शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

कुटुंब अर्थसहाय्य योजनेचा ‘निराधारांना आधार’

By admin | Updated: April 26, 2016 00:16 IST

तालुक्यात राज्य शासनाच्या राष्ट्रीय अर्थसहाय योजनेअंतर्गत श्रावण बाळ, संजय गांधी निराधार, इंदिरा गांधी, वृद्धापकाळ व कुटुंबसहाय इत्यादी संलग्नीत योजनांमार्फत ...

तालुक्यात २८ हजार ७१३ लाभार्थी : वर्षभरात २० कोटींच्या अनुदानाचे वाटपचांदूरबाजार : तालुक्यात राज्य शासनाच्या राष्ट्रीय अर्थसहाय योजनेअंतर्गत श्रावण बाळ, संजय गांधी निराधार, इंदिरा गांधी, वृद्धापकाळ व कुटुंबसहाय इत्यादी संलग्नीत योजनांमार्फत २८ हजार ७१३ लाभार्थ्यांना २० कोटी ९ लाख ३०० रुपयांच्या अनुदानाचे वाटप करण्यात आले. यामुळे वृद्ध, अपंग, परित्यक्ता व निराधारांना बळ मिळाले आहे. महसूल विभागाकडून मागील २०१५-२०१६ या आर्थिक वर्षात, तालुका पातळीवर नियमानुसार काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात आली. विविध योजनाअंतर्गत प्राप्त अर्जाची छाननी करून लाभार्थ्यांची निवड करण्यात येऊन, सर्व शासकीय नियमांचे सोपस्कार पूर्ण झाल्यानंतरच प्राप्त लाभार्थ्यांची निवड करण्यात आली. ही पात्र यादी वरिष्ठांमार्फत शासनाकडे पाठविल्यानंतर तालुक्याच्या संबंधित विभागाला या योजनेचे अनुदान प्राप्त झाले होते. पात्र लाभार्थ्यांमध्ये मागील आर्थिक वर्षात ३१ मार्च २०१६ पर्यंत श्रावण बाळ योजनेअंतर्गत १८ हजार २८५ तर इंदिरा गांधी वृद्धपकाळ अंतर्गत ५ हजार ६९८ अशा एकूण २३ हजार ९८३ लाभार्थ्याचा समावेश होता. या सर्व लाभार्थ्यांना प्रतिमहिना ६०० रुपये प्रमाणे मागील वर्षात १४ कोटी ९९ लाख, ८३ हजार ८०० रुपयांचे अनुदान अर्थसहाय म्हणून वितरित करण्यात आले आहे. तसेच संजय गांधी निराधार योजनेंतर्गत तालुक्यातील विधवा, परित्याक्ता व अपंग असलेल्या ४ हजार ७३० लाभार्थ्यांना ही निर्धारित मासिक अनुदानापोटी ३ कोटी ४७ लाख ७४ हजार ५०० रुपयांचे अनुदान आर्थिक आधार म्हणून वितरित करण्यात आले. या आर्थिक महतीमुळे योजनेतील सर्व लाभार्थ्यांना जगण्याची दिशा मिळाली आहे. राष्ट्रीय अर्थसहाय योजनेअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या योजनांमधील महत्वाची योजना मह्णजे कुटूंबअर्थसहाय योजना होय. या योजनेत नियमानुसार १८-५९ वर्षाचपर्यंतच्या कुटूंब प्रमुखाचा नैसर्गिक मृत्यु झाल्यास त्या कुटूंबाला तातडीने २० हजार रुपयांचे अर्थसहाय देण्यात येते. कुटूंब प्रमुखाच्या मृत्युने हादरलेल्या कुटूंबाला ही मदत आपत्तीकाळात अ त्यंत मोलाची ठरते. या योजनेअंतर्गत तालुक्यातील १०७ कुटूंबाना २१ लाख ४० हजार रुपयांचे अर्थसहाय करयात आले. त्यामुळे या कुटूंबाना कठिन काळात जगण्याचे बळ मिळाले. (तालुका प्रतिनिधी)