अमरावती : भारतीय राज्यघटना ही संपूर्ण जगाच्या पाठीवर सर्वांगसुंदर आहे. मात्र, अभिव्यक्ती स्वातंत्र्य नष्ट करण्याचा प्रयत्न काही प्रवृत्तींकडून सतत होत असल्याने विद्यार्थी दशेत त्याचे आकलन करण्याची नैतिक जबाबदारी ही सर्वांवर येऊन पडली आहे. त्यामुळे देश सुरक्षित व लोकशाहीच्या दृष्टीने समृद्ध राहावा, यासाठी राज्यघटनेतील तत्त्वे प्रत्येकानेच अंगी बानविण्याचे आवाहन श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे कोषाध्यक्ष दिलीप इंगोले यांनी केले.
ते येथील प्रजासत्ताक दिनानिमित्त एका कार्यक्रमात बोलत होते. यावेळी सचिव शेषराव खाडे, संचालक वैभव म्हस्के, आजीवन सदस्य प्रभाकर फुसे, आर.जी. सोळंके आदी उपस्थित होते. संचालन व आभार प्रदर्शन शुभांगी देशमुख यांनी केले. कार्यक्रमासाठी कृतिका राऊत, प्राची नाकाडे, प्रिया काळमेघ, प्रिया वानखडे, करुणा वानखडे, शारदा अवटिक, सौरभ वानखडे, कुमरे, प्रतीक केदार, संकेत जोशी, अनुपम मावशे, शुभम तिवसकर, ज्ञानेश्वर महल्ले, पंकज कोठाळे, रामदास भुयार यांनी परिश्रम घेतले.