शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

यंदाही बाराखडी, अन् पाढे ऑनलाईनच...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:10 IST

अमरावती : कोरोनाच्या पहिल्या लाटेत शैक्षणिक वर्षाचे नुकसान झाले. शिक्षणाचे प्राथमिक धडे शिक्षकांना ऑनलाइन गिरवावे लागले. वर्ष सरता सरता ...

अमरावती : कोरोनाच्या पहिल्या लाटेत शैक्षणिक वर्षाचे नुकसान झाले. शिक्षणाचे प्राथमिक धडे शिक्षकांना ऑनलाइन गिरवावे लागले. वर्ष सरता सरता दुसरी लाट आली आणि प्राथमिक शिक्षणाचा पाया असण्याची पद्धत दुरापास्त झाली. आगामी कालावधीत कोरोनाची तिसरी लाट येण्याची भीती आहे. त्यामुळे शाळा सुरू होणे जवळपास अशक्य मानले जात आहे.

जिल्ह्यात रुग्णसंख्या दिवसागणिक वाढतच आहे. १५ जूनपर्यंत लॉकडाऊन आहे. त्यामुळे नव्या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा श्रीगणेशा ऑनलाइनच होणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. अनलॉकच्या तयारीत शासन असले तरी अनेक जिल्ह्यात लॉकडाऊन असेल. तेथील शाळा उघडल्या नाही तर शिक्षण यंदाही घरात बसूनच घ्यावे लागणार आहे. तिसरी लाट लहान मुलांवर येण्याची आरोग्य विभागाची माहिती असल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा विचार करून शाळाही बंद होत्या. ऑनलाइन शिक्षणाला प्राधान्य देण्यात येत आहे. मात्र, या माध्यमाचे शिक्षण विद्यार्थी, पालक व शिक्षकांना कंटाळवाणे झाले आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्यावरही त्याचा विपरीत परिणाम होत आहे. मात्र, तरीही पुन्हा ऑनलाइन शिक्षणाशिवाय पर्याय नसल्याचे चित्र आहे. महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या विद्या प्राधिकरणद्वारा ऑनलाईन शिक्षणात विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. युट्युब, दूरदर्शन, दीक्षा ॲप, स्वाध्यायासह विविध उपक्रमातून विद्यार्थ्यांसाठी शिक्षण उपलब्ध करून देण्यात आले होते. शाळा बंद पण शिक्षण सुरू, या उपक्रमातून विद्यार्थ्यांना शिक्षण उपलब्ध केले होते. यातून बहुसंख्य विद्यार्थ्यांना लाभ झाला. यंदाही गतवर्षीपेक्षा अधिक प्रभावीपणे विद्यार्थ्यांना आनंददायी शिक्षण उपलब्ध करून देण्याची योजना सुरू करण्यात आली आहे.

शाळकरी मुलांची अधिक काळजी घेणे गरजेचे आहे. सन २०२१-२२ मधील शैक्षणिक वर्ष २६ जून पासून सुरू होणार होती. मात्र, या वर्षात प्रत्यक्ष शाळा सुरू होण्याची शक्यता मावळली आहे. त्यामुळे विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहाबाहेर जाऊ नये म्हणून विद्या प्राधिकरणाच्यावतीने ऑनलाईन शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत.

बॉक्स

शाळेचा शंभर टक्के निकाल

गतवर्षी पाचवी ते आठवी प्रत्यक्ष शैक्षणिक वर्ग सुरू न झालेल्या जिल्हा परिषदेच्या दीड हजार शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे. एकूणच लाखो विद्यार्थी पुढील वर्गात प्रवेशित झाले आहेत.