शहरं
Join us  
Trending Stories
1
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
2
Pakistan Water : पाकिस्तानमध्ये पाण्याचं संकट वाढलं! भारतासोबतचा संघर्ष महागात पडला
3
"ऑपरेशन महादेव कालच का झालं?"; अखिलेश यादवांनी सरकारला घेरलं, पुलवामा हल्ल्यातील 'त्या' गाडीबद्दल काय बोलले?
4
BCCI च्या मुंबईतील कार्यालयात चोरी; सुरक्षा रक्षकाने लाखोंच्या मालालवर मारला डल्ला
5
"कलंकित मंत्र्यांचा राजीनामा न घेणाऱ्या सरकारने गोमूत्र शिंपडून त्यांना पवित्र करून घ्यावे", विजय वडेट्टीवार यांची टीका
6
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
7
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
8
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
9
Asia Cup 2025 : रिषभ पंतच्या जागी अकोल्याच्या पठ्ठ्याची होऊ शकते टीम इंडियात एन्ट्री
10
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
11
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
12
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
13
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
14
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
15
गर्लफ्रेंडने ठेवला विश्वास, प्रोत्साहन दिल्याने 'तो' झाला मोठा अधिकारी, कोचिंगशिवाय पास केली JPSC
16
ब्रेक पॅडलखाली अडकली पाण्याची बाटली, भरधाव कार ट्रॉलीमध्ये घुसून दोन व्यावसायिकांचा मृत्यू
17
UPI पेमेंटमध्ये पिनची कटकट संपणार? आता चेहरा दाखवा किंवा बोट लावा, पेमेंट होईल झटक्यात!
18
समसप्तक नवमपंचम गजलक्ष्मी राजयोग: ९ राशींना शुभ वरदान काळ, हाती पैसा राहील; अपार लाभच लाभ!
19
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
20
Video: गाढवाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू

लाखोंचा खर्च करूनही गाव अंधारातच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2017 22:51 IST

तालुक्यातील काटकुंभ ग्रामपंचायतीमध्ये तत्कालीन ग्रामसेवकाने खरेदी केलेले एलईडी लाईट निकृष्ट दर्जाचे असून पाच लक्ष रूपये खर्च करूनही दोन महिन्यांतच बंद पडल्याने गावात अंधाराचे साम्राज्य पसरले आहे.

ठळक मुद्देगावकºयांची तक्रार : काटकुंभ ग्रामपंचायतीत एलईडी घोटाळा

लोकमत न्यूज नेटवर्कचिखलदरा : तालुक्यातील काटकुंभ ग्रामपंचायतीमध्ये तत्कालीन ग्रामसेवकाने खरेदी केलेले एलईडी लाईट निकृष्ट दर्जाचे असून पाच लक्ष रूपये खर्च करूनही दोन महिन्यांतच बंद पडल्याने गावात अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. गावकºयांनी संबंधितांवर कारवाईची मागणी केली आहे.तालुक्यातील मोठ्या ग्रामपंचायतीमध्ये गणल्या जाणाºया काटकुंभ ग्रामपंचायतीत तत्कालीन सचिव संजय दांदळे यांनी मे २०१७ मध्ये ग्रामपंचायतीला प्राप्त विविध निधीमधून दोन मोठे खांब मुख्य चौकात लावण्यासह काटकुंभ आणि अंतर्गत येणाºया रजणीकुंड येथे जवळपास ८० लहान पथदिवे लावण्यात आले होते. गावात मोठ्या प्रमाणात एलईडी पथदिवे लावण्यात आल्याने गावकºयांमध्ये आनंदाचे वातावरण होते. मात्र त्यांचा तीन महिन्यांतच हिरमोड झाला.पथदिवे बंद, गावात अंधारठिकठिकाणी लावण्यात आलेल्या या एकूण ८२ पथदिव्यांपैकी मुख्य चौकातील दोन पथदिव्यांची खरेदी दोन लक्ष नव्वद हजार रुपयांची असून त्यातील अर्ध्यापेक्षा अधिक पथदिवे बंद पडले आहेत, तर तीच स्थिती काटकुंभ आणि रजणीकुंड येथील लहान पथदिव्यांची आहे. तत्कालिन सचिव संजय दांदळे यांनी यात मोठा आर्थिक गैरव्यवहार करीत निकृष्ट दर्जाची खरेदी केल्याची तक्रार गावकºयांनी केली आहे. संबंधित सचिवाने एवढ्या मोठ्या प्रमाणात खरेदी केलेले लाईट बंद पडल्यावर दुरूस्तीसाठी किंवा बदलवून देण्याचा करारनामा केला नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. नांदगाव खंडेश्वर तालुक्यात स्थानांतरित झालेल्या तत्कालीन सचिवाने मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार केल्याचा आरोप पीयूष मालवीय, गणेश बडले, राजेश मालवीय, भुता बेठेकर, सचिन मालवीय, शिवा जैस्वाल आदींनी सादर तक्रारीतून केला आहे.संबंधित एलईडी दुरूस्तीसाठी तत्कालिन सचिव संजय दांदळे यांनी एक भ्रमणध्वनी क्रमांक दिला होता. मात्र त्यावर संपर्क केला असता तीन महिन्यापूर्वी येण्याचे सांगितले. मात्र संबंधित आला नाही परिणामी काही लाईट बंद आहेत.- बाळासाहेब ढोकेग्रामसेवक, काटकुंभ.