शहरं
Join us  
Trending Stories
1
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
2
Bihar Election 2025: बिहार निवडणुकीत प्रशांत किशोर यांच्या पक्षाला किती जागा? कुणाला बसणार फटक? समोर आला धक्कादायक सर्व्हे!
3
“सरसकट भरपाई हाच योग्य मार्ग, एकरी ₹५० हजार इतकी थेट मदत तातडीने मिळाली पाहिजे”: जयंत पाटील
4
पैसे देता म्हणजे उपकार करता का? अजित पवारांच्या विधानावरुन उद्धव ठाकरे संतापले
5
"मतचोरीवरून मीसुद्धा सर्जिकल स्ट्राईक करणार’’, आदित्य ठाकरेंची मोठी घोषणा 
6
“३३ वर्षांनंतर महादेवीला न्याय, जिथे आहे तिकडे सुखरूप”; पेटा इंडियाचे समर्थन, मठाला सल्ला
7
एक नंबर! केसांसाठी ग्रीन टी 'वरदान'; गळणं थांबेल अन् चमत्कार दिसेल, फक्त 'असा' करा वापर
8
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत
9
IND vs WI: टेस्टच्या नव्या पर्वात 'ओल्ड इज गोल्ड फॉर्म्युला'! जड्डू टीम इंडियाचा 'पार्ट टाइम डेप्युटी'
10
मालेगाव बॉम्बस्फोट: निर्दोष मुक्तता झालेल्या प्रसाद पुरोहित यांना लष्कराने दिली बढती, कर्नल पदावर केली नियुक्ती
11
खऱ्या आयुष्यातला राया..! सोहम बांदेकरसोबत लग्नाच्या चर्चांबद्दल विचारताच लाजली पूजा बिरारी
12
शेअरचा धमाका...! या ₹3.90 च्या स्टॉकनं दिला छप्परफाड परतावा, ₹1 लाखाचे केले ₹2.09 कोटी; तुमच्याकडे आहे का?
13
ठरलं!! अश्विन भारताबाहेर पाकिस्तानी खेळाडूसोबत एकाच संघात, 'या' नंबरची जर्सी घालणार!
14
पुन्हा एकदा निराशा! गुंतवणूकदारांचे ३.२४ लाख कोटी बुडाले! 'या' कारणांमुळे बाजार धडाम
15
रोहितने ऑस्ट्रेलिया मालिकेआधी कमी केलं १० किलो वजन, फिटनेस पाहून भल्याभल्यांची 'बोलती बंद'
16
मुलीचे लग्न आहे दिवाळीत, कसं होईल ?... महिला शेतकऱ्याला अश्रू अनावर; धनंजय मुंडे म्हणाले, आक्का, सगळा खर्च माझा...
17
नवरात्र २०२५: ५ कामे अवश्य करा, नैराश्य दूर होईलच, आनंद वाटेल; भाग्योदय, घरात शुभ तेच घडेल! 
18
VLF Mobster: इतकी स्वस्त की...; 'या' स्कूटरमुळं इतर दुचाकी निर्माता कंपन्यांना फुटला घाम!
19
२० दिवस अत्यंत धोक्याचे! मंगल-हर्षल षडाष्टक योग; घात-अपघातापासून कसे वाचावे?
20
आर्यन खानच्या 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड'वर संतापले समीर वानखेडे, गौरी-शाहरूख खानविरोधात मानहानीचा खटला केला दाखल

यंदाही बाराखडी, अन् पाढे ऑनलाईनच...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:10 IST

अमरावती : कोरोनाच्या पहिल्या लाटेत शैक्षणिक वर्षाचे नुकसान झाले. शिक्षणाचे प्राथमिक धडे शिक्षकांना ऑनलाइन गिरवावे लागले. वर्ष सरता सरता ...

अमरावती : कोरोनाच्या पहिल्या लाटेत शैक्षणिक वर्षाचे नुकसान झाले. शिक्षणाचे प्राथमिक धडे शिक्षकांना ऑनलाइन गिरवावे लागले. वर्ष सरता सरता दुसरी लाट आली आणि प्राथमिक शिक्षणाचा पाया असण्याची पद्धत दुरापास्त झाली. आगामी कालावधीत कोरोनाची तिसरी लाट येण्याची भीती आहे. त्यामुळे शाळा सुरू होणे जवळपास अशक्य मानले जात आहे.

जिल्ह्यात रुग्णसंख्या दिवसागणिक वाढतच आहे. १५ जूनपर्यंत लॉकडाऊन आहे. त्यामुळे नव्या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा श्रीगणेशा ऑनलाइनच होणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. अनलॉकच्या तयारीत शासन असले तरी अनेक जिल्ह्यात लॉकडाऊन असेल. तेथील शाळा उघडल्या नाही तर शिक्षण यंदाही घरात बसूनच घ्यावे लागणार आहे. तिसरी लाट लहान मुलांवर येण्याची आरोग्य विभागाची माहिती असल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा विचार करून शाळाही बंद होत्या. ऑनलाइन शिक्षणाला प्राधान्य देण्यात येत आहे. मात्र, या माध्यमाचे शिक्षण विद्यार्थी, पालक व शिक्षकांना कंटाळवाणे झाले आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्यावरही त्याचा विपरीत परिणाम होत आहे. मात्र, तरीही पुन्हा ऑनलाइन शिक्षणाशिवाय पर्याय नसल्याचे चित्र आहे. महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या विद्या प्राधिकरणद्वारा ऑनलाईन शिक्षणात विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. युट्युब, दूरदर्शन, दीक्षा ॲप, स्वाध्यायासह विविध उपक्रमातून विद्यार्थ्यांसाठी शिक्षण उपलब्ध करून देण्यात आले होते. शाळा बंद पण शिक्षण सुरू, या उपक्रमातून विद्यार्थ्यांना शिक्षण उपलब्ध केले होते. यातून बहुसंख्य विद्यार्थ्यांना लाभ झाला. यंदाही गतवर्षीपेक्षा अधिक प्रभावीपणे विद्यार्थ्यांना आनंददायी शिक्षण उपलब्ध करून देण्याची योजना सुरू करण्यात आली आहे.

शाळकरी मुलांची अधिक काळजी घेणे गरजेचे आहे. सन २०२१-२२ मधील शैक्षणिक वर्ष २६ जून पासून सुरू होणार होती. मात्र, या वर्षात प्रत्यक्ष शाळा सुरू होण्याची शक्यता मावळली आहे. त्यामुळे विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहाबाहेर जाऊ नये म्हणून विद्या प्राधिकरणाच्यावतीने ऑनलाईन शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत.

बॉक्स

शाळेचा शंभर टक्के निकाल

गतवर्षी पाचवी ते आठवी प्रत्यक्ष शैक्षणिक वर्ग सुरू न झालेल्या जिल्हा परिषदेच्या दीड हजार शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे. एकूणच लाखो विद्यार्थी पुढील वर्गात प्रवेशित झाले आहेत.