शहरं
Join us  
Trending Stories
1
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
2
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
3
चक्क २० वर्षीय युवकानं बनवला स्वत:चा देश, ४०० जणांना दिलं नागरिकत्व; युरोपियन देश अवाक् झाले
4
Aditya Infotech IPO Listing: ५१% प्रीमिअमवर लिस्ट झाला 'हा' IPO; गुंतवणुकदारांवर पैशांचा पाऊस, एन्ट्री घेताच खरेदीसाठी उड्या
5
बापरे! हे तर भलतेच...! इलेक्ट्रीक कार जास्त प्रदूषण करतात; पेट्रोल, डिझेलशी तुलना कराल तर...थक्क व्हाल
6
स्वप्न साकार! वडील भाजी विकायचे, आईने गहाण ठेवले दागिने; लेकीने केलं कष्टाचं सोनं
7
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
8
धाराशिव हादरले! जुन्या वादातून महाकाली कलाकेंद्र परिसरात गोळीबार, एक जखमी
9
"कोणी तुम्हाला इच्छेविरोधात हात...", तसल्या सीनबद्दलच्या दृष्टिकोनावर काय म्हणाली मराठी अभिनेत्री?
10
मध्यमवर्गीयांची धाव SIP पर्यंत; पण, देशातील सर्वात श्रीमंत १% लोक करतात 'या' २ गोष्टीत सर्वाधिक गुंतवणूक
11
"लॉकेट आणलंय, डोळे बंद कर"; पत्नीने सरप्राइजसाठी डोळे बंद करताच पती झाला राक्षस, केले २० वार!
12
"भाऊ, मी यावेळी राखी बांधू शकणार नाही"; पती आणि सासरच्यांना कंटाळून महिलेने संपवलं जीवन
13
चातुर्मासातील पहिला बुध प्रदोष: कसे करावे व्रत? ‘या’ मंत्रांचा जप करा, महादेव शुभच करतील!
14
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रालयाने केला खुलासा...
15
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! 'हे' ५ स्टॉक खरेदी करण्याचा ब्रोकरेज फर्मचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?
16
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
17
अमेरिकेला भारताची गरज, डीलसाठीच ट्रम्प यांची धडपड; एक्सपर्टनं सांगितली इन्साईड स्टोरी
18
बेलापूर न्यायालयामध्ये थेट लिंबू-मिरचीचा उतारा; दुसऱ्यांदा घडली घटना; या प्रकारानंतर एक न्यायाधीश चार दिवस रजेवर
19
Share Market Opening: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; मोठ्या घसरणीसह उघडले हे स्टॉक्स

यंदाही बाराखडी, अन् पाढे ऑनलाईनच...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:10 IST

अमरावती : कोरोनाच्या पहिल्या लाटेत शैक्षणिक वर्षाचे नुकसान झाले. शिक्षणाचे प्राथमिक धडे शिक्षकांना ऑनलाइन गिरवावे लागले. वर्ष सरता सरता ...

अमरावती : कोरोनाच्या पहिल्या लाटेत शैक्षणिक वर्षाचे नुकसान झाले. शिक्षणाचे प्राथमिक धडे शिक्षकांना ऑनलाइन गिरवावे लागले. वर्ष सरता सरता दुसरी लाट आली आणि प्राथमिक शिक्षणाचा पाया असण्याची पद्धत दुरापास्त झाली. आगामी कालावधीत कोरोनाची तिसरी लाट येण्याची भीती आहे. त्यामुळे शाळा सुरू होणे जवळपास अशक्य मानले जात आहे.

जिल्ह्यात रुग्णसंख्या दिवसागणिक वाढतच आहे. १५ जूनपर्यंत लॉकडाऊन आहे. त्यामुळे नव्या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा श्रीगणेशा ऑनलाइनच होणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. अनलॉकच्या तयारीत शासन असले तरी अनेक जिल्ह्यात लॉकडाऊन असेल. तेथील शाळा उघडल्या नाही तर शिक्षण यंदाही घरात बसूनच घ्यावे लागणार आहे. तिसरी लाट लहान मुलांवर येण्याची आरोग्य विभागाची माहिती असल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा विचार करून शाळाही बंद होत्या. ऑनलाइन शिक्षणाला प्राधान्य देण्यात येत आहे. मात्र, या माध्यमाचे शिक्षण विद्यार्थी, पालक व शिक्षकांना कंटाळवाणे झाले आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्यावरही त्याचा विपरीत परिणाम होत आहे. मात्र, तरीही पुन्हा ऑनलाइन शिक्षणाशिवाय पर्याय नसल्याचे चित्र आहे. महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या विद्या प्राधिकरणद्वारा ऑनलाईन शिक्षणात विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. युट्युब, दूरदर्शन, दीक्षा ॲप, स्वाध्यायासह विविध उपक्रमातून विद्यार्थ्यांसाठी शिक्षण उपलब्ध करून देण्यात आले होते. शाळा बंद पण शिक्षण सुरू, या उपक्रमातून विद्यार्थ्यांना शिक्षण उपलब्ध केले होते. यातून बहुसंख्य विद्यार्थ्यांना लाभ झाला. यंदाही गतवर्षीपेक्षा अधिक प्रभावीपणे विद्यार्थ्यांना आनंददायी शिक्षण उपलब्ध करून देण्याची योजना सुरू करण्यात आली आहे.

शाळकरी मुलांची अधिक काळजी घेणे गरजेचे आहे. सन २०२१-२२ मधील शैक्षणिक वर्ष २६ जून पासून सुरू होणार होती. मात्र, या वर्षात प्रत्यक्ष शाळा सुरू होण्याची शक्यता मावळली आहे. त्यामुळे विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहाबाहेर जाऊ नये म्हणून विद्या प्राधिकरणाच्यावतीने ऑनलाईन शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत.

बॉक्स

शाळेचा शंभर टक्के निकाल

गतवर्षी पाचवी ते आठवी प्रत्यक्ष शैक्षणिक वर्ग सुरू न झालेल्या जिल्हा परिषदेच्या दीड हजार शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे. एकूणच लाखो विद्यार्थी पुढील वर्गात प्रवेशित झाले आहेत.