शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
4
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
5
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
6
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
7
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
8
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
9
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
10
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
11
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
12
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
13
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
14
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
15
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
16
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
17
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
18
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
19
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
20
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
Daily Top 2Weekly Top 5

लाच घेतल्यानंतरही 18 जणांची खुर्ची सुटेना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2022 05:00 IST

एसीबी ट्रॅप झाल्यानंतर गुन्हा दाखल केला जातो. त्यात अटक झाल्याचा कालावधी ४८ तासांहून अधिक असल्यास अटकेच्या दिनांकापासून मानीव निलंबनाचे आदेश काढणे अनिवार्य आहे. मानीव निलंबनाची प्रकरणे वगळून लाचेच्या सापळ्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून अहवाल प्राप्त झाल्यानंतर अपचारी अधिकारी, कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई सक्षम प्राधिकाऱ्यांनी करावी. प्रकरणाचे गांभीर्य व पुराव्यांची सद्यस्थिती पाहून तत्काळ निलंबनाबाबत निर्णय घेण्यात यावा.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : एसीबी ट्रॅपप्रकरणी अटक झालेली नाही, या केवळ एका कारणास्तव सरसकट सर्व प्रकरणात निलंबन नाकारण्यात येऊ नये. प्रत्येक प्रकरणात स्वतंत्रपणे निर्णय घेऊन तो शासनाच्या नगरविकास विभाग व गृह विभागास माहितीस्तव कळविण्यात यावा,  अशी दक्षता घ्यावी, असे निर्देश नगरविकास विभागाने दिले आहेत. लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत झालेल्या कारवाईनंतर सक्षम प्राधिकरणाने अनुसरायच्या कार्यपद्धतीबाबत स्थानिक स्वराज्य संस्थांना तशा सूचना देण्यात आल्या आहेत. दरम्यान, एसीबीच्या संकेतस्थळानुसार, अमरावती परिक्षेत्रातील १८ जण निलंबनापासून अद्याप दूर आहेत. एसीबी ट्रॅप झाल्यानंतर गुन्हा दाखल केला जातो. त्यात अटक झाल्याचा कालावधी ४८ तासांहून अधिक असल्यास अटकेच्या दिनांकापासून मानीव निलंबनाचे आदेश काढणे अनिवार्य आहे. मानीव निलंबनाची प्रकरणे वगळून लाचेच्या सापळ्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून अहवाल प्राप्त झाल्यानंतर अपचारी अधिकारी, कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई सक्षम प्राधिकाऱ्यांनी करावी. प्रकरणाचे गांभीर्य व पुराव्यांची सद्यस्थिती पाहून तत्काळ निलंबनाबाबत निर्णय घेण्यात यावा. केवळ अटक झालेली नाही, या कारणास्तव सरसकट सर्व प्रकरणी निलंबन नाकारण्यात येऊ नये, अशा सूचना १६ मार्च रोजी देण्यात आल्या आहेत. 

१८ जणांचे निलंबन कुठे लटकले?

एसीबीच्या संकेतस्थळावरील सांख्यिकीनुसार, एसीबी ट्रॅपनंतरही अमरावती परिक्षेत्रातील १८ जणांचे निलंबन अद्याप झालेले नाही. त्यात काहींना अटक करण्यात आलेली नाही, तर काही जण ४८ तासांपेक्षा कमी कालावधीसाठी पोलीस कोठडीत होते, अशी कारणे समोर करण्यात आली आहेत. कुठे राजकीय दबावतंत्राचादेखील अवलंब केला गेला. 

काय आहे नवा आदेश? -    एसीबी ट्रॅपनंतर गुन्हा दाखल केला जातो. अटकेचा कालावधी ४८ तासांहून अधिक असल्यास मानीव निलंबनाचे आदेश काढावे लागतात. -    मानीव निलंबनाची प्रकरणे वगळून लाचेच्या सापळ्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यांच्यावर तत्काळ निलंबनाची कारवाई सक्षम प्राधिकाऱ्यांनी करावी, असे आहे.

महसूल अव्वलयंदा १ जानेवारी ते २२ मार्च या कालावधीत देखील महसूल, भूमिअभिलेख लाचखोरीत अव्वल आहे. संपूर्ण राज्यातील आठ परिक्षेत्रात लाचखोरीत पोलीस दुसऱ्या क्रमांकावर आहे, तर महावितरण तिसऱ्या क्रमांकावर आहे.

 

टॅग्स :Bribe Caseलाच प्रकरण