शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: भाजपाने शंभरचा आकडा केला पार, काँग्रेस १९, ठाकरेंची शिवसेना ९; जाणून घ्या नगर पंचायत अन् नगर परिषदेचे निकाल
2
Vengurla Nagar Parishad Election Result 2025: दीपक केसरकरांना धक्का, वेंगुर्ल्यात भाजपाचा ७ जागांवर विजय; शिंदेसेनेला मिळाली १ जागा
3
'देश सोडू नका, अन्यथा परतणे कठीण'; अमेरिकेत नोकरी करणाऱ्या भारतीयांना गुगलचा इशारा!
4
अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी
5
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
6
Maharashtra Local Body Election Results 2025: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
7
BSF काँस्टेबल भरतीत माजी अग्निवीरांना 50% आरक्षण; वयोमर्यादेतही मोठी सवलत, केंद्राचा निर्णय
8
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
9
नात्याला काळीमा! विम्याच्या पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
10
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
11
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
12
घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली...
13
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
14
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
15
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
16
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
17
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
18
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
19
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
20
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
Daily Top 2Weekly Top 5

खर्च २७ हजार, हाती आले १२ हजार; सांगा कसेभागायचे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2017 23:39 IST

‘एकाचे दहा हजार’ करण्याची धमक शेतकºयांमध्ये आहे, हे गृहीत धरून त्यांच्यासाठी शासनाने अनेक योजना आणल्या.

ठळक मुद्देसमृद्धीच्या योजना कागदावरच शेतकºयांच्या कर्जाच्या खाईत गटांगळ्या

धीरेंद्र चाकोलकर ।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : ‘एकाचे दहा हजार’ करण्याची धमक शेतकºयांमध्ये आहे, हे गृहीत धरून त्यांच्यासाठी शासनाने अनेक योजना आणल्या. मात्र, त्या कागदावरच आहेत, तर शासकीय यंत्रणा नवीन पिकांच्या प्रचार-प्रसाराबाबत उदासीन आहे. त्यामुळे चांदूर रेल्वे तालुक्यातील श्यामराव देशमुख यांच्यासारख्या अनेक शेतकºयांची पारंपरिक पिके काढून कर्जबाजारी होण्यातच जिंदगानी चालली आहे.बोरी येथे भाऊराव श्यामराव देशमुख यांचे ४ एकर १८ गुंठे (१ हेक्टर ७८ आर) शेती आहे. त्यांनी यंदा खरिपातील पेरणीसाठी ६६ हजार रुपये बँकेकडून कर्जाची उचल केली आणि शेतात सोयाबीन व तुरीचा पेरा केला. शेती तयार करण्यापासून पीक बाजारात विकण्यापर्यंत आलेला एकूण खर्च २७ हजार ५०० रुपये त्यांनी टिपणवहीत नोंदवून ठेवला. ही रक्कम पिकांकरिता वारेमाप खर्च करणाºया इतर शेतकºयांच्या तुलनेत माफक असली तरी त्यांना झालेल्या उत्पन्नाचा आकडा पाहता, तीन महिने घेतलेल्या अफाट कष्टाचे चीज झाले काय, असा प्रश्न पडतो. या चार एकरातून काढलेल्या ९ क्विंचल ६५ किलो सोयाबीनची त्यांनी बाजारात विक्री केली असता, १४ हजार ६०४ रुपये त्यांच्या हातात पडले. त्यांना आताच १३ हजार रुपये तोटा सहन करावा लागला आहे. शेतात उभी असलेली तूर थेट मार्चमध्ये हाती येईल तोपर्यंत व्यवहार कशावर भागवायचे, हा त्यांचा थेट प्रश्न आहे.भावही पडले : गेल्या दोन वर्षांपासून शेतमालाची हमीभावापेक्षा कमी दराने शेतकºयांकडून व्यापारी खरेदी करीत आहेत. अमरावती येथील कृषिउत्पन्न बाजार समितीत विकूनही अवघा १५५० रुपये प्रतिक्विंटल भावाने ९६५ किलो सोयाबीनचे १४ हजार ७९८ रुपये अडत्याने नोंदवले. त्यामधूनही अडत, मापाई, फुडाई, उतराई, कटाई असे मिळून १८४ रुपये कापून घेण्यात आले. त्यामुळे १४ हजार ६०४ रुपये देशमुख यांच्या हाती पडले.कृषी विभागाच्या योजना कोणासाठी?एम किसान, शेतकरी उत्पादक कंपनी, जमीन आरोग्य पत्रिका, गुणवत्तापूर्ण बियाणे व खतांची उपलब्धता, मागेल त्याला शेततळे, प्रधानमंत्री कृषिसिंचन योजना, कृषी यांत्रिकीकरण, आंतरपीक पद्धतीस प्रोत्साहन, फलोत्पादन वृद्धीसाठी विशेष अभियान आदी शासकीय उपक्रम व योजना राबविल्या जातात. तरीही शेतकरी दुष्काळाच्या खाईत लोटला जात आहे. या योजना नेमक्या कोणासाठी, याबाबत शेतकºयांमध्ये अनभिज्ञता व ग्रामपातळीवर जनजागृतीबाबत औदासीन्य आहे.उत्पादन घटलेकाही वर्षांपूर्वी सोयाबीनचे हमखास पीक मानले जायचे. मात्र, त्याची उत्पादकता अलीकडच्या वर्षांमध्ये घटत आहे. यंदा एकरी किमान पाच क्विंटल उत्पादन अपेक्षित असताना केवळ दोन-अडीच क्विंटल प्रतिएकर उतारा मिळाला. त्याचा परिणाम उत्पन्नावर झाला.