शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

खर्च २७ हजार, हाती आले १२ हजार; सांगा कसेभागायचे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2017 23:39 IST

‘एकाचे दहा हजार’ करण्याची धमक शेतकºयांमध्ये आहे, हे गृहीत धरून त्यांच्यासाठी शासनाने अनेक योजना आणल्या.

ठळक मुद्देसमृद्धीच्या योजना कागदावरच शेतकºयांच्या कर्जाच्या खाईत गटांगळ्या

धीरेंद्र चाकोलकर ।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : ‘एकाचे दहा हजार’ करण्याची धमक शेतकºयांमध्ये आहे, हे गृहीत धरून त्यांच्यासाठी शासनाने अनेक योजना आणल्या. मात्र, त्या कागदावरच आहेत, तर शासकीय यंत्रणा नवीन पिकांच्या प्रचार-प्रसाराबाबत उदासीन आहे. त्यामुळे चांदूर रेल्वे तालुक्यातील श्यामराव देशमुख यांच्यासारख्या अनेक शेतकºयांची पारंपरिक पिके काढून कर्जबाजारी होण्यातच जिंदगानी चालली आहे.बोरी येथे भाऊराव श्यामराव देशमुख यांचे ४ एकर १८ गुंठे (१ हेक्टर ७८ आर) शेती आहे. त्यांनी यंदा खरिपातील पेरणीसाठी ६६ हजार रुपये बँकेकडून कर्जाची उचल केली आणि शेतात सोयाबीन व तुरीचा पेरा केला. शेती तयार करण्यापासून पीक बाजारात विकण्यापर्यंत आलेला एकूण खर्च २७ हजार ५०० रुपये त्यांनी टिपणवहीत नोंदवून ठेवला. ही रक्कम पिकांकरिता वारेमाप खर्च करणाºया इतर शेतकºयांच्या तुलनेत माफक असली तरी त्यांना झालेल्या उत्पन्नाचा आकडा पाहता, तीन महिने घेतलेल्या अफाट कष्टाचे चीज झाले काय, असा प्रश्न पडतो. या चार एकरातून काढलेल्या ९ क्विंचल ६५ किलो सोयाबीनची त्यांनी बाजारात विक्री केली असता, १४ हजार ६०४ रुपये त्यांच्या हातात पडले. त्यांना आताच १३ हजार रुपये तोटा सहन करावा लागला आहे. शेतात उभी असलेली तूर थेट मार्चमध्ये हाती येईल तोपर्यंत व्यवहार कशावर भागवायचे, हा त्यांचा थेट प्रश्न आहे.भावही पडले : गेल्या दोन वर्षांपासून शेतमालाची हमीभावापेक्षा कमी दराने शेतकºयांकडून व्यापारी खरेदी करीत आहेत. अमरावती येथील कृषिउत्पन्न बाजार समितीत विकूनही अवघा १५५० रुपये प्रतिक्विंटल भावाने ९६५ किलो सोयाबीनचे १४ हजार ७९८ रुपये अडत्याने नोंदवले. त्यामधूनही अडत, मापाई, फुडाई, उतराई, कटाई असे मिळून १८४ रुपये कापून घेण्यात आले. त्यामुळे १४ हजार ६०४ रुपये देशमुख यांच्या हाती पडले.कृषी विभागाच्या योजना कोणासाठी?एम किसान, शेतकरी उत्पादक कंपनी, जमीन आरोग्य पत्रिका, गुणवत्तापूर्ण बियाणे व खतांची उपलब्धता, मागेल त्याला शेततळे, प्रधानमंत्री कृषिसिंचन योजना, कृषी यांत्रिकीकरण, आंतरपीक पद्धतीस प्रोत्साहन, फलोत्पादन वृद्धीसाठी विशेष अभियान आदी शासकीय उपक्रम व योजना राबविल्या जातात. तरीही शेतकरी दुष्काळाच्या खाईत लोटला जात आहे. या योजना नेमक्या कोणासाठी, याबाबत शेतकºयांमध्ये अनभिज्ञता व ग्रामपातळीवर जनजागृतीबाबत औदासीन्य आहे.उत्पादन घटलेकाही वर्षांपूर्वी सोयाबीनचे हमखास पीक मानले जायचे. मात्र, त्याची उत्पादकता अलीकडच्या वर्षांमध्ये घटत आहे. यंदा एकरी किमान पाच क्विंटल उत्पादन अपेक्षित असताना केवळ दोन-अडीच क्विंटल प्रतिएकर उतारा मिळाला. त्याचा परिणाम उत्पन्नावर झाला.