शहरं
Join us  
Trending Stories
1
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
2
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
3
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
4
पुण्यात भीषण अपघात! फरश्या घेऊन जाणाऱ्या ट्रकची तीन वाहनांना धडक,ट्रकचालकला पोलिसांच्या ताब्यात
5
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
6
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
7
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
8
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
9
Mohammed Shami: "मी काही बोललो तर, वाद होईल!" संघ निवडीबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांवर शमीचं उत्तर
10
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
11
Viral Video: फलंदाजाला 'असं' आउट होताना कधीच पाहिलं नसेल; षटकार मारूनंही पंचांनी वर केलं बोट!
12
अजबच! गावठी कुत्रा बनला ज्वेलरी शॉपचा रखवालदार, गळ्यात घालतो ५० तोळ्यांची सोन्याची चेन
13
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
14
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
15
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
16
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
17
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
18
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
19
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
20
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?

निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांकडून भाडोत्री टॉयलेटचा फंडा, करारपत्रकांची लगबग 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2017 16:48 IST

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी असलेली शौचालयाची अट पूर्ण करण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी आता उसनवारीची शक्कल लढविली आहे. शौचालय नाही म्हणून नामांकन रिजेक्ट होऊ नये, यासाठी तालुक्यातील अनेक जण चक्क शेजा-यांचे शौचालय वापरत असल्याचे करारपत्रक दाखवित आहेत.

- चेतन घोगरेअमरावती - ग्रामपंचायत निवडणुकीसाठी असलेली शौचालयाची अट पूर्ण करण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी आता उसनवारीची शक्कल लढविली आहे. शौचालय नाही म्हणून नामांकन रिजेक्ट  होऊ नये, यासाठी तालुक्यातील अनेक जण चक्क शेजा-यांचे शौचालय वापरत असल्याचे करारपत्रक दाखवित आहेत.निवडणुकीपुरता सुरू असलेला हा प्रकार ग्राह्य धरला जाणार का तसेच हे अर्ज छाननीच्या दिवशी घेतल्या जाणाºया आक्षेप, हरकतींवरून स्पष्ट होणार आहे. शासनाने घातलेल्या  टॉयलेटच्या अटीमुळे उसनवारीची नवी कथा तालुक्यात जन्माला आल्याचे चित्र आहे. तालुक्यात १३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. सरपंचाची निवड थेट जनतेतून होणार असल्याने या निवडणुका अधिक चर्चेत आल्या आहेत. त्यामुळे यापदासाठी इच्छुकांची मांदियाळी दिसून येत आहे.सरपंचपदासाठी उमेदवारांची संख्या वाढल्यास तेवढीच पॅनलचीही संख्या दिसून येणार आहे. एका-एका गावांत तीन ते चार सरपंचपदाचे दावेदार दिसून येत आहेत. मात्र, त्यांना सदस्यपदासाठी उमेदवार मिळविणे फारच कठीण झाले आहे. सरपंच मतदानासाठी सदस्यपदाच्या उमेदवारांची मदत होणार असल्याने खर्चासह सर्वच जबाबदारी घेऊन सदस्यपदाचे उमेदवार ओढून ताणून पॅनलमध्ये घेतले जात आहेत. त्यापैकी ब-याच जणांकडे (उमेदवाराकडे) शौचालय नाही. निवडणूक लढविण्यासाठी सर्वच उमेदवारांना कागदोपत्री सुमारे १८ अटींची पूर्तता करावी लागणार आहे. यामध्ये  शौचालय ही प्रमुख अट आहे. सदस्यपदासाठी बळजबरीने उभ्या केलेल्या ज्या उमेदवारांकडे शौचालय नाही, अशांनी शेजा-यांकडे असणा-या शौचालयाची उसनवारी करून निवडणुकीपुरती प्रशासनाची फसवणूक करण्याची नामी शक्कल लढविली आहे.शेजाºयाचे शौचालय वापरत असल्याचे दाखविण्यासाठी शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर करारपत्र तयार करून ते उमेदवारी अर्जासोबत जोडण्याचा प्रयत्न सुरू आहे. संबंधित उमेदवार खरोखरच शेजा-याचे शौचालय वापरत असेल तर हे करारपत्र यापूर्वी करणे आवश्यक होते. केवळ निवडणुकीची अट पूर्ण करण्यासाठी ते केले असेल तर ते योग्य ठरणार का, हे अर्ज छाननीच्या दिवशी स्पष्ट होणार आहे.शौचालयाच्या उसनवारीची लढविलेली नामी शक्कल ग्राह्य धरली गेलीच तर निवडणुकीसाठी शौचालयाची अट का घातली गेली, हा प्रश्न निर्माण होत आहे. सध्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरूवात झाली आहे. निवडणुकीसाठी उमेदवाराचे स्वत:चे शौचालय असणेच अनिवार्य आहे किंवा शेजा-यांचे करारपत्र चालेल, याबाबतची भूमिका प्रशासनालाही तातडीने जाहीर करावी लागणार आहे. तरच हा प्रकार थांबणार आहे.करारपत्रावर हरकतीशी शक्यता निवडणूक लढविण्यासाठी शौचालय नसणाºया इच्छुक उमेदवारांचा शेजाºयाचे शौचालय वापरत असल्याचे भासविण्याचा करारपत्राद्वारे प्रयत्न सुरू आहे. छानानीच्या दिवशी त्यावर विरोधी गटाकडून हरकत घेतली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. हरकत घेतल्यास अधिका-यांना त्यावर विचारपूर्वक निर्णय घ्यावा लागणार आहे. निवडणुकीनंतरही हा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.तालुक्यातील १३ ग्रामपंचायतींपैकी चिंचोली बु. या गावात सर्वाधिक मतदार आहे. यामध्ये ९४५ पुरुष, ९२० महिला एकूण १८६५ तर खिरगव्हाण यागावामध्ये सर्वात कमी मतदार आहेत. त्यामध्ये २४४ पुरूष, २२२ महिला एकूण ४६६ मतदार मतदान करणार आहे.सद्यस्थितीत अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे याबाबत सध्या काही सांगता येणार नाही. छाननीनंतर निवडणूक आयोेगाच्या निकषात न बसणारे अर्ज रद्द केले जातील.पुरुषोत्तम भुसारी,तहसीलदार, अंजनगाव सुर्जी

टॅग्स :Governmentसरकार