शहरं
Join us  
Trending Stories
1
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
2
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
3
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा
4
IPL 2025: लखनौच्या अडचणीत वाढ, दुखापतीमुळं मयांक यादव आयपीएलमधून बाहेर!
5
Shiv Sena: पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील संशयितांची माहिती देणाऱ्याला १० लाख रुपयांचे बक्षीस
6
भारताचा तुर्कीला दणका, विमानतळांवर सेवा देणाऱ्या सेलेबी कंपनीची सुरक्षा मंजुरी केली रद्द!
7
बिहार दौऱ्यात राहुल गांधी यांच्याविरोधात दोन गुन्हे दाखल, पोलिसांनी शंभराहून अधिक जणांना केलं आरोपी
8
India Pakistan Ceasefire: "भारत-पाकिस्तान यांच्यात १८ मेपर्यंत शस्त्रसंधी"; पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री डार यांचे विधान
9
आधी ट्रम्प यांच्यावर भडकली, नंतर पोस्ट डिलीट; कंगना म्हणाली, "जेपी नड्डांनी डिलीट करायला सांगितली"
10
ED Raid: 23 कोटींचं सोनं, 8 कोटी रोख; वसई विरार मनपाचे नगररचना उपसंचालक रेड्डीकडे सापडली कोट्यवधींची माया
11
Donald Trump : "मी असं म्हणत नाही की..."; भारत-पाकिस्तान युद्धविरामावर मोठे दावे करणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांची पलटी
12
सुटी रद्द झाल्याने कामावर परतणाऱ्या मेजरवर काळाचा घाला; डोळ्यादेखत पत्नीचा मृत्यू, लेक गंभीर जखमी
13
'पाकिस्तानशी फक्त दहशतवाद अन् PoK वर चर्चा होईल; तिसऱ्याचा हस्तक्षेप खपवून घेणार नाही'
14
'गदर'मधला दरम्यान सिंग आठवतोय का? एका आजारामुळे झालं होत्याचं नव्हतं, अभिनेत्याचा झाला दुर्देवी शेवट
15
व्यापाऱ्यांनी कोणाच्या धमकीला भीक घालू नये; आम्ही तुमच्या पाठीशी आहोत - देवेंद्र फडणवीस
16
इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; 'लेडी सेहवाग'ला मिळाली कमबॅकची संधी
17
अटक करण्याची धमकी देत मागितली खंडणी: उल्हासनगर पोलीस ठाण्यातील दोन पोलीस निलंबित
18
Crime: निवृत्त न्यायाधीशाच्या दोन मुले आणि सुनेला जन्मठेपेची शिक्षा; 2007 मधील प्रकरण काय?
19
Motivational Story: वडिलांचं सायकल दुरूस्तीचं दुकान, कष्टाची जाणीव ठेवून मुलानं दहावीत मिळवले घवघवीत यश
20
आश्चर्यकारक! आरोपीने बलात्कार पिडितेला भरकोर्टात केलं 'प्रपोज'; सर्वोच्च न्यायालयातील प्रसंग

परीक्षा अर्जास ७ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2018 22:18 IST

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने सेमिस्टर पॅटर्न परीक्षेचा निकाल उशिरा जाहीर केल्याचा आर्थिक फटका विद्यार्थ्यांना बसू नये, यासाठी आॅक्टोबरच्या परीक्षा अर्जांना ७ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. शुक्रवारी घेतलेल्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

ठळक मुद्देविद्यापीठाचा निर्णय : सेमिस्टर पॅटर्नच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने सेमिस्टर पॅटर्न परीक्षेचा निकाल उशिरा जाहीर केल्याचा आर्थिक फटका विद्यार्थ्यांना बसू नये, यासाठी आॅक्टोबरच्या परीक्षा अर्जांना ७ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. शुक्रवारी घेतलेल्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.‘लोकमत’ने ३१ आॅगस्ट रोजी ‘विद्यापीठाने एकाच विद्यार्थिनीला दिल्या दोन गुणपत्रिका’ या शीर्षकाचे वृत्त प्रकाशित करून परीक्षा विभागाचा गलथान कारभार चव्हाट्यावर आणला. कुलगुरू मुरलीधर चांदेकर, प्र-कुलगुरू राजेश जयपूरकर यांनी या वृत्ताची दखल घेत आॅक्टोबरच्या परीक्षा अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला. त्याअनुषंगाने सेमिस्टर पॅटर्न परीक्षेचा अर्ज भरण्यास ७ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढीचा आदेश विद्यापीठाचे परीक्षा व मूल्यांकन विभागाचे संचालक हेमंत देशमुख यांच्या स्वाक्षरीने जारी झाला आहे. यामुळे विद्यार्थी व त्यांच्या पालकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागणार नाही, हे विशेष. बी.ए., बी.कॉम, बी.एस्सी भाग-२ सेमिस्टरच्या तृतीय परीेक्षेसाठी हा नियम लागू राहील. विद्यार्थ्यांकडून परीक्षा अर्ज ७ सप्टेंबरपर्यंत, तर महाविद्यालयांना विद्यापीठात परीक्षा अर्ज १५ सप्टेंबरपर्यंत सादर करावे लागतील. महाविद्यालये विद्यार्थ्यांकडून विहीत विलंब शुल्कासह १४ सप्टेंबरपर्यंत अर्ज स्वीकारतील, तर महाविद्यालयांना विद्यापीठास १९ सप्टेंबरपर्यंत परीक्षा अर्ज सादर करावे लागणार आहेत, असे आदेशात नमूद केले आहे.उशिरा निकालाचा भुर्दंड आम्ही का भरावा?चांदूर रेल्वे येथील कला, वाणिज्य महिला महाविद्यालयातील विद्यार्थिनींना बी.ए. भाग १ (सेमिस्टर २) निकालाची गुणपत्रिका २५ आॅगस्ट रोजी मिळाली. या गुणपत्रिकेवर ४ आॅगस्ट रोजी निकाल जाहीर झाल्याचे अंकीत आहे. दरम्यान, परीक्षा अर्जासोबत विलंब शुल्क भरण्याची सक्ती महाविद्यालयाकडून करण्यात आली. परंतु, गुणपत्रिका विलंबाने मिळाल्या, तर भुर्दंड कशासाठी भरावा, असे गाºहाणे शुंभागी घोरपडे, स्नेहल गोंडाने, सोनाली विरूडकर, भारती भगत, मीरा चव्हाण, नेहा पाटमासे आदींनी प्राचार्यांपुढे मांडले.गरीब, सामान्य विद्यार्थ्यांनी परीक्षा अर्ज विलंब शुल्क का सहन करावा, हादेखील महत्त्वाचा भाग आहे. परंतु, विद्यापीठाने परीक्षा अर्ज भरण्यास मुदतवाढ दिल्यामुळे विद्यार्थ्यांना न्याय मिळाला आहे.- प्रा. प्रदीप दंदेजिल्हाध्यक्ष, रिपाइं