शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

‘ईव्हीएम’ची चाचणी सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2019 01:28 IST

पुढील महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हा निवडणूक विभागाची तयारी सुरू आहे. या अनुषंगाने आवश्यक ईव्हीएमची जुळवाजुळव सुरू आहे. उत्तर प्रदेशातल्या उन्नाव जिल्ह्यातून १० हजार ४६९ मतदान यंत्रे येथे आणली आहेत.

ठळक मुद्देतयारी विधानसभेची : सरमिसळ केलेली मतदानयंत्रे संबंधित मतदारसंघाला

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : पुढील महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हा निवडणूक विभागाची तयारी सुरू आहे. या अनुषंगाने आवश्यक ईव्हीएमची जुळवाजुळव सुरू आहे. उत्तर प्रदेशातल्या उन्नाव जिल्ह्यातून १० हजार ४६९ मतदान यंत्रे येथे आणली आहेत. यांसह जिल्ह्यात बाकी असलेल्या १२ हजार ७९९ मतदान यंत्रांची प्रथमस्तरीय चाचणी (एफएलसी) शहरातील विलासनगर स्थित गोदामात सुरू झाली आहे.विधानसभा निवडणुकांच्या निमित्ताने राजकीय वातावरण जसे पेटले आहे, त्याचप्रमाणे निवडणूक आयोगाच्या तयारीनेदेखील वेग घेतला आहे. या अनुषंगाने जिल्हा निवडणूक विभागाचीदेखील तयारी सुरू आहे. जिल्ह्यात आठ विधानसभा मतदारसंघ आहेत. त्या अनुषंगाने लागणाºया इलेक्ट्रॉनिक्स व्होटिंग मशीनची जुळवाजुळव करण्यात येत आहे. ईव्हीएमच्या निवडणकपूर्व प्रथमस्तर चाचणीसाठी भेल इंडिया कंपनीचे दहा अभियंते येथे दाखल झाले आहेत. किमान दोन आठवडे ही प्रक्रिया सुरू राहणार आहे. यासाठी जिल्हा निवडणूक विभागाद्वारे शासनाच्या सर्व विभागांचे वर्ग ३ च्या कर्मचाऱ्यांची मदत घेतली जात आहे तसेच महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचारीदेखील या प्रक्रियेत सहभागी आहेत. निवडणूक प्रक्रिया ही पारदर्शी राहावी, ही आयोगाची भूमिका आहे. त्या अनुषंगाने प्रथमस्तर चाचणीकरिता सर्व राजकीय पक्षांना जिल्हा निवडणूक विभागाद्वारे पत्र देण्यात आले. विलासनगरस्थित गोदामामध्ये सुरू झालेली ही मतदान यंत्रांची चाचणी ते पाहू शकतात. दरम्यान, जिल्ह्यात न वापरलेल्या १००८ बीयू, ६०६ सीयू व ६४५ व्हीव्हीपॅट या यंत्रांची चाचणी कंपनीच्या अभियंत्यांद्वारे करण्यात आलेली आहे. चाचणी झालेल्या सर्व यंत्राची सरमिसळ करण्यात येणार आहे व त्यानंतर ही सर्व यंत्रे सबंधित विधानसभा मतदारसंघात पाठविली जाणार असल्याचे जिल्हा निवडणूक विभागाच्या नायब तहसीलदार नीता लबडे यांनी सांगितले.जिल्ह्यात २६९५ मतदान केंद्रेजिल्ह्यात एकूण आठ विधानसभा मतदारसंघांमध्ये एकूण २६९५ मतदान केंद्रे आहेत. यामध्ये धामणगाव विधानसभा मतदारसंघात ३७५, बडनेरा ३४६, अमरावती ३०६, तिवसा ३२४, दर्यापूर ३४३, मेळघाट ३५५, अचलपूर ३०६ व मोर्शी विधानसभा मतदारसंघात ३२० मतदान केंद्रे आहेत. या प्रत्येक मतदारसंघाव्यतिरिक्त १० टक्के जास्तीची यंत्रे मतदानाच्या वेळी देण्यात येत असल्याने निर्धारित मशीनसाठी जिल्हा निवडणूक विभागाकडून जुळवाजुळव सुरू आहे.मतदान यंत्राविषयी गावागावांत जागृतीइलेक्ट्रॉनिक्स मतदान यंत्रात मतदानाची गोपनीयता व सुरक्षितततेविषयी नागरिकांच्या मनात कुठलाही संभ्रम राहू नये, यासाठी सर्व विधानसभा मतदारसंघांतील प्रमुख गावांमध्ये जनजागृती केली जात आहे. यामध्ये नागरिकांना व्हीव्हीपॅट या नवीन प्रणालीविषयी पुन्हा माहिती दिली जाणार आहे. वास्तविक, लोकसभा निवडणुकीत या प्रक्रियेचा नागरिकांकडून वापर करण्यात आला आहे.विधानसभा निवडणुकांसाठी ईव्हीएमची एफएलसी सुरू आहे. यामध्ये सर्व राजकीय पक्षांना पत्र दिले आहे. नागरिकांनादेखील या मशीनच्या वापराविषयी माहिती होण्यासाठी १५ आॅगस्टपासून जनजागृती करण्यात येणार आहे.- शैलेश नवाल, जिल्हा निवडणूक अधिकारी

टॅग्स :EVM Machineएव्हीएम मशीनVVPATव्हीव्हीपीएटी