शहरं
Join us  
Trending Stories
1
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
2
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
3
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
4
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
5
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
6
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
7
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
8
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
9
"बिहारमध्ये बांगलादेशी-रोहिंग्या सापडले, पण पहलगामचे दहशतवादी..."; ओवैसींची सरकारवर टीका
10
भारतीय ग्रँडमास्टर्स समोर 'बुद्धी' चालेना! आर. प्रज्ञानंद याने वर्ल्ड नंबर वन कार्लसनला दिला शह
11
२ राजयोग करणार ९ राशींची भरघोस भरभराट, अडकलेली कामे होतील; हाती पैसा राहील, शुभ वरदान काळ!
12
चिनी विद्यार्थिनीला युक्रेनियन तरुणासोबत शारीरिक संबंध ठेवल्याची शिक्षा, विद्यापीठानं उचललं टोकाचं पाऊल
13
नॅशनल पार्कमधील ‘वनराणी’चे रुपडे पालटले; व्हिस्टाडोमसह नव्या अवतारात सेवेत, कधी सुरू होणार?
14
आरोपीच्या बोलावण्यावरून वारंवार हॉटेलमध्ये का गेलात? पती असताना परपुरुषाशी...! बलात्काराचा आरोप करणाऱ्या महिलेला सुप्रीम कोर्टानं फटकारलं
15
RCBचा विराट कोहली जबाबदार! बेंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणात कर्नाटक सरकारचा अहवाल सादर
16
वृद्धाला हातपाय बांधून कारमध्ये कोंडले, मग कुटुंब ताजमहाल पाहण्यात रंगले, सुरक्षा रक्षकाने पाहिल्याने अनर्थ टळला   
17
"आमचं शांततापूर्ण जीवन..."; गुहेत राहणाऱ्या रशियन महिलेने फोन चार्ज झाल्यावर पहिलं काय केलं?
18
केस एवढे गळतात की टक्कल पडण्याचीच वाटते भीती; 'हा' घरगुती उपाय ठरेल रामबाण
19
Maharashtra Politics : 'दिनो मोरियाने तोंड उघडले तर अनेकांचा मोरया होईल';एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना इशारा
20
2025 Keeway RR300: थेट बीएमडब्लूशी स्पर्धा करणार मोटो वॉल्टची नवी बाईक? दोन लाखांहून कमी किंमतीत लॉन्च!

लाच घेतल्यानंतरही 18 जणांची खुर्ची सुटेना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2022 05:00 IST

एसीबी ट्रॅप झाल्यानंतर गुन्हा दाखल केला जातो. त्यात अटक झाल्याचा कालावधी ४८ तासांहून अधिक असल्यास अटकेच्या दिनांकापासून मानीव निलंबनाचे आदेश काढणे अनिवार्य आहे. मानीव निलंबनाची प्रकरणे वगळून लाचेच्या सापळ्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून अहवाल प्राप्त झाल्यानंतर अपचारी अधिकारी, कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई सक्षम प्राधिकाऱ्यांनी करावी. प्रकरणाचे गांभीर्य व पुराव्यांची सद्यस्थिती पाहून तत्काळ निलंबनाबाबत निर्णय घेण्यात यावा.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : एसीबी ट्रॅपप्रकरणी अटक झालेली नाही, या केवळ एका कारणास्तव सरसकट सर्व प्रकरणात निलंबन नाकारण्यात येऊ नये. प्रत्येक प्रकरणात स्वतंत्रपणे निर्णय घेऊन तो शासनाच्या नगरविकास विभाग व गृह विभागास माहितीस्तव कळविण्यात यावा,  अशी दक्षता घ्यावी, असे निर्देश नगरविकास विभागाने दिले आहेत. लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत झालेल्या कारवाईनंतर सक्षम प्राधिकरणाने अनुसरायच्या कार्यपद्धतीबाबत स्थानिक स्वराज्य संस्थांना तशा सूचना देण्यात आल्या आहेत. दरम्यान, एसीबीच्या संकेतस्थळानुसार, अमरावती परिक्षेत्रातील १८ जण निलंबनापासून अद्याप दूर आहेत. एसीबी ट्रॅप झाल्यानंतर गुन्हा दाखल केला जातो. त्यात अटक झाल्याचा कालावधी ४८ तासांहून अधिक असल्यास अटकेच्या दिनांकापासून मानीव निलंबनाचे आदेश काढणे अनिवार्य आहे. मानीव निलंबनाची प्रकरणे वगळून लाचेच्या सापळ्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून अहवाल प्राप्त झाल्यानंतर अपचारी अधिकारी, कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई सक्षम प्राधिकाऱ्यांनी करावी. प्रकरणाचे गांभीर्य व पुराव्यांची सद्यस्थिती पाहून तत्काळ निलंबनाबाबत निर्णय घेण्यात यावा. केवळ अटक झालेली नाही, या कारणास्तव सरसकट सर्व प्रकरणी निलंबन नाकारण्यात येऊ नये, अशा सूचना १६ मार्च रोजी देण्यात आल्या आहेत. 

१८ जणांचे निलंबन कुठे लटकले?

एसीबीच्या संकेतस्थळावरील सांख्यिकीनुसार, एसीबी ट्रॅपनंतरही अमरावती परिक्षेत्रातील १८ जणांचे निलंबन अद्याप झालेले नाही. त्यात काहींना अटक करण्यात आलेली नाही, तर काही जण ४८ तासांपेक्षा कमी कालावधीसाठी पोलीस कोठडीत होते, अशी कारणे समोर करण्यात आली आहेत. कुठे राजकीय दबावतंत्राचादेखील अवलंब केला गेला. 

काय आहे नवा आदेश? -    एसीबी ट्रॅपनंतर गुन्हा दाखल केला जातो. अटकेचा कालावधी ४८ तासांहून अधिक असल्यास मानीव निलंबनाचे आदेश काढावे लागतात. -    मानीव निलंबनाची प्रकरणे वगळून लाचेच्या सापळ्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यांच्यावर तत्काळ निलंबनाची कारवाई सक्षम प्राधिकाऱ्यांनी करावी, असे आहे.

महसूल अव्वलयंदा १ जानेवारी ते २२ मार्च या कालावधीत देखील महसूल, भूमिअभिलेख लाचखोरीत अव्वल आहे. संपूर्ण राज्यातील आठ परिक्षेत्रात लाचखोरीत पोलीस दुसऱ्या क्रमांकावर आहे, तर महावितरण तिसऱ्या क्रमांकावर आहे.

 

टॅग्स :Bribe Caseलाच प्रकरण