शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
3
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
4
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
5
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
6
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
7
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
8
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
9
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
10
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
11
...तर तलवारीचा डौलही राहील आणि शानही !
12
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
13
मेडिकल कॉलेजमधील खर्डेघाशी थांबवा ! ‘एचएमआयएस’च्या इंटरनेट सुविधेसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडून ३२ कोटी २१ लाख रुपये
14
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
15
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
16
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
17
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
18
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
19
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी

पाऊस आला तरी उष्णतेची लाट कायम राहणार

By admin | Updated: March 27, 2016 00:03 IST

बलुचिस्थानमधील उष्णवारे महाराष्ट्राकडे येत असल्यामुळे विदर्भासह अमरावती जिल्ह्यात उष्णतेची लाट कायम राहणार आहे.

हवामान तज्ज्ञांचा अंदाज : बलुचिस्थानातील उष्ण वारे महाराष्ट्राकडेअमरावती : बलुचिस्थानमधील उष्णवारे महाराष्ट्राकडे येत असल्यामुळे विदर्भासह अमरावती जिल्ह्यात उष्णतेची लाट कायम राहणार आहे. दरम्यान रविवारी पावसाची शक्यता असतानाही उष्णतामानात विशेष बदल होणार नाही, असा अंदाज हवामान तज्ज्ञ अनिल बंड यांनी वर्तविला आहे. उन्हाळा सुरू झाल्यापासून हळूहळू तापमान उच्चांकाकडे वाटचाल करीत आहे. दरवर्षी साधारणत: एप्रिलपासून उन्ह्याची तीव्रता जाणवते. मात्र, यंदा मार्चमध्येच तापमानाने ४० डिग्री पार केल्यामुळे उन्ह्याचे चटके जाणवू लागले आहे. त्यातच दरम्यान वादळी पाऊस व गारपिटीमुळे तापमान कमी झाले होते. मात्र, त्यानंतर तापमानात चढउतार आढळून आला. आता उन्ह्याची तीव्रता हळुहळू पुन्हा वाढू लागली आहे. शुक्रवारी जल विज्ञान प्रकल्प कार्यालयाने ४०.६ डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद केली असून महिनाभरातील हे तापमान सर्वाधिक असल्याचे दिसून येते. मागील वर्षी तर ४७ डिग्री सेल्सिअसपर्यंत तापमान पोहोचले होते. त्यामुळे यंदा उन्हाचा तडाखा जीवाची लाही-लाही करणार का, याची चिंता नागरिकांना लागली आहे. विदर्भात २७ व २८ मार्च रोजी पावसाची शक्यता आहे. पश्चिमी गडबड जम्मू-कश्मिरच्या दिशेने सरकत आहे. याच्याच प्रभावाने पाकिस्तान आणि राजस्थानवरील चक्राकार वारे बलुचिस्थानातील उष्णवारे राज्यस्थान, गुजरात व महाराष्ट्राकडे येत आहेत. त्यामुळे पाऊस आला तरी उष्णता कायम राहील, असे हवामान तज्ज्ञ अनिल बंड यांनी सांगितले.