शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
4
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
5
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
6
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
7
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
8
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
9
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
10
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
11
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
12
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
13
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
14
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
15
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
16
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
17
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
18
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
19
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
20
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या

गणित, भौतिकशास्त्र वगळल्याने ‘अभियांत्रिकी’ होणार कमकुवत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:13 IST

अमरावती : अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेच्या (एआयसीटीई) निर्णयानुसार गणित, भौतिकशास्त्र व रसायनशास्त्र ह विषय बारावीला न घेताही विद्यार्थी अभियांत्रिकी ...

अमरावती : अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेच्या (एआयसीटीई) निर्णयानुसार गणित, भौतिकशास्त्र व रसायनशास्त्र ह विषय बारावीला न घेताही विद्यार्थी अभियांत्रिकी अभ्यासक्रमांच्या पहिल्या वर्षाला प्रवेश घेऊ शकतील. मात्र, हा निर्णय रिक्त जागा भरण्यासाठी घेतला असला तरी हा निर्णय म्हणजे ‘अभियांत्रिकी’ कमकुवत करण्याचा प्रकार होय, असा प्रश्न तज्ज्ञांनी उपस्थित केला आहे.

गणित, भौतिकशास्त्र हे दोन विषय सिव्हिल, मॅकेनिकल व इलेक्ट्रिकल या अभियांत्रिकीच्या मुख्य शाखांचा कणा मानला जातो. त्यामुळे अकरावी, बारावीला या विषयाचे ज्ञान न घेता अभियांत्रिकीचे शिक्षण घेतल्यास विद्यार्थी कौशल्य आत्मसात करू शकणार नाहीत, असे मत ठामपणे तज्ज्ञांनी वर्तविले आहे. तर, दुसरीकडे असाही सूर उमटत आहे की, नवीन शैक्षणिक धोरणात जागतिक स्तरावर सारखेच शिक्षण उपलब्ध व्हावे, याचा विचार करण्यात आला आहे. त्यामुळे एआयसीटीईने हा नवा पायंडा पाडला असावा, असाही सूर पुढे आला आहे.

बारावीला या गणित, भौतिकशास्त्र विषयाचे शिक्षण न घेता अभियांत्रिकीला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयाने किंवा विद्यापीठाने स्वतंत्र मार्गदर्शन वर्ग (ब्रिज कोर्स) तयार करावेत, असाही सूर उमटत आहे. जिल्ह्यात शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयासह विनाअनुदानित अभियांत्रिकी दहा महाविद्यालये असून, २० हजार विद्यार्थी संख्या आहे.

------------------

गणित, भौतिकशास्त्राविना कसा घडेल विद्यार्थी

गणित, भौतिकशास्त्रविना ‘अभियांत्रिकी’ पूर्ण होऊ शकत नाही. अकरावी, बारावीत हे विषय नसले तरी पुढे अभियांत्रिकी अभ्यासक्रमात असणे आवश्यक करावे. त्यामुळे विद्यार्थी कसा घडेल, हा प्रश्न आहे. अभियांत्रिकी अभ्यासक्रमाची पदवी सर्वांना घेता यावी यासाठी हा निर्णय सर्वसमावेशक आहे. तथापि, अभियांत्रिकीचे अभ्यासक्रम घेताना हे दोनही विषय असावेत.

- रामकृष्ण धायगुडे, गणित विभागप्रमुख, व्हीएमव्ही

--------------

हा निर्णय म्हणजे नवकल्पनांवर नकारात्मक परिमाण

भौतिकशास्त्र हा एक वैज्ञानिक आधार असून, गणिताचे प्रात्यक्षिक भौतिकशास्त्रात आहे. अभियांत्रिकीसाठी सराव अधोरेखित करणारे मूलभूत ज्ञान गणित आणि भौतिकशास्त्र हे फार पूर्वीपासून आहे. या दोनही विषयाविना अभियांत्रिकीत प्रवेश म्हणजे नवकल्पनांवर नकारात्मक परिमाण होय. भावी अभियंते ठोस वैज्ञानिक पायाशिवाय योग्य अभियांत्रिकी करण्यात अक्षम ठरतील.

- संदीप वाघुळे, भौतिकशास्त्र, अमरावती विद्यापीठ

----------------------

अभियांत्रिकीचा पाया खिळखिळा करणारा निर्णय

एआयसीटीईने गणित, भौतिकशास्त्र अभ्यासक्रमाविना अभियांत्रिकीत प्रवेश घेता येणार आहे. या निर्णयामुळे अभियांत्रिकीचा पाया खिळखिळा होण्याची भीती तज्ज्ञांनी वर्तविली आहे. या दोनही विषयांविना अभियांत्रिकीचे बेसिक ज्ञान मिळू शकणार नाही. भावी अभियंते पदवी मिळवतील; पण अभियांत्रिकीचे मूळ ज्ञान त्यांच्याकडे असणार नाही, असे मत तज्ज्ञांचे आहे.