शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
3
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
4
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
5
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
6
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
7
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
8
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
9
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
10
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
11
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
12
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
13
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
14
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
15
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
16
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
17
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
18
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
19
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
20
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त

पीक विमा योजनेला अखेर मुदतवाढ

By admin | Updated: November 2, 2014 22:26 IST

हवामानावर आधारित पीक विमा योजनेला हरभरा पिकासाठी १५ नोव्हेंबर व गहू पिकासाठी ३० नोव्हेबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. जिल्ह्यात रबीची केवळ ६ टक्केच पेरणी झाली

अमरावती : हवामानावर आधारित पीक विमा योजनेला हरभरा पिकासाठी १५ नोव्हेंबर व गहू पिकासाठी ३० नोव्हेबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. जिल्ह्यात रबीची केवळ ६ टक्केच पेरणी झाली असताना ३१ आॅक्टोबरला या योजनेची मुदत संपली होती. शेतकऱ्यांना पीक विम्याचे संरक्षण कवच मिळावे यासाठी 'लोकमत'द्वारा सातत्याने पाठपुरावा करण्यात आला होता.राष्ट्रीय पीक विमा योजनेअंतर्गत हवामानावर आधारित पीक विमा योजना रबी हंगामातील हरभरा व गहू पिकासाठी जिल्ह्यात पथदर्शक स्वरुपात लागू करण्यात आली होती. या योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांना हरभरा पिकासाठी ३१ आॅक्टोबर व गहू पिकासाठी २२ नोव्हेंबर ही 'डेडलाईन' देण्यात आली होती. परंतु जिल्ह्यात रबी पिकाची पेरणी केवळ ६ टक्केच झाली असल्याने उर्वरित शेतकऱ्यांसाठी हा निर्णय अन्यायकारक होता. पीक पेरणीच झाली नसल्याने विमा कसा काढावा या संभ्रमात शेतकरी होता. त्याचवेळी कर्जदार सभासद शेतकऱ्यांसाठी ही योजना सक्तीची असल्याने त्यांच्या खात्यामधून पीक विमा हप्त्याची कपात करण्यात आली.पेरणीपूर्वीच कर्जकपात होत असल्याने शेतकऱ्यांच्या संतप्त भावना होत्या. या जनभावनेचा 'लोकमत'ने सातत्याने पाठपुरावा केला. परिणामी शुक्रवारी रात्री उशिरा महाराष्ट्र शासनाचे अवर सचिव शरद पावसकर यांनी हवामानावर आधारित रबी पीक विमा योजनेला मुदतवाढ दिल्याचे आदेश जारी केले आहे.