शहरं
Join us  
Trending Stories
1
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
2
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
3
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
4
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
5
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
6
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
7
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
8
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
9
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
10
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
11
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
12
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
13
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
14
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
15
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
17
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
18
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
19
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
20
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले

शासन, प्रशासन, विद्यापीठाच्या समन्वयाने परीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2020 05:00 IST

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाकडून सुमारे ७० हजार विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली जाणार आहे. १५ ते २५ सप्टेंबर दरम्यान प्रात्यक्षिक व १ ते २६ ऑक्टोबर दरम्यान अंतिम परीक्षा होणार असून, मॉक टेस्टचाही अंतर्भाव असेल. ९० ते ९२ टक्के विद्यार्थी परीक्षा ऑनलाईन देणार असून, उर्वरित विद्यार्थ्यांसाठी ऑफलाईन घेतली जाईल. स्वच्छता, सोशल डिस्टन्स आदी आवश्यक बाबींसाठी जिल्हा प्रशासनाने सहकार्य करावे, असे निर्देश ना. सामंत यांनी यावेळी दिले.

ठळक मुद्देउदय सामंत : नियोजनाबाबत उच्च, तंत्र शिक्षण मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : महाविद्यालयीन परीक्षा ऑनलाईन पद्धतीने सुरळीत पार पाडण्यासाठी विद्यापीठांकडून परिपूर्ण नियोजन करण्यात आले आहे. साधनांची अडचण असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित व निर्धोक वातावरणात ऑफलाईन परीक्षेचे नियोजन प्रशासनाच्या सहकार्याचे करण्यात येत आहे. शासन, प्रशासन व विद्यापीठ यांच्या समन्वयाने परीक्षा प्रक्रिया सुरळीत पार पाडली जाईल, अशी ग्वाही राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी मंगळवारी अमरावती येथे दिली.ना. उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाची आढावा बैठक विद्यापीठाच्या मुख्य सभागृहात झाली. महिला व बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर, माजी आमदार वीरेंद्र जगताप, कुलगुरू मुरलीधर चांदेकर, प्र-कुलगुरू राजेश जयपूरकर आदी यावेळी उपस्थित होते.संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाकडून सुमारे ७० हजार विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली जाणार आहे. १५ ते २५ सप्टेंबर दरम्यान प्रात्यक्षिक व १ ते २६ ऑक्टोबर दरम्यान अंतिम परीक्षा होणार असून, मॉक टेस्टचाही अंतर्भाव असेल. ९० ते ९२ टक्के विद्यार्थी परीक्षा ऑनलाईन देणार असून, उर्वरित विद्यार्थ्यांसाठी ऑफलाईन घेतली जाईल. स्वच्छता, सोशल डिस्टन्स आदी आवश्यक बाबींसाठी जिल्हा प्रशासनाने सहकार्य करावे, असे निर्देश ना. सामंत यांनी यावेळी दिले.याप्रसंगी ना. ठाकूर म्हणाल्या, कोरोना संकटकाळात प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी विद्यापीठाचे खूप सहकार्य मिळत आहे. त्याचप्रमाणे परीक्षा प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून संपूर्ण सहकार्य केले जाईल.सुविधा नसलेल्या विद्यार्थ्यांची माहिती महाविद्यालयांकडून २२ सप्टेंबरपर्यंत संकलित करून २५ सप्टेंबरपर्यंत विद्यापीठाला कळविण्यात येणार आहे. त्यानंतर ऑफलाईन परीक्षा घेतली जाईल, असे विद्यापीठाचे परीक्षा विभागप्रमुख हेमंत देशमुख यांनी यावेळी सांगितले.

टॅग्स :universityविद्यापीठexamपरीक्षा