शहरं
Join us  
Trending Stories
1
KL राहुलच्या 'सेल्फिश सेंच्युरी'सह पंतची चूक नडली? शुबमन गिल म्हणाला, मॅच तिथंच फिरली; पण...
2
भारत-इंग्लंड मालिकेतून 'हा' स्टार खेळाडू बाहेर ! हाताला गंभीर दुखापत, लवकरच शस्त्रक्रिया होणार
3
ठाण्यात पाच विद्यार्थिनींचा एकाच तरुणाकडून विनयभंग; पालकांमध्ये संताप; फरार आरोपीच्या अटकेची मागणी
4
टेस्टमधील खतरनाक स्पेल! स्टार्कनं १५ चेंडूत २ धावा खर्च करत साधला ५ विकेट्सचा विश्वविक्रमी डाव
5
IND vs ENG : या चौघांपैकी एकानं बुमराह-सिराजसारखा 'दम' दाखवला असता तर मॅच सहज जिंकता आली असती
6
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
7
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
8
हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला... टीम इंडिया कुठे चुकली? वाचा, पराभवाची ५ कारणे
9
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
10
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
11
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
12
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
13
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
14
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
15
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
16
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
17
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
18
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
19
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
20
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग

एसटी वाहकाची चिल्लरसाठी कसरत

By admin | Updated: May 17, 2015 00:47 IST

राज्य परिवहन महामंडळाच्या वाहकाला मिळणारी अग्रीम धनाची रक्कम आता १०० रुपये झाली आहे.

डोकेदुखी वाढली : अग्रीम धन १० रुपयांवरुन १०० रुपयांवर अमरावती : राज्य परिवहन महामंडळाच्या वाहकाला मिळणारी अग्रीम धनाची रक्कम आता १०० रुपये झाली आहे. मात्र एसटीच्या बँकेकडून वाहकाला चिल्लरऐवजी शंभरची एक नोट अथवा काही नोटा मिळतात. त्यामुळे प्रवासादरम्यान चिल्लरवरुन प्रवासी वर्गासोबत वाहकाला सतत तोंड द्यावे लागत आहे. एसटीचे वाहक प्रवास भाड्याची रक्कम तिकीट देऊन जमा करतात. महामंडळाचे उत्पन्न ज्याच्या हातून येते, त्या वाहकाला एसटीच्या बँकेकडून १० रुपयांचे अंतिम धन दिले जात आहे. १० रुपयांमध्ये चिल्लरचा समावेश असावा, असाही आग्रह धरला होता. मात्र त्याकडे प्रशासनाने कायम दुर्लक्ष केले. त्यामुळे वाहकाला नोकरीमध्येच प्रचंड असलेला त्रास कमी झालाच नाही. प्रवाशाने तिकीट काढल्यानंतर त्याला उर्वरित रक्कम परत देण्यासाठी प्रवाशांकडूनच येणाऱ्या चिल्लर रुपयांवर आजही वाहकाला विसंबून राहावे लागते. त्यानंतरही चिल्लर जमा न झाल्यास अनेक प्रवासी पैशावरुन वाहकांसोबत वाद घालतात. बऱ्याचदा प्रवाशाचे लक्ष नसल्यास उर्वरित रक्कम घेण्याचे लक्षात राहत नसल्याने त्यांना आर्थिक झळ सोसावी लागत आहे. अग्रीम धनाची रक्कम वाढविण्याची मागणी वाहकांनी महामंडळाकडे केली होती. बऱ्याचदा प्रवाशाचे लक्ष नसल्यास उर्वरित रक्कम घेण्याचे लक्षात राहत नसल्याने त्यांना आर्थिक झळ सोसावी लागत आहे. अग्रीम धनाची रक्कम वाढविण्याची मागणी वाहकांनी महामंडळाकडे केली होती. मात्र बऱ्याच अवधीनंतर त्यांची मागणी पाच महिन्यांपूर्वी पूर्ण करण्यात आली आहे. आता अग्रीम धन म्हणून १०० रुपयांची रक्कम एसटी बँकेकडून वाहकांना मिळत आहे. मात्र सध्याच्या काळात ही रक्कम फारच कमी आहे. त्यातच वाहकांना शंभरची नोटी दिली जाते. काहीना थोड्या फार दहा वीस पन्नासच्या नोटा मिळून शंभर रुपये दिले जातात. परंतु चिल्लर रक्कम वाहकांना मिळत नाही. शिवाय प्रशासनाकडून तसे प्रयत्न केले जात नसल्याची खंत वाहकांनी केली. सध्याही वाहकांजवळ चिल्लर रक्कम राहत नसल्याने प्रवाशांसोबत वाद होत असल्याचे चित्र पाहावयास मिळते. यासाठी उपाययोजना करण्याची गरज आहे. वादामुळे प्रवासी होतात त्रस्तबसमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रवासी वर्गाची गर्दी राहते. चिल्लर रक्कम परत घेण्यावरुन प्रवाशांसोबत वाहकांचे वाद होतात. या वादामुळे बसमध्ये असलेल्या इतर प्रवासी वर्गाला विनाकारणच त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे अशा बसचा संपूर्ण प्रवास हा कंटाळवाणा होत असल्याचे चित्र निर्माण होत आहे.