शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

पुत्रवियोगानंतरही ‘त्या’ माऊलीने जपले समाजभान!

By admin | Updated: July 30, 2016 00:02 IST

मातृहृदय प्रचंड हळवे असते म्हणतात. आईचा जीव तिच्या मुलांमध्येच गुंतलेला असतोे.

रूढी-परंपरांना फाटा : गरजू विद्यार्थ्यांना साहित्य वाटपअमरावती : मातृहृदय प्रचंड हळवे असते म्हणतात. आईचा जीव तिच्या मुलांमध्येच गुंतलेला असतोे. मुलाच्या वियोेगाचे दु:ख पचविण्याची वेळ एखाद्या आईवर आली तर ती कोलमडून पडते. पण, येथील एका माऊलीने मात्र, पुत्रवियोगानंतरही सामाजिक भान कायम ठेवले आणि मुलाच्या स्मृतिदिनी गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्याचा अनोखा पायंडा पाडला. नलिनी किशोर तायडे असे या दु:खी माऊलीचे नाव आहे. स्थानिक चपराशीपुऱ्यात त्यांचे घर. चांदूररेल्वे तालुक्यातील कृषी विभागामध्ये त्या शिपाई पदावर कार्यरत आहेत. आर्थिक स्थितीही बेताचीच. काही वर्षांपूर्वी त्यांच्या पतीचे निधन झाले. पदरी दोन मुले व मुलगी. परंतु नियती एवढ्यावरच थांबली नाही. सर्व काही सुरळीत सुरू असताना त्यांचा मोठा मुलगा धीरज याला कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराने ग्रासले. उपचार केलेत. परंतु त्याने या जगाचा निरोप घेतला. पतीनिधनाचे दु:ख पचवून कशीबशी सावरलेली ही माऊली पुन्हा कोलमडून पडली. जगण्याचा आधारच निघून गेला. परंतु मुळातच खंबीरपणा अंगी असल्याने त्यांनी स्वत:ला सावरले. थरथरणाऱ्या पावलांनी त्या पुन्हा उभ्या ठाकल्यात. कुटुंबाला धीर दिला. समाजासमोर ठेवला आदर्शअमरावती : नलिनीताई दरवर्षी २५ जुलै रोजी मुलाच्या स्मृतीप्रित्यर्थ चपराशीपुऱ्यातील महिंद्र विद्यालयातील गरजू विद्यार्थ्यांना गणवेश आणि वह्या-पुस्तकांचे वाटप करतात. समाजात स्वत:ची इवली-इवली दु:खे वर्षानुवर्षे कुरवाळत बसणारे अनेक लोक आपण अवतीभवती पाहतो. पण, दु:खाच्या कोषातून बाहेर पडून दुसऱ्यांचे दु:ख जाणून समाजापुढे आदर्श निर्माण करणाऱ्या नलिनीताई या विरळ्याच. नलिनीतार्इंचा ‘धीरज’ कॅन्सरने ओढून नेला असला तरी त्याच्या स्मृती आणि मुलगी तसेच धाकटा मुलगा स्वप्नील यांच्या आधाराने त्या आपल्या कौटुंबिक आणि सामाजिक जबाबदाऱ्या देखील धिरोदात्तपणे पेलत आहेत. (प्रतिनिधी)इतरांनी घ्यावा आदर्शआधी पतीचे निधन आणि मग जगण्याचा आधार असलेला मुलगा गमावल्यानंतरही नलिनीताई खंबीर राहिल्या. नेटाने त्यांनी संसार रेटला. फारसे शिक्षणही नाही आणि आर्थिक स्त्रोतही बळकट नाहीत. पण, समाजासाठी काही तरी करण्याची ईच्छा मात्र प्रबळ. त्यामुळेच कर्मकांडाला फाटा देऊन गरजू विद्यार्थ्यांना जमेल तसे शालेय साहित्य पुरविण्याचा पायंडा त्यांनी पाडला आहे. दरवर्षी मुलाच्या स्मृतीदिनी त्या हा उपक्रम राबवितात.