शहरं
Join us  
Trending Stories
1
काय सांगता..! २,६५२ लाडक्या बहिणी निघाल्या सरकारी कर्मचारी, शासन करणार वसुली
2
आजचे राशीभविष्य: शुक्रवार 30 मे 2025; शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, नोकरी-व्यवसायात उत्साहित होऊन कामे कराल
3
पाक करणार होता हल्ला; पण भारताच्या ब्रह्मोसमुळे फसला, पंतप्रधान शाहबाज शरीफ यांची कबुली
4
महापालिकेच्या निवडणुका सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये, महायुती म्हणून एकत्र लढणार : चंद्रशेखर बावनकुळे
5
पाकिस्तानी हेराचा हनी ट्रॅप; अभियंत्याला ठाण्यात अटक, डॉकयार्डमध्ये होता अभियंता
6
थकला-भागला 'विक्रम'; हमीभाव ठरविण्याची एकूण प्रक्रियाच संशयाच्या भोवऱ्यात
7
जोर ओसरतोय, पेरणीची घाई नको, ५ ते ६ दिवस पावसाची तीव्रता कमी असेल
8
IPL 2025 : रजतच्या नेतृत्वाखाली RCB संघाला 'सुवर्ण' संधी! पंजाबला शह देत थेट फायनलमध्ये एन्ट्री
9
ईडीच्या उपसंचालकांना लाच घेतल्याप्रकरणी सीबीआयने ताब्यात घेतले; नेमकं प्रकरण काय?
10
युद्धविराममध्ये कधीही व्यापाराचा उल्लेख नव्हता; भारताने ट्रम्प यांच्या टॅरिफ दाव्यांना पुन्हा एकदा नाकारले
11
वैष्णवी तर गेलीच आहे, आता वाईट बोलू नका; वडिल अनिल कस्पटेंच्या भावनांचा बांध फुटला
12
Vinayak Chaturthi 2025: सद्गुरू वामनराव पै सिद्धीविनायकाकडे काय मागावं हे सांगताहेत!
13
RCB vs PBKS : कोहलीचं सेलिब्रेशन बघून अनुष्का शर्माला आलं हसू; तो व्हिडिओ होतोय व्हायरल
14
धारावीत निम्मी जागा सार्वजनिक वापरासाठी; उर्वरित जागेत पुनर्वसन, नूतनीकरणाचे होणार काम
15
'डिजिटल अरेस्ट'च्या नावाखाली महिलेची १ कोटी ८१ लाखांची फसवणूक; गुन्हे शाखेच्या कारवाईत टोळीचा पर्दाफाश
16
Covid-19 च्या डेल्टा व्हेरिएंटमुळे सायलेंट हॉर्ट अटॅक वाढले, आयआयटी इंदूरच्या अहवालात खुलासा
17
Ola Electric Q4 results: 'ओला'चे डोळे ओले! तोटा वाढून ₹८६० कोटींवर, महसुलातही ५९% ची घसरण
18
पाकिस्तानात गेलेल्या महिलेने हेरगिरी केल्याचा संशय, नागपुरात गुन्हा दाखल
19
राज्यसभेच्या ८ जागांसाठी १९ जूनला मतदान; मतांचे गणित जुळवणं सत्ताधाऱ्यांसमोर आव्हान

खर्च २७ हजार, हाती आले १२ हजार; सांगा कसेभागायचे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2017 23:39 IST

‘एकाचे दहा हजार’ करण्याची धमक शेतकºयांमध्ये आहे, हे गृहीत धरून त्यांच्यासाठी शासनाने अनेक योजना आणल्या.

ठळक मुद्देसमृद्धीच्या योजना कागदावरच शेतकºयांच्या कर्जाच्या खाईत गटांगळ्या

धीरेंद्र चाकोलकर ।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : ‘एकाचे दहा हजार’ करण्याची धमक शेतकºयांमध्ये आहे, हे गृहीत धरून त्यांच्यासाठी शासनाने अनेक योजना आणल्या. मात्र, त्या कागदावरच आहेत, तर शासकीय यंत्रणा नवीन पिकांच्या प्रचार-प्रसाराबाबत उदासीन आहे. त्यामुळे चांदूर रेल्वे तालुक्यातील श्यामराव देशमुख यांच्यासारख्या अनेक शेतकºयांची पारंपरिक पिके काढून कर्जबाजारी होण्यातच जिंदगानी चालली आहे.बोरी येथे भाऊराव श्यामराव देशमुख यांचे ४ एकर १८ गुंठे (१ हेक्टर ७८ आर) शेती आहे. त्यांनी यंदा खरिपातील पेरणीसाठी ६६ हजार रुपये बँकेकडून कर्जाची उचल केली आणि शेतात सोयाबीन व तुरीचा पेरा केला. शेती तयार करण्यापासून पीक बाजारात विकण्यापर्यंत आलेला एकूण खर्च २७ हजार ५०० रुपये त्यांनी टिपणवहीत नोंदवून ठेवला. ही रक्कम पिकांकरिता वारेमाप खर्च करणाºया इतर शेतकºयांच्या तुलनेत माफक असली तरी त्यांना झालेल्या उत्पन्नाचा आकडा पाहता, तीन महिने घेतलेल्या अफाट कष्टाचे चीज झाले काय, असा प्रश्न पडतो. या चार एकरातून काढलेल्या ९ क्विंचल ६५ किलो सोयाबीनची त्यांनी बाजारात विक्री केली असता, १४ हजार ६०४ रुपये त्यांच्या हातात पडले. त्यांना आताच १३ हजार रुपये तोटा सहन करावा लागला आहे. शेतात उभी असलेली तूर थेट मार्चमध्ये हाती येईल तोपर्यंत व्यवहार कशावर भागवायचे, हा त्यांचा थेट प्रश्न आहे.भावही पडले : गेल्या दोन वर्षांपासून शेतमालाची हमीभावापेक्षा कमी दराने शेतकºयांकडून व्यापारी खरेदी करीत आहेत. अमरावती येथील कृषिउत्पन्न बाजार समितीत विकूनही अवघा १५५० रुपये प्रतिक्विंटल भावाने ९६५ किलो सोयाबीनचे १४ हजार ७९८ रुपये अडत्याने नोंदवले. त्यामधूनही अडत, मापाई, फुडाई, उतराई, कटाई असे मिळून १८४ रुपये कापून घेण्यात आले. त्यामुळे १४ हजार ६०४ रुपये देशमुख यांच्या हाती पडले.कृषी विभागाच्या योजना कोणासाठी?एम किसान, शेतकरी उत्पादक कंपनी, जमीन आरोग्य पत्रिका, गुणवत्तापूर्ण बियाणे व खतांची उपलब्धता, मागेल त्याला शेततळे, प्रधानमंत्री कृषिसिंचन योजना, कृषी यांत्रिकीकरण, आंतरपीक पद्धतीस प्रोत्साहन, फलोत्पादन वृद्धीसाठी विशेष अभियान आदी शासकीय उपक्रम व योजना राबविल्या जातात. तरीही शेतकरी दुष्काळाच्या खाईत लोटला जात आहे. या योजना नेमक्या कोणासाठी, याबाबत शेतकºयांमध्ये अनभिज्ञता व ग्रामपातळीवर जनजागृतीबाबत औदासीन्य आहे.उत्पादन घटलेकाही वर्षांपूर्वी सोयाबीनचे हमखास पीक मानले जायचे. मात्र, त्याची उत्पादकता अलीकडच्या वर्षांमध्ये घटत आहे. यंदा एकरी किमान पाच क्विंटल उत्पादन अपेक्षित असताना केवळ दोन-अडीच क्विंटल प्रतिएकर उतारा मिळाला. त्याचा परिणाम उत्पन्नावर झाला.