने कर्जाच्या तगाद्यामुळेही शेतकरी मृत्यूला कवटाळत असल्याचे चित्र दुर्दैवी आहे. शेतकरी आत्महत्यांची नोंद १ जानेवारी २००१ पासून येथील जिल्हाधिकारी कार्यालयात घेतली जाते. त्यानुसार आतापर्यंत ३ हजार ८१७ शेतकरी आत्महत्या झालेल्या आहेत. यामध्ये १६९९ प्रकरणे शासन मदतीसाठी पात्र ठरलीत. २०४६ अपात्र, तर अद्यापही ७२ प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित आहेत. शेतकरी आत्महत्यासारख्या गंभीर विषयावर प्रशासन संवेदनशील नाही. त्यामुळेच तब्बल तीन महिन्यांपासूनच्या शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबाला अद्यापही शासन मदत मिळू शकली नाही, हीदेखील तितकीच धक्कादायक बाब आहे.

सन २००१ पासून ३८१७ शेतकरी आत्महत्याजिल्ह्यात १९ वर्षांत ३८१७ शेतकरी आत्महत्या झालेल्या आहेत. यामध्ये सर्वाधिक ३६२ आत्महत्या या ऑगस्ट महिन्यात झाल्या आहेत. जानेवारी महिन्यात २८७, फेब्रुवारी ३०९, मार्च ३२८, एप्रिल २६५, मे ३२५, जून २९२, जुलै ३०७, सप्टेंबर ३६२, ऑक्टोबर ३३४ नोव्हेंबर ३२२ व डिसेंबर महिन्यात ३१४ शेतक-यांनी मृत्यूला कवटाळले. यंदा २६० शेतकरी आत्महत्या झालेल्या आहेत. याध्ये जानेवारी महिन्यात २०, फेब्रुवारी १९, मार्च २४, एप्रिल १७, मे २५, जून २०, जुलै २२, ऑगस्ट २९, सप्टेंबर २८, आॅक्टोबर १८, नोव्हेंबर २३ व डिसेंबर महिन्यात १९ शेतक-यांनी मृत्यूला कवटाळले.