शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरांच्या विष्ठेमुळे मुलांना फप्फुसाचे गंभीर आजार; फायब्रोसिसवर औषधेही परिणामकारक ठरत नाहीत
2
आजचे राशीभविष्य : मंगळवार १२ ऑगस्ट २०२५; आज शक्यतो प्रवास टाळावा, अचानक खर्च उदभवण्याची शक्यता
3
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
4
लोकलची प्रवासी वाहतूक क्षमता २५ टक्के वाढणार; सीएसएमटी-खोपोली दरम्यान १५ डब्यांची गाडी धावणार
5
हत्तीचं ॲक्युपंक्चर, बिबट्याचं रूट कॅनल अन् ICU मधील माकड
6
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
7
भटक्या कुत्र्यांचा सर्वाधिक 'चावा' महाराष्ट्राला; सहा वर्षांत तब्बल ३० लाख लोकांचे तोडले लचके
8
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
9
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
10
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
11
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
12
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
13
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
14
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
15
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
16
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
17
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
18
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
19
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
20
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)

८९ शाळांची पडझड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2020 05:01 IST

वादळी वाऱ्यांनी जिल्हा परिषद शाळांच्या इमारतींचे मोठे नुकसान केले आहे. चिखलदरा तालुक्यातील तब्बल ३८ शाळा प्रभावित झाल्या आहेत. काही शाळांच्या वर्गखोल्या जीर्ण झाल्यामुळे केव्हा कोसळतील, अशी अवस्था झाली आहे. जिल्हा परिषदेच्या शाळांकडे मुलांना आकर्षित करण्यासाठी तसेच पटसंख्या वाढविण्यासाठी शिक्षण विभागाच्यावतीने मागील काही वर्षांपासून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.

ठळक मुद्देवादळी वाऱ्याचा फटका । धोकादायक शाळांमध्येच होणार का शिक्षण ?

जितेंद्र दखने।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : लॉकडाऊनच्या काळात अवकाळी पावसासोबत धडकलेल्या वादळी वाऱ्यांनी खेड्यापाड्यातील जिल्हा परिषदेच्या ८९ शाळांच्या वर्गखोल्यांची नासधूस केली. काही जीर्ण वर्गखोल्या ढासळल्या. काही वर्गखोल्यांचे छप्पर उडून गेले. विशेष म्हणजे, पर्यायी व्यवस्था नसल्याने या इमारतीमधून अन्यत्र शाळा हलविता येत नाही आणि पुरेसा निधी नसल्यामुळे त्या बांधता येत नाही. त्यामुळे अशा धोकादायक वर्गातच मुलांच्या सुरक्षिततेची शक्य ती काळजी घेऊन त्यांचे भवितव्य घडविण्याचा प्रयत्न शिक्षक करणार आहेत. पालकांनाही काळजावर दगड ठेवून विद्यार्थ्यांना येथे शिकविण्यास पाठवावे लागणार आहे.वादळी वाऱ्यांनी जिल्हा परिषद शाळांच्या इमारतींचे मोठे नुकसान केले आहे. चिखलदरा तालुक्यातील तब्बल ३८ शाळा प्रभावित झाल्या आहेत. काही शाळांच्या वर्गखोल्या जीर्ण झाल्यामुळे केव्हा कोसळतील, अशी अवस्था झाली आहे. जिल्हा परिषदेच्या शाळांकडे मुलांना आकर्षित करण्यासाठी तसेच पटसंख्या वाढविण्यासाठी शिक्षण विभागाच्यावतीने मागील काही वर्षांपासून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. शिक्षकांच्या परिश्रमातून जिल्हा परिषदेतील शाळांमधील मुले शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीत चमकले आहेत. असे असले तरी खासगी शाळांबद्दल ग्रामीण भागातील पालकांनाही आकर्षण आहे. खासगी शाळांमुळे जिल्हा परिषदांच्या शाळांतील विद्यार्थिसंख्या घटू लागली. काही शाळांमध्ये २० पेक्षा कमी मुले राहू लागली. रिकाम्या वर्गखोल्यांकडे शाळांचे दुर्लक्ष होऊ लागले. वादळ, अतिवृष्टी यामुळे या खोल्यांची अवस्था बिकट झाली आहे. अनेक शाळांचे दरवाजे, खिडक्या, भिंत, टीनपत्रे, संरक्षण भिंत, कवेलू पूर्णत: नेस्तनाबूत झाले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विकासकामांना कात्री लावण्यात आल्याने वर्गखोल्यांच्या आणखी काही महिने तरी शासनाकडून पुरेसा निधी मिळणे अवघड आहे. त्यामुळे जिल्ह्यातील या पडझड झालेल्या व धोकादाक वर्गखोल्यांची संख्या वाढतच जाण्याची शक्यता आहे. या शाळा शैक्षणिक सत्र सुरू होण्याअगोदर दुरुस्त होतील की तशाच राहतील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.धोकादायक इमारतींची अशी आहे संख्याचिखलदरा ३८. मोर्शी १०. अमरावती ७. भातकुली ७. अचलपूर ५. धारणी ५. दयार्पूर ५. नांदगाव खंडेश्वर ४. चांदूर बाजार २. अंजनगाव सुर्जी २. तिवसा २. चांदूर रेल्वे १. धामणगाव रेल्वे १.वादळाने पडझड झालेल्या व शिकस्त वर्गखोल्यांसाठी पुरेसा निधी मिळावा, असा ठराव शिक्षण समितीने घेतला. सेस फंडातून पाच टक्के निधी उपलब्ध झाला तरी पूर्णपणे दुरुस्तीचे कामे होऊ शकत नाहीत. त्यामुळे आवश्यक निधी मिळण्याकरिता समन्वयातून डीपीसीकडे निधीची मागणी के ली आहे. त्यानुसार पुरेसा निधी उपलब्ध करून शैक्षणिक सत्रापूर्वी वर्गखोल्या दुरुस्त करण्याचा प्रयत्न आहे.- प्रियंका दगडकर, शिक्षण सभापतीअनेक शाळांतील जीर्ण वर्गखोल्यांची वादळी वाºयाने पडझड झाली आहे. त्यानुसार दुरुस्तीकरिता वरिष्ठस्तरावर पाठपुरावा केला आहे. यावर समन्वय ठेवून तोडगा काढण्याचा प्रयत्न होत आहे. शैक्षणिक सत्रापूर्वी शाळा दुरुस्त कशा करता येतील, यासाठी प्रशासनाचा प्रयत्न आहे.- नितीन उंडेउपशिक्षणाधिकारी (प्राथमिक)

टॅग्स :Schoolशाळा