शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

खोटी माहिती अंगलट, ६० शिक्षकांना नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2018 23:41 IST

आॅनलाइन बदली प्रक्रियेने अगोदरच हैराण झालेल्या शिक्षकांना आता खोटी माहिती भरल्याचे प्रकरण अंगलट आले आहे. बदलीच्या पोर्टलमध्ये खोटी माहिती भरणाऱ्या ६० शिक्षकांना जि.प. शिक्षण विभागाने पहिल्या टप्प्यात कारणे दाखवा नोटीस बजाविली. त्यामुळे शिक्षकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्देसीईआेंसमोर होणार सुनावणी

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : आॅनलाइन बदली प्रक्रियेने अगोदरच हैराण झालेल्या शिक्षकांना आता खोटी माहिती भरल्याचे प्रकरण अंगलट आले आहे. बदलीच्या पोर्टलमध्ये खोटी माहिती भरणाऱ्या ६० शिक्षकांना जि.प. शिक्षण विभागाने पहिल्या टप्प्यात कारणे दाखवा नोटीस बजाविली. त्यामुळे शिक्षकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.जिल्हा परिषदेतील शिक्षकांच्या बदली प्रक्रियेचा पहिला टप्पा पार पडला. यावर्षी शासनाने प्रथमच राज्यातील सर्व शिक्षकांच्या बदल्या आॅनलाइन पद्धतीने केल्या. सुरुवातीला या प्रक्रियेला विरोध झाला. मात्र, विरोधाला न जुमानता शासनाने ही प्रक्रिया राबविली. या प्रक्रियेमुळे बदलीचे ठिकाण आदेश हातात मिळेपर्यंत कोणालाच कळत नव्हते. त्यामुळे बदलीची आॅर्डर घेण्यासाठी जाताना शिक्षकांच्या काळजात धस्स झाले होते. यात कोणाची सोय झाली, तर कोणाची गैरसोय झाली. बºयाच शिक्षकांना आदेश मिळाले आहेत. आता बदली प्रक्रियेचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे. यामध्ये पोर्टलवर खोटी माहिती भरणाºयांवर कारवाईस सुरुवात झाली आहे. संवर्ग १ व संवर्ग २ मध्ये ज्या शिक्षकांच्या बदल्या झाल्या, त्यात काहींनी अंतर खोटे दाखविले, तर काहींनी बोगस प्रमाणपत्र जोडल्याचे शिक्षण विभागाने केलेल्या तपासणीत उघड झाले आहे. अशा शिक्षकांचा चौकशी अहवाल व प्राप्त तक्रारीवरू न केलेल्या पडताळणीअंती जिल्ह्यातील ६० शिक्षकांना मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा खत्री यांच्या आदेशावरून शिक्षण विभागाने नोटीस बजावल्या. प्रशासन त्यांच्यावर कोणती कारवाई करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.आज सुनावणीबोगस प्रमाणपत्र जोडणाºया संबंधित शिक्षकांना शिक्षण विभागाने गटशिक्षणाधिकाºयांमार्फत नोटीस बजावल्या. या सर्व शिक्षकांची सुनावणी ३ जुलै रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी या जिल्हा परिषदेच्या डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहात सकाळी १० पासून घेणार आहेत.शिक्षक संख्याशिक्षण विभागाने नोटीस बजाविलेल्या तालुकानिहाय शिक्षक संख्या पुढील प्रमाणे आहे. मोर्शी ५, चांदूरबाजार ६, चिखलदरा २, तिवसा ४, दर्यापूर ४, धामणगाव रेल्वे १, धारणी ४, अमरावती ८, अचलपूर १०, वरूड २, भातकुली ४ आणि नांदगाव खंडेश्वर ९ याप्रमाणे शिक्षकांचा समावेश आहे.खोटी माहिती देऊन संवर्ग १ व २ मध्ये बदलीचा लाभ घेतलेल्या ६० शिक्षकांची सुनावणी ३ जुलै रोजी सीईओ यांच्यासमोर होत आहे. यात समाधानकारक उत्तर दिले, तर सूट मिळू शकते. समाधान न झाल्यास संबंधितांची एक वेतनवाढ कायमची बंद केली जाणार आहे.- जयश्री राऊत, प्रभारी शिक्षणाधिकारी (प्राथमिक)