शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
3
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
4
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
5
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
6
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
7
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
8
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
9
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
10
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
11
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
12
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
13
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
14
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
15
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
16
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
17
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
18
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
19
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
20
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!

परीक्षा अर्जास ७ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2018 22:18 IST

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने सेमिस्टर पॅटर्न परीक्षेचा निकाल उशिरा जाहीर केल्याचा आर्थिक फटका विद्यार्थ्यांना बसू नये, यासाठी आॅक्टोबरच्या परीक्षा अर्जांना ७ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. शुक्रवारी घेतलेल्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

ठळक मुद्देविद्यापीठाचा निर्णय : सेमिस्टर पॅटर्नच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने सेमिस्टर पॅटर्न परीक्षेचा निकाल उशिरा जाहीर केल्याचा आर्थिक फटका विद्यार्थ्यांना बसू नये, यासाठी आॅक्टोबरच्या परीक्षा अर्जांना ७ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. शुक्रवारी घेतलेल्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.‘लोकमत’ने ३१ आॅगस्ट रोजी ‘विद्यापीठाने एकाच विद्यार्थिनीला दिल्या दोन गुणपत्रिका’ या शीर्षकाचे वृत्त प्रकाशित करून परीक्षा विभागाचा गलथान कारभार चव्हाट्यावर आणला. कुलगुरू मुरलीधर चांदेकर, प्र-कुलगुरू राजेश जयपूरकर यांनी या वृत्ताची दखल घेत आॅक्टोबरच्या परीक्षा अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला. त्याअनुषंगाने सेमिस्टर पॅटर्न परीक्षेचा अर्ज भरण्यास ७ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढीचा आदेश विद्यापीठाचे परीक्षा व मूल्यांकन विभागाचे संचालक हेमंत देशमुख यांच्या स्वाक्षरीने जारी झाला आहे. यामुळे विद्यार्थी व त्यांच्या पालकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागणार नाही, हे विशेष. बी.ए., बी.कॉम, बी.एस्सी भाग-२ सेमिस्टरच्या तृतीय परीेक्षेसाठी हा नियम लागू राहील. विद्यार्थ्यांकडून परीक्षा अर्ज ७ सप्टेंबरपर्यंत, तर महाविद्यालयांना विद्यापीठात परीक्षा अर्ज १५ सप्टेंबरपर्यंत सादर करावे लागतील. महाविद्यालये विद्यार्थ्यांकडून विहीत विलंब शुल्कासह १४ सप्टेंबरपर्यंत अर्ज स्वीकारतील, तर महाविद्यालयांना विद्यापीठास १९ सप्टेंबरपर्यंत परीक्षा अर्ज सादर करावे लागणार आहेत, असे आदेशात नमूद केले आहे.उशिरा निकालाचा भुर्दंड आम्ही का भरावा?चांदूर रेल्वे येथील कला, वाणिज्य महिला महाविद्यालयातील विद्यार्थिनींना बी.ए. भाग १ (सेमिस्टर २) निकालाची गुणपत्रिका २५ आॅगस्ट रोजी मिळाली. या गुणपत्रिकेवर ४ आॅगस्ट रोजी निकाल जाहीर झाल्याचे अंकीत आहे. दरम्यान, परीक्षा अर्जासोबत विलंब शुल्क भरण्याची सक्ती महाविद्यालयाकडून करण्यात आली. परंतु, गुणपत्रिका विलंबाने मिळाल्या, तर भुर्दंड कशासाठी भरावा, असे गाºहाणे शुंभागी घोरपडे, स्नेहल गोंडाने, सोनाली विरूडकर, भारती भगत, मीरा चव्हाण, नेहा पाटमासे आदींनी प्राचार्यांपुढे मांडले.गरीब, सामान्य विद्यार्थ्यांनी परीक्षा अर्ज विलंब शुल्क का सहन करावा, हादेखील महत्त्वाचा भाग आहे. परंतु, विद्यापीठाने परीक्षा अर्ज भरण्यास मुदतवाढ दिल्यामुळे विद्यार्थ्यांना न्याय मिळाला आहे.- प्रा. प्रदीप दंदेजिल्हाध्यक्ष, रिपाइं