लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : लॉकडाऊनमुळे अचलपूर तालुक्यातील फूलशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. लग्न समारंभ नाहीत आणि मंदिरांना टाळे लागले आहेत. त्याचा फटका फूलउत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. गुलाब, निशिगंधा, गॅलार्डिया, अस्टर फुलांना मागणीच नाही. यामुळेही फुले झाडावरच कोमेजली आहेत. मजूर लावून ही फुले तोडून घ्यावी लागत असल्यामुळे फूलउत्पादक शेतकऱ्यांना दुहेरी आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.अचलपूर तालुक्यात २० ते २५ शेतकरी दरवर्षी फूलशेती करतात. जवळपास २५ एकरांवर लागवड केली जाते. दरवर्षी लाखो रुपयांचे उत्पन्न या फूलशेतीतून मिळविले जाते. यावर्षी लॉकडाऊनमुळे एक रुपयाचेही उत्पन्न या शेतकऱ्यांना झालेले नाही.तालुक्यातील अविनाश मेहरे, प्रविण पटारे, श्याम मेहरे, नरेंद्र राउत, जावेद फुलारी, शुभम मेहरे, शब्बीर फुलारी, अमोल कळस्कर, सचिन चर्जन यांच्यासह अनेक शेतकरी फूलशेती करतात. यंदा हे सर्वच अडचणीत आले आहेत. यातील श्याम मेहरे, अविनाश मेहरे हे गॅलीर्डिया, अस्टर रोपांची विक्री करतात. यावर्षी त्यांनी अडीच लाख रोपे निर्माण केली. लॉकडाऊन असेच लांबत राहिले, तर या रोपांची विक्रीही मंदावण्याची व परिश्रम वाया जाण्याची भीती त्यांनी व्यक्त केली.लॉकडाऊनमुळे फुलांना मागणी नाही. याउलट झाड टिकविण्याकरिता मजूर लावून त्यावरील फुले तोडून टाकावी लागत आहेत. यात उत्पन्नच नव्हे तर उत्पादनखर्चही बुडाला आहे.-अविनाश मेहरे,फूल उत्पादक, अचलपूरलॉकडाऊनमुळे फूलउत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे. लग्नबंदी, मंदिरबंदीमुळे फुलांची मागणी घटली आहे. अचलपूर तालुक्यात २० ते २५ शेतकरी २५ एकर शेतीवर दरवर्षी फुलशेती करतात.-प्रफुल्ल सातव, तालुका कृषी अधिकारी, अचलपूर
लॉकडाउनमुळे फुलशेतीचे अतोनात नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2020 05:00 IST
अचलपूर तालुक्यात २० ते २५ शेतकरी दरवर्षी फूलशेती करतात. जवळपास २५ एकरांवर लागवड केली जाते. दरवर्षी लाखो रुपयांचे उत्पन्न या फूलशेतीतून मिळविले जाते. यावर्षी लॉकडाऊनमुळे एक रुपयाचेही उत्पन्न या शेतकऱ्यांना झालेले नाही.
लॉकडाउनमुळे फुलशेतीचे अतोनात नुकसान
ठळक मुद्देगुलाब, निशिगंधा, गॅलार्डियाला मागणीच नाही : लग्नसमारंभ नाही; मंदिरांनाही लागले टाळे