शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Assembly Election Result 2025 Live Updates: 'किंगमेकर' झाला 'किंग' ! नितीश कुमारांच्या JDU ची जोरदार मुसंडी, भाजपचीही उत्तम साथ
2
Bihar Election Result 2025: शिंदेसेनेच्या नेत्याचा जावई बिहार निवडणुकीत पिछाडीवर; JDU ची आघाडी
3
Bihar Election 2025 Result: प्रशांत किशोर यांचे ३ उमेदवार आघाडीवर; एक्झिट पोल खरे ठरणार?
4
'निगेटिव्ह' झाली इलॉन मस्क यांची नेटवर्थ; एका झटक्यात ₹१८,२०,२५,८५,५०,००० चा फटका
5
Stock Market Today: सुरुवातीच्या व्यवहारात १०० अंकांपेक्षा अधिक घसरला बाजार, २५,८०० च्या खाली निफ्टी
6
IND vs SA 1st Test : गिल पुन्हा अनलकी; अखेर बावुमानं संपवली दक्षिण आफ्रिकेची 'साडेसाती'
7
Bihar Election 2025 Result: सुरुवातीचे कल हाती; BJP-RJD मध्ये काँटे की टक्कर, NDA आघाडीवर
8
Bihar Election: सरकार स्थापन करण्यासाठी किती जागा आवश्यक? समजून घ्या बहुमताचं गणित!
9
बॉलिवूड पार्ट्यांमध्ये अंडरवर्ल्डकडून ड्रग्ज सप्लाय; श्रद्धा कपूर, नोरा फतेही, ओरीसह टॉप सेलिब्रिटींची नावं आल्यानं खळबळ
10
ICUमध्ये धर्मेंद्र आणि देओल कुटुंबाचा गुपचूप व्हिडीओ बनवणं पडलं महागात, हॉस्पिटलचा कर्मचारी अटकेत
11
माझे काही फोटो अश्लील पद्धतीने...; अचानक व्हायरल झाल्यावर गिरीजा ओकने व्यक्त केली चिंता
12
बंडखोरीवर उपाय: अर्ज भरल्यावर भाजप जाहीर करणार उमेदवारांची यादी; ८०% नावे निश्चित
13
जबरदस्त रिटर्न देईल 'ही' स्कीम, केवळ ₹५,००० ची गुंतवणूक देईल ₹२६ लाखांपेक्षा जास्त फंड; पाहा कॅलक्युलेशन
14
दिल्लीत स्फोट घडवणाऱ्यांना कडक इशारा; मास्टरमाईंड डॉ. उमरचे पुलवामातील घर IED स्फोटकांनी उडवले!
15
आजचे राशीभविष्य, १४ नोव्हेंबर २०२५: सन्मान वाढेल, नोकरीत प्रगती होईल, बोलण्यावर संयम ठेवा!
16
३ राजयोगात उत्पत्ति एकादशी २०२५: ७ राशींना शुभ, उच्च पद मिळेल; अकल्पनीय लाभ, अनपेक्षित यश!
17
“अजित पवार सत्तेसाठी लाचार असल्याने ते सत्तेतून बाहेर पडण्याचा प्रश्नच नाही”; काँग्रेसची टीका
18
नितीशराज की तेजस्वी पर्व? बिहारचा आज फैसला
19
नगरपरिषद-नगरपंचायत निवडणुकांसाठी शिवसेनेचे प्रभारी जाहीर; DCM एकनाथ शिंदेंकडून घोषणा
20
रेल्वे प्रवाशांना पुन्हा खिंडीत गाठणार? ‘वर्क टू रुल’साठी सेंट्रल रेल्वे कर्मचारी करणार आंदोलन
Daily Top 2Weekly Top 5

चांदूरबाजार तालुक्यात बैलांच्या संख्येत कमालीची घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:16 IST

मागिल पाच वर्षांत ४२ टक्याने घटली,नर गोवंशाची संख्या. शेतीची सुपिकता ढासळतेय, शेणखताची जागा रासायनिक खताला सुमित हरकुट-चांदूरबाजार : एकेकाळी ...

मागिल पाच वर्षांत ४२ टक्याने घटली,नर गोवंशाची संख्या.

शेतीची सुपिकता ढासळतेय, शेणखताची जागा रासायनिक खताला

सुमित हरकुट-चांदूरबाजार : एकेकाळी संपूर्ण गोवंश शेतकऱ्यांचे धन होते. यात नर गोवंश अर्थात बैल हा शेतकऱ्यांचा जिव की प्राण होता. खरे तर पूर्वीच्या काळी गोठ्यातील बैलजोडीच्या व गायींच्या संख्येवरून शेतकऱ्यांची "प्रतिष्ठा" ठरत होती. परंतु मागील १० वर्षांत शेतीत यांत्रिकीकरण आले. त्यामुळे बैलांची कामे यंत्राद्वारा व्हायला लागली. परिणामी चांदूर बाजार तालुक्यात बैलांच्या संख्येत कमालीची घट झाल्याचे चित्र समोर सन २०१८-१९ पशू गणनेत वरून स्पष्ट झाले.

दर पाच वर्षांनी राज्यात पशूगणना केली जाते. यात गोवंश, म्हैस वर्ग, शेळ्या, मेंढ्या, घोडे, गाढव, वराहांसह इतरही पशूंची गणना करण्यात येते. यात सन २०१२-२०१३ च्या पशूगणनेत तालुक्यात १६,६२० नर गोवंशाची संख्या होती. २०१८-२०१९ च्या गणनेत ही संख्या ९ हजार ४१० इतकी आहे. यावरून मागील पाच वर्षांत नर गोवंशाची, अर्थात बैलांची संख्या ७ हजार २१० ने घटली आहे. यावरून मागील पाच वर्षांत तालुक्यात, नर गोवंशाची संख्या, ४२ टक्क्यांनी घटली आहे.

तालुक्यातील शेती क्षेत्रात दरवर्षी १,४४२ इतक्या संख्येने बैलांची घट झाली आहे. शेतकऱ्यांकडील बैलांसह गायींच्या संख्येत, दिवसेंदिवस होणारी ही घट अतिशय चिंतेची बाब मानली जात आहे. गोवंशाच्या घटत्या संख्येमुळे शेतीची सुपीकता लयास जात आहे. याचा पिकांच्या उत्पादकतेवर मोठा परिणाम जाणवत आहे. शेतीत सेंद्रीय पदार्थाचे कमतरतेमुळे, पिकांची उत्पादकता टिकून राहत नाही. रासायनिक शेतीत काही वर्षे उत्पादकता चांगली येते. मात्र, रसायनांचा शेतातील मातीवर विपरीत परिणाम होऊन उत्पादकता घटण्यास सुरुवात होते. अलीकडे शेती न परवडणारा हे एक प्रमुख कारण असू शकते.

बैलाची संख्या घटण्यामागचे यांत्रिकीकरण प्रमुख कारण असले तरी, बैलजोडीची वाढलेली किंमत हेदेखील एक कारण आहे. दर्जेदार बैलजोडीची किंमत एक लाखापर्यंत आहे. अशातच जनावरांच्या वैरणाचाही प्रश्न दिवसेंदिवस बिकट होत चालला आहे. यामुळे शेती व्यवसायातील गोवंशाची घट होत आहे. ही घट अशीच कायम राहिल्यास भविष्यात पोळा भरवायलाही बैल सापडणार नाही. तेव्हा मातीच्या बैलांचा पोळा भरवावा लागेल. बैलांऐवजी ट्रॅक्टरचा पोळा भरविला जात आहे. हा गोवंश नष्ट होण्याचा संदेशच म्हणावा लागेल की काय? असे चिन्ह दिसत आहे. शेतकऱ्यांनी यांत्रिकीकरणाकडे वळताना शेतीची सुपिकता कायम राखण्यासाठी गोवंशाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.