शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

अखेर ‘त्या’ वाहनचालकाला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2019 23:05 IST

महिनाभरापूर्वी चांदूर रेल्वे मार्गावर अज्ञात चारचाकीच्या धडकेत दुचाकीवरील दोघे ठार, एक महिला गंभीर जखमी झाली. या अपघाताविषयी काही धागेदोरे नसतानाही फ्रेजरपुरा पोलिसांनी प्रत्येक बाबी लक्षात घेत गुप्तहेरांकडून माहिती गोळा केली. या गुन्ह्याचा छडा लावला. रविवारी फ्रेजरपुऱ्याचे पोलीस उपनिरीक्षक अयुब शेख यांनी चालक अजय खेमराज पवार (२३,रा.चिरोडी) या आरोपीला अटक केली.

ठळक मुद्देफ्रेजरपुरा पोलिसांची कामगिरी : चांदूर रेल्वे मार्गावरील अपघातात दोन ठार

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : महिनाभरापूर्वी चांदूर रेल्वे मार्गावर अज्ञात चारचाकीच्या धडकेत दुचाकीवरील दोघे ठार, एक महिला गंभीर जखमी झाली. या अपघाताविषयी काही धागेदोरे नसतानाही फ्रेजरपुरा पोलिसांनी प्रत्येक बाबी लक्षात घेत गुप्तहेरांकडून माहिती गोळा केली. या गुन्ह्याचा छडा लावला. रविवारी फ्रेजरपुऱ्याचे पोलीस उपनिरीक्षक अयुब शेख यांनी चालक अजय खेमराज पवार (२३,रा.चिरोडी) या आरोपीला अटक केली.२९ डिसेंबर रोजी चांदूर रेल्वे मार्गावर घडलेल्या अपघातात एमएच ०४ सीटी-४१५८ हा कार क्रमांक पोलिसांच्या हाती लागला. पोलिसांनी आरटीओमार्फत वाहनांची माहिती काढली असता, ते वाहन मुंबईच्या उल्हासनगरातील निघाले. पोलिसांनी मुंबई जाऊन वाहनचालकाची चौकशी केली असता, ते वाहन अमरावतीत आलेच नसल्याचे आढळले. त्यानंतर पोलिसांनी गुप्त हेरांकडून माहिती काढली असता, चिरोडी गावातील विजय जाधव यांच्या मालकीच्या एमएच २७ बीई ६४७० क्रमांकाच्या चारचाकीने अपघात झाल्याची माहिती पुढे आली. त्याआधारे पोलिसांनी चालक अजय खेमराज पवारचा शोध सुरू केला. पोलिसांनी रविवारी दुपारपासून बसस्थानक व कॅम्प कॉर्नरजवळ सापळा रचला. त्यात सायंकाळच्या वेळेत चालक अजय पवार अडकला. पोलिसांनी अजय पवारसह त्याच्याजवळील चारचाकी वाहन ताब्यात घेतले. पोलिसांनी वाहन मालकालाही चौकशीकरिता बोलाविले होते.पीएसआय अयुब शेख यांचे यशस्वी डिटेक्शनपीआय आसाराम चोरमले यांच्या मार्गदर्शनात पीएसआय अयुब शेख, शिपाई दिनेश मिश्रा, सुरेंद्र इंगोले, विनय गुप्ता, शेखर गायकवाड यांनी हा गुन्हा उघड केला. अयुब शेख यांनी फे्रजरपुरा हद्दीतील ८६ अपघातांच्या गुन्ह्यांपैकी ७४ गुन्हे उघडकीस आणले आहे. यापूर्वी अयुब शेख यांनी गुन्हे शाखेत चोख कर्तव्य बजावले आहे. नागपुरी गेट हद्दीतील गुन्हेगारांकडून तीन देशी कट्टे जप्त केले होते.अशी आहे घटना२९ डिसेंबर रोजी सुरेश महादेव कवटकर (४५), जगदीश मधुकर वाकोडे (४५) व सीमा प्रफुल्ल लवणकर (४६, तिघे रा. हनुमाननगर) हे एमएच २७ बीजी ४५८२ क्रमांकाच्या दुचाकीने चांदूर रेल्वेहून अमरावतीकडे येत होते. त्यावेळी नंदनवन ढाबा ते टोपाज हॉटेलदररम्यानच्या मार्गावर त्यांच्या दुचाकीला एका अज्ञात चारचाकीने धडक देऊन पलायन केले. या अपघातात सुरेश कवटकर व जगदिश वाकोडे ठार झाले, तर सीमा लवणकरही गंभीर जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. घटनेच्या तक्रारीवरून फ्रेजरपुरा पोलिसांनी अज्ञात वाहनाचालकाविरुद्ध भादंविच्या कलम २७९, ३०४ (अ), १३४, १९४ अन्वये गुन्हा नोंदविला.