शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दिवाळीच्या ताेंडावर वीज दरवाढीचा 'उत्सव'; प्रति युनिट ३५ ते ९५ पैशांपर्यंत बिल वाढणार
2
कोजागरी पौर्णिमा केव्हा साजरी करायची? यंदा मध्यरात्रीच आली, पंचांगकर्ते दा. कृ. सोमण म्हणाले...
3
पैसेच नव्हते, मग दुसऱ्याच्या तुटलेल्या बॅटने खेळलो, जिंकलोही; तिलक वर्माने सांगितला आपला प्रवास
4
सगळे काही मराठा समाजालाच का? ओबीसी नेत्यांचा सवाल, मोर्चावर ठाम
5
आज हायव्होल्टेज लढत! भारत-पाकिस्तान महिला संघ आज भिडणार, हस्तांदोलन करणार? 
6
राज-उद्धव एकत्र आल्याने काही फरक पडणार नाही : गृहराज्यमंत्री योगेश कदम
7
रोहित शर्माची उचलबांगडी, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात शुभमन गिलकडे नेतृत्व; विराटसह संघात ठेवले हेच...
8
‘त्या’ कफ सिरपच्या नमुन्यांत भेसळ; उत्पादन, विक्री थांबवण्याचे आदेश
9
पाकव्याप्त काश्मीरमध्ये आंदोलन, शरीफ नरमले; आंदोलन मागेही घेतले
10
५० हजारांना मुलीची खरेदी; जबरीने लग्न
11
ईएमआय की एसआयपी? तुम्हाला कोण करेल श्रीमंत?
12
कफ सिरपने जीव घेणारी यंत्रणाच ‘विषारी’
13
बांबू मेंटॅलिटी असेल तर यश तुमचेच आहे...
14
परीक्षेचा अटॅक: ताण, चिंता इतकी वाढते की ज्यामुळे अभ्यासात लक्ष लागत नाही
15
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
16
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
17
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
18
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
19
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
20
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी

पीक विमा योजनेला अखेर मुदतवाढ

By admin | Updated: November 2, 2014 22:26 IST

हवामानावर आधारित पीक विमा योजनेला हरभरा पिकासाठी १५ नोव्हेंबर व गहू पिकासाठी ३० नोव्हेबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. जिल्ह्यात रबीची केवळ ६ टक्केच पेरणी झाली

अमरावती : हवामानावर आधारित पीक विमा योजनेला हरभरा पिकासाठी १५ नोव्हेंबर व गहू पिकासाठी ३० नोव्हेबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. जिल्ह्यात रबीची केवळ ६ टक्केच पेरणी झाली असताना ३१ आॅक्टोबरला या योजनेची मुदत संपली होती. शेतकऱ्यांना पीक विम्याचे संरक्षण कवच मिळावे यासाठी 'लोकमत'द्वारा सातत्याने पाठपुरावा करण्यात आला होता.राष्ट्रीय पीक विमा योजनेअंतर्गत हवामानावर आधारित पीक विमा योजना रबी हंगामातील हरभरा व गहू पिकासाठी जिल्ह्यात पथदर्शक स्वरुपात लागू करण्यात आली होती. या योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांना हरभरा पिकासाठी ३१ आॅक्टोबर व गहू पिकासाठी २२ नोव्हेंबर ही 'डेडलाईन' देण्यात आली होती. परंतु जिल्ह्यात रबी पिकाची पेरणी केवळ ६ टक्केच झाली असल्याने उर्वरित शेतकऱ्यांसाठी हा निर्णय अन्यायकारक होता. पीक पेरणीच झाली नसल्याने विमा कसा काढावा या संभ्रमात शेतकरी होता. त्याचवेळी कर्जदार सभासद शेतकऱ्यांसाठी ही योजना सक्तीची असल्याने त्यांच्या खात्यामधून पीक विमा हप्त्याची कपात करण्यात आली.पेरणीपूर्वीच कर्जकपात होत असल्याने शेतकऱ्यांच्या संतप्त भावना होत्या. या जनभावनेचा 'लोकमत'ने सातत्याने पाठपुरावा केला. परिणामी शुक्रवारी रात्री उशिरा महाराष्ट्र शासनाचे अवर सचिव शरद पावसकर यांनी हवामानावर आधारित रबी पीक विमा योजनेला मुदतवाढ दिल्याचे आदेश जारी केले आहे.