शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

चांदूरबाजार तालुक्यात बैलांच्या संख्येत कमालीची घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:16 IST

मागिल पाच वर्षांत ४२ टक्याने घटली,नर गोवंशाची संख्या. शेतीची सुपिकता ढासळतेय, शेणखताची जागा रासायनिक खताला सुमित हरकुट-चांदूरबाजार : एकेकाळी ...

मागिल पाच वर्षांत ४२ टक्याने घटली,नर गोवंशाची संख्या.

शेतीची सुपिकता ढासळतेय, शेणखताची जागा रासायनिक खताला

सुमित हरकुट-चांदूरबाजार : एकेकाळी संपूर्ण गोवंश शेतकऱ्यांचे धन होते. यात नर गोवंश अर्थात बैल हा शेतकऱ्यांचा जिव की प्राण होता. खरे तर पूर्वीच्या काळी गोठ्यातील बैलजोडीच्या व गायींच्या संख्येवरून शेतकऱ्यांची "प्रतिष्ठा" ठरत होती. परंतु मागील १० वर्षांत शेतीत यांत्रिकीकरण आले. त्यामुळे बैलांची कामे यंत्राद्वारा व्हायला लागली. परिणामी चांदूर बाजार तालुक्यात बैलांच्या संख्येत कमालीची घट झाल्याचे चित्र समोर सन २०१८-१९ पशू गणनेत वरून स्पष्ट झाले.

दर पाच वर्षांनी राज्यात पशूगणना केली जाते. यात गोवंश, म्हैस वर्ग, शेळ्या, मेंढ्या, घोडे, गाढव, वराहांसह इतरही पशूंची गणना करण्यात येते. यात सन २०१२-२०१३ च्या पशूगणनेत तालुक्यात १६,६२० नर गोवंशाची संख्या होती. २०१८-२०१९ च्या गणनेत ही संख्या ९ हजार ४१० इतकी आहे. यावरून मागील पाच वर्षांत नर गोवंशाची, अर्थात बैलांची संख्या ७ हजार २१० ने घटली आहे. यावरून मागील पाच वर्षांत तालुक्यात, नर गोवंशाची संख्या, ४२ टक्क्यांनी घटली आहे.

तालुक्यातील शेती क्षेत्रात दरवर्षी १,४४२ इतक्या संख्येने बैलांची घट झाली आहे. शेतकऱ्यांकडील बैलांसह गायींच्या संख्येत, दिवसेंदिवस होणारी ही घट अतिशय चिंतेची बाब मानली जात आहे. गोवंशाच्या घटत्या संख्येमुळे शेतीची सुपीकता लयास जात आहे. याचा पिकांच्या उत्पादकतेवर मोठा परिणाम जाणवत आहे. शेतीत सेंद्रीय पदार्थाचे कमतरतेमुळे, पिकांची उत्पादकता टिकून राहत नाही. रासायनिक शेतीत काही वर्षे उत्पादकता चांगली येते. मात्र, रसायनांचा शेतातील मातीवर विपरीत परिणाम होऊन उत्पादकता घटण्यास सुरुवात होते. अलीकडे शेती न परवडणारा हे एक प्रमुख कारण असू शकते.

बैलाची संख्या घटण्यामागचे यांत्रिकीकरण प्रमुख कारण असले तरी, बैलजोडीची वाढलेली किंमत हेदेखील एक कारण आहे. दर्जेदार बैलजोडीची किंमत एक लाखापर्यंत आहे. अशातच जनावरांच्या वैरणाचाही प्रश्न दिवसेंदिवस बिकट होत चालला आहे. यामुळे शेती व्यवसायातील गोवंशाची घट होत आहे. ही घट अशीच कायम राहिल्यास भविष्यात पोळा भरवायलाही बैल सापडणार नाही. तेव्हा मातीच्या बैलांचा पोळा भरवावा लागेल. बैलांऐवजी ट्रॅक्टरचा पोळा भरविला जात आहे. हा गोवंश नष्ट होण्याचा संदेशच म्हणावा लागेल की काय? असे चिन्ह दिसत आहे. शेतकऱ्यांनी यांत्रिकीकरणाकडे वळताना शेतीची सुपिकता कायम राखण्यासाठी गोवंशाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.