शहरं
Join us  
Trending Stories
1
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
2
IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय वंशाचा, अर्धे खेळाडू पाकिस्तानी वंशाचे निघाले
3
मारुतीनंतर महिंद्राचे GST रेट आले...! स्कॉर्पिओ एनपेक्षा XUV 700 स्वस्त झाली, बोलेरो निओ तर...
4
हृदयद्रावक! जुळ्या मुलांनी आईला मारलेली मिठी; ढिगाऱ्याखालील मृतदेह पाहून अख्खं गाव रडलं
5
VIRAL : सलाम तिच्या हिमतीला! 'मौत का कुआं'मध्ये बाईक चालवणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल
6
VIDEO: हार्दिक पांड्याने सीमारेषेवर धावत-पळत, कसरत करत घेतला भन्नाट झेल, पाहणारेही थक्क
7
भारत टेन्शन फ्री... ४ वर्षात जे झालं नव्हतं ते आता झालं, 'हा' कोणता साठा आता जमा झाला?
8
"त्या २४८ शेतकऱ्यांना तीन महिन्यांत कर्जमाफी द्या", उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले, आदेश काय?
9
घरची गरिबी, टोमणे सहन केले, पण मानली नाही हार, बनली बॉक्सिंगमध्ये वर्ल्ड चॅम्पियन, कोण आहे मीनाक्षी हुड्डा
10
हसत हसतच पाण्याच उतरलेला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जुबीन गर्गचा शेवटचा Video व्हायरल
11
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
12
Akshay Kumar : सातवीत नापास झाला होता अभिनेता अक्षय कुमार; लहानपणी पाहिलेलं 'हे' स्वप्न
13
Road Rage Case: ट्रक चालकाचे अपहरण; पूजा खेडकरच्या वडिलांच्या ड्रायव्हरला अटक, आई- वडील फरार
14
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
15
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
16
सूर्य ग्रहण २०२५: चंद्रग्रहणात केला तोच उपाय सूर्यग्रहणातही, साठवणीच्या अन्न-पाण्यावर ठेवा तुळशीचे पान 
17
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
18
असा पैसा काय कामाचा? "मी कामावर जाण्यापूर्वी रोज रडते"; ४० लाख पगार, पण समाधान नाही
19
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
20
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."

राज्यात दर पाच तासात एका शेतकऱ्याने कवटाळला मृत्यू

By गजानन उत्तमराव मोहोड | Updated: April 21, 2023 16:11 IST

पश्चिम विदर्भ, मराठवाड्यात ९० दिवसांत ४६३ शेतकरी आत्महत्यांची नोंद

अमरावती : राज्यात दोन दशकापासून शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरु आहे. यंदाच्या तीन महिन्यात पश्चिम विदर्भासह मराठवाड्यातील तब्बल ४६४ शेतकऱ्यांनी मृत्यूचा घोट घेतला आहे. या दोन विभागात सरासरी दर पाच तासांत एक शेतकरी आत्महत्या होत असल्याचे धक्कादायक वास्तव आहे.

राज्यात मराठवाड्यातील आठ, पश्चिम विदर्भातले पाच व पूर्व विदर्भातला वर्धा, असे १४ शेतकरी आत्महत्याप्रवण जिल्हे आहेत. यामध्ये यवतमाळ, बुलडाणा, अमरावती व बीड जिल्ह्यात शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहेत. यामध्ये अमरावती जिल्ह्यात दोन वर्षांच्या तुलनेत प्रमाण कमी झाल्याचे दिसून येते. त्यातुलनेत या तीन जिल्ह्यात शेतकरी आत्महत्या वाढल्या आहेत. यंदा मार्चअखेरपर्यंत मराठवाड्यातील आठ जिल्ह्यात २१४ तर पश्चिम विदर्भातील पाच जिल्ह्यात २४९ असे एकूण ४६३ शेतकऱ्यांनी मृत्यूचा घोट घेतला आहे.

अरावती विभागीय आयुक्तांच्या अहवालानूसार जानेवारी २००१ पासून तब्बल १९,१२७ शेतकरी अस्मानी व सुल्तानी संकटाचे बळी ठरले आहेत. यामध्ये अर्ध्यापेक्षा जास्त म्हणजे १०,०२० प्रकरणे अपात्र ठरली आहेत तर ८१७९ प्रकरणात शासन मदत देण्यात आलेली आहे. याशिवाय २५० प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित आहेत. यंदा यवतमाळ जिल्ह्यात राज्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या झालेल्या आहेत.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती