शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
2
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
5
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
6
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
7
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
8
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
9
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
10
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
11
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
12
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
13
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
14
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
15
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
16
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
17
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
18
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
19
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
20
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

राज्यात दर पाच तासात एका शेतकऱ्याने कवटाळला मृत्यू

By गजानन उत्तमराव मोहोड | Updated: April 21, 2023 16:11 IST

पश्चिम विदर्भ, मराठवाड्यात ९० दिवसांत ४६३ शेतकरी आत्महत्यांची नोंद

अमरावती : राज्यात दोन दशकापासून शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरु आहे. यंदाच्या तीन महिन्यात पश्चिम विदर्भासह मराठवाड्यातील तब्बल ४६४ शेतकऱ्यांनी मृत्यूचा घोट घेतला आहे. या दोन विभागात सरासरी दर पाच तासांत एक शेतकरी आत्महत्या होत असल्याचे धक्कादायक वास्तव आहे.

राज्यात मराठवाड्यातील आठ, पश्चिम विदर्भातले पाच व पूर्व विदर्भातला वर्धा, असे १४ शेतकरी आत्महत्याप्रवण जिल्हे आहेत. यामध्ये यवतमाळ, बुलडाणा, अमरावती व बीड जिल्ह्यात शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहेत. यामध्ये अमरावती जिल्ह्यात दोन वर्षांच्या तुलनेत प्रमाण कमी झाल्याचे दिसून येते. त्यातुलनेत या तीन जिल्ह्यात शेतकरी आत्महत्या वाढल्या आहेत. यंदा मार्चअखेरपर्यंत मराठवाड्यातील आठ जिल्ह्यात २१४ तर पश्चिम विदर्भातील पाच जिल्ह्यात २४९ असे एकूण ४६३ शेतकऱ्यांनी मृत्यूचा घोट घेतला आहे.

अरावती विभागीय आयुक्तांच्या अहवालानूसार जानेवारी २००१ पासून तब्बल १९,१२७ शेतकरी अस्मानी व सुल्तानी संकटाचे बळी ठरले आहेत. यामध्ये अर्ध्यापेक्षा जास्त म्हणजे १०,०२० प्रकरणे अपात्र ठरली आहेत तर ८१७९ प्रकरणात शासन मदत देण्यात आलेली आहे. याशिवाय २५० प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित आहेत. यंदा यवतमाळ जिल्ह्यात राज्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या झालेल्या आहेत.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती