शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमधील मतदार यादीतून हटवली जाणार ५१ लाख मतदारांची नावं, या व्यक्तींचा समावेश, निवडणूक आयोगाने दिली माहिती
2
"मी त्याला एवढंच बोलले की..."; कल्याण मारहाण प्रकरणातील पीडितेने सांगितला घटनाक्रम
3
दिल्ली विमानतळावर लँडिंगदरम्यान Air India च्या विमानाला आग; सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित
4
"अशाने महाराष्ट्राचं नुकसान होईल…’’, भाषावादादरम्यान तामिळनाडूमधील आठवण सांगत राज्यपालांचं मोठं विधान 
5
गिलनं 'टाइमपास' करणाऱ्या इंग्लंडच्या सलामी जोडीच्या 'त्या' कृतीचा केला 'पंचनामा'; म्हणाला...
6
१००% प्रॉफिट...! दुप्पट झाला कंपनीचा नफा; बुधवारी फोकसमध्ये राहणार हा शेअर 
7
"त्या आरोपीला चार तासांत शोधा, अन्यथा…’’ कल्याणमध्ये मराठी तरुणीला झालेल्या मारहाणीवरून मनसे आक्रमक 
8
IND vs ENG : हरमनप्रीत कौरचा मोठा पराक्रम; मिताली राजनंतर अशी कामगिरी करणारी ठरली दुसरी भारतीय
9
डान्स क्लासला नको म्हटल्याने मुलीने तोंडाला लावली विषारी बाटली; तीन महिन्यांची मृत्यूशी झुंज अपयशी
10
VIDEO: लाथ मारली, केस ओढून खाली आपटलं... मराठी तरूणीला परप्रांतीयाकडून बेदम मारहाण
11
एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये दीड लाख पगाराची नोकरी!
12
IND vs ENG : ठरलं! लेट एन्ट्री मारणारा थेट प्लेइंग इलेव्हनध्ये दिसणार; करुण नायरही बाकावर नाही बसणार
13
"डोनाल्ड ट्रम्प यांची हत्या करणारच’’, फतवा काढून इराणमधील मौलवींनी गोळा केले ३५० कोटी, शेजारील देशानेही दिली साथ
14
Chhangur Baba : "छांगुर बाबा बाहेर येतील, सर्वांना धडा शिकवतील"; धर्मांतर सिंडिकेटच्या गुंडांकडून धमक्या
15
बिहारच्या विधानसभेत तुफान राडा, आरजेडीचे आमदार आणि मार्शलमध्ये धक्काबुक्की
16
रजिस्ट्रेशन कधीपासून, घर कधी मिळणार? म्हाडाच्या लॉटरीसाठी अर्ज करणाऱ्यांनी 'या' तारखा ठेवा लक्षात!
17
अहिल्यानगर: कधी कुऱ्हाड, कधी कोयता... कधी लाथाबुक्क्या; पत्नीने शेतात जाऊने साडीनेच संपवले आयुष्य
18
४ दिवसांपासून अन्नाचा कणही नाही...; मुलांच्या त्रासाला कंटाळलेल्या वृद्ध दाम्पत्याची गंगेत उडी
19
Video: पाकिस्तानमध्ये ऑनर किलिंगची धक्कादायक घटना; 'तू मला फक्त गोळी...', तरुणीचे शेवटचे शब्द
20
उपराष्ट्रपती पदी कोण बसणार? 'या' तीन नावे शर्यतीत; पहिल्या क्रमांकावर कोण?

दरवर्षी पाच लाख पर्यटक अमरावती जिल्ह्यात

By admin | Updated: June 26, 2015 00:33 IST

निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेण्यासाठी दरवर्षी ५ लाखांवर पर्यटक अमरावती जिल्ह्यात येतात.

वैभव बाबरेकर अमरावतीनिसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेण्यासाठी दरवर्षी ५ लाखांवर पर्यटक अमरावती जिल्ह्यात येतात. साधारणत: हिवाळा व पावसाळ्यात पर्यटकांची गर्दी जिल्ह्यातील पर्यटन स्थळांवर पहायला मिळत आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात अमरावती जिल्हा सर्व दृष्टीने समृध्द आहे. जिल्ह्यातील निसर्गरम्य वातावरण व धार्मिक स्थळे पाहण्याकरिता देशा-विदेशातूनही पर्यटक अमरावती जिल्ह्यात येतात. साधारणत: पावसाळ्यापासून पर्यटकांची धूम जिल्ह्यातील विविध ठिकाणी पहायला मिळते. विदर्भातील नंदनवन असणारे मेळघाट व चिखलदरा थंड हवेचे ठिकाणी म्हणून महाराष्ट्रभर प्रसिध्द आहे. त्यामुळे दरवर्षीच चिखलदरा व मेळघाटात पर्यटकांची मोठी गर्दी राहते. पाऊस पडताच निसर्गरम्य वातारवण पाहण्यासारखे असते. त्यातच पावसामुळे जलस्त्रोत तुंडूब भरतात. अशावेळी नद्याही ओसंडून वाहू लागतात. त्यातच धबधब्यांची दृश्ये पाहण्याचा मोह पर्यटकांना आवरत नाही. चिखलदऱ्यातील हील स्टेशन, पंचबोल पॉइंन्ट, गावीलगड, देवी पॉइंट, नरनाळा अभयारण्य, गुगामल नॅशनल पार्क, वाण अभयारण्य, मेळघाट टायगर रिजर्व्ह, सेमाहोड, कोलकास अशी अनेक निसर्गरम्य ठिकाणे पाहण्यासाठी पर्यटकांनी गर्दी केली आहे. दरवर्षी सुमारे ५ लाखांवर पर्यटक जिल्ह्यातील विविध पर्यटन स्थळांवर येत असून लाखोंचा महसूलसुध्दा प्रशासनाच्या तिजोरीत जमा होत आहे. धार्मिक स्थळांवर भाविकांची गर्दीजिल्ह्यात अनेक धार्मिक स्थळे आहेत. त्यामध्ये मुख्यत: अमरावती शहरातील अंबादेवी व एकवीरा देवीचे मंदिर आहे. दरवर्षी देशभरातून अनेक भाविक तेथे दर्शनासाठी येतात. त्यातच आमनेर महादेव मंदिर, बहिरम, इस्कॉन मंदिर, सतीधाम मंदिर, वैराग्य देवी मंदिर असे अनेक धार्मिळ स्थळांवर पर्यटकांची गर्दी पहायला मिळते. मुक्तागिरीचे मंदिर विशेष आकर्षणअमरावती जिल्ह्याच्या शेजारीच मध्य प्रदेशात मुक्तागिरीचे भव्यदिव्य मंदिर आहे. निसर्गरम्य वातावरण वसलेले हे जैन मंदिर विदर्भातील पर्यटकांसाठी विशेष आकर्षण ठरले आहे. मुक्तागिरी मंदिरात जाण्यासाठी बहुतांश पर्यटकांना अमरावती जिल्ह्यातूनच जावे लागते. त्यामुळे महाराष्ट्रातही मुक्तागिरी धार्मिक स्थळ नामाकिं त आहे. दरवर्षी जिल्ह्यातील हजारो नागरिक मुक्तागिरीला जात असल्याचे पर्यटकांकडून सांगण्यात येत आहे.