शहरं
Join us  
Trending Stories
1
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
2
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधूंच्या सपशेल पराभवावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
3
मृत्यूच्या खाईत सौंदर्याचा सशक्त आवाज; पॅलेस्टाइनची तरुणी यंदा 'मिस युनिव्हर्स'मध्ये...
4
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
5
शाहरुखचा लेक त्याचाच डुप्लिकेट! लूक अन् आवाज सगळंच सेम, पहिल्यांदाच आला प्रेक्षकांसमोर, म्हणाला...
6
'त्याला मीच मारलं पण तो कोण होता?'; दहावीच्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या मुलाची धक्कादायक चॅटिंग समोर
7
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
8
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
9
“वराह जयंती साजरी करण्याची मागणी म्हणजे तरुणांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा अजेंडा”: सपकाळ
10
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
11
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
12
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
13
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...
14
पावसाची उसंत पण धरणाातून पाण्याचा विसर्ग; नद्या आल्या रस्त्यांवर, पुराचा विळखा अजूनही घट्ट
15
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
16
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
17
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
18
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
19
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
20
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा

बंजर माटी में पलकर भी हमने मृत्यू से जीवन खिंचा है!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:12 IST

दर्यापूर/ येवदा : आपण सुरुवातीपासून कोविड-१९ शी लढाईत सर्वांत पुढच्या आघाडीवर होतो. आज पुन्हा रुग्णसंख्येत वाढ दिसून येताना, ही ...

दर्यापूर/ येवदा : आपण सुरुवातीपासून कोविड-१९ शी लढाईत सर्वांत पुढच्या आघाडीवर होतो. आज पुन्हा रुग्णसंख्येत वाढ दिसून येताना, ही लढाई निकराने व शथीर्ने लढण्याची गरज आहे. सर्वांच्या प्रयत्नांतून एक दिवस या महामारीवर निश्चित मात करू, असा विश्वास जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप रणमले यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांना पत्र लिहून व्यक्त केला आहे.

आरोग्य अधिकारी, कर्मचारी, गटप्रवर्तिका अर्थात आशा या कोरोनायोद्ध्यांना उद्देशून लिहिलेल्या पत्रात डॉ. रणमले यांनी या सर्वांच्या आतापर्यंतच्या अविरत श्रमाबद्दल आदर व्यक्त केला आहे. रुग्णसेवेहून दुसरे मोठे कार्य नाही. सैन्य जसे सीमेवर लढून देशाचे रक्षण करते, तसे आपण समाजातील अर्भकापासून वृद्धांपर्यंत सर्वांच्या प्राणांचे संरक्षण करण्यासाठी स्वत:चा जीव धोक्यात घालून लढत आहात, अशा शब्दांत जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी आरोग्य कर्मचारी व आशाताईंचा गौरव केला आहे. बाधितांची वाढती संख्या पाहता, आपली जबाबदारी आणखी वाढली आहे. त्यामुळे ही लढाई शर्थीने लढणे आवश्यक आहे. प्रत्येक जण आपल्याकडे आशेचे किरण म्हणून पाहतो आहे. त्यामुळे त्यांच्या निरोगी जीवनासाठी त्यांच्या मनावर दक्षता त्रिसूत्री बिंबवणे, जीवनशैलीचा भाग होण्यासाठी ती सतत सांगत राहणे आवश्यक आहे. लक्षणे आढळलेल्यांना तपासणीसाठी पाठविणे आणि पॉझिटिव्ह आलेल्यांना उपचार मिळवून देत संपर्कातील व्यक्तींच्या चाचण्या करून घेण्यासाठी तालुका कार्यालयांना वेळोवेळी माहिती देणे आवश्यक आहे. हे काम ‘आशाताईं’कडून होत असल्याने त्यांचा या लढाईतील योगदान मोलाचे आहे. पुढील लढाईही आम्ही शर्थीने आणि एकजुटीने लढू व एक दिवस कोरोनावर निश्चित मात करू.

असे केले आवाहन

‘हम उस माटी के वृक्ष नही, जिसको नदीयों ने सिंचा है, बंजर माटी में पलकर भी हमने मृत्यू से जीवन खिंचा है, मिटनेवाला नाम नही हमारा, एक दिन जरूर महामारीसे जितेंगे’, असा निर्धार व्यक्त करीत जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी या सर्वांना कोरोना लढाईत एकजुटीने लढण्याचे आवाहन केले आहे.

-----------------------------