शहरं
Join us  
Trending Stories
1
यश दयालसमोर धोनी ठरला फिका! नो बॉल.. फ्री हिट ट्विस्टनंतरही CSK नं गमावला सामना, RCB टॉपला
2
भारत-पाक सीमेवर मोठी कारवाई, राजस्थानात पाकिस्तानी रेंजर ताब्यात!
3
घरगुती वाद विकोपाला! अकोला येथे दुहेरी खून: पतीकडून पत्नी, सावत्र मुलीची गळा दाबून हत्या
4
रामराजे नाईक-निंबाळकर यांनाही उत्तरे द्यावीच लागणार, मुख्यमंत्र्यांचे यावर बारीक लक्ष- जयकुमार गोरे
5
आयपीएल २०२५ मध्ये युवा फलंदाजांचा दबदबा, आरसीबीविरुद्ध आयुष म्हात्रेचं सुपरफास्ट अर्धशतक
6
अँथनी अल्बानीज पुन्हा होणार ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान! ऐतिहासिक विजयानंतर PM मोदींनी केलं अभिनंदन
7
"भारताला कारवाईचा पूर्ण अधिकार...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर माजी अमेरिकन NSA जॉन बोल्टन स्पष्टच बोलले
8
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
9
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
10
IPL 2025 : कोहलीनं जिरवली! खलील अहमदनं दुसऱ्याच्या जीवावर असा काढला राग, मग... (VIDEO)
11
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
12
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
13
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
14
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
15
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
16
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
17
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
18
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
19
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं
20
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप

पुत्रवियोगानंतरही ‘त्या’ माऊलीने जपले समाजभान!

By admin | Updated: July 30, 2016 00:02 IST

मातृहृदय प्रचंड हळवे असते म्हणतात. आईचा जीव तिच्या मुलांमध्येच गुंतलेला असतोे.

रूढी-परंपरांना फाटा : गरजू विद्यार्थ्यांना साहित्य वाटपअमरावती : मातृहृदय प्रचंड हळवे असते म्हणतात. आईचा जीव तिच्या मुलांमध्येच गुंतलेला असतोे. मुलाच्या वियोेगाचे दु:ख पचविण्याची वेळ एखाद्या आईवर आली तर ती कोलमडून पडते. पण, येथील एका माऊलीने मात्र, पुत्रवियोगानंतरही सामाजिक भान कायम ठेवले आणि मुलाच्या स्मृतिदिनी गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्याचा अनोखा पायंडा पाडला. नलिनी किशोर तायडे असे या दु:खी माऊलीचे नाव आहे. स्थानिक चपराशीपुऱ्यात त्यांचे घर. चांदूररेल्वे तालुक्यातील कृषी विभागामध्ये त्या शिपाई पदावर कार्यरत आहेत. आर्थिक स्थितीही बेताचीच. काही वर्षांपूर्वी त्यांच्या पतीचे निधन झाले. पदरी दोन मुले व मुलगी. परंतु नियती एवढ्यावरच थांबली नाही. सर्व काही सुरळीत सुरू असताना त्यांचा मोठा मुलगा धीरज याला कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराने ग्रासले. उपचार केलेत. परंतु त्याने या जगाचा निरोप घेतला. पतीनिधनाचे दु:ख पचवून कशीबशी सावरलेली ही माऊली पुन्हा कोलमडून पडली. जगण्याचा आधारच निघून गेला. परंतु मुळातच खंबीरपणा अंगी असल्याने त्यांनी स्वत:ला सावरले. थरथरणाऱ्या पावलांनी त्या पुन्हा उभ्या ठाकल्यात. कुटुंबाला धीर दिला. समाजासमोर ठेवला आदर्शअमरावती : नलिनीताई दरवर्षी २५ जुलै रोजी मुलाच्या स्मृतीप्रित्यर्थ चपराशीपुऱ्यातील महिंद्र विद्यालयातील गरजू विद्यार्थ्यांना गणवेश आणि वह्या-पुस्तकांचे वाटप करतात. समाजात स्वत:ची इवली-इवली दु:खे वर्षानुवर्षे कुरवाळत बसणारे अनेक लोक आपण अवतीभवती पाहतो. पण, दु:खाच्या कोषातून बाहेर पडून दुसऱ्यांचे दु:ख जाणून समाजापुढे आदर्श निर्माण करणाऱ्या नलिनीताई या विरळ्याच. नलिनीतार्इंचा ‘धीरज’ कॅन्सरने ओढून नेला असला तरी त्याच्या स्मृती आणि मुलगी तसेच धाकटा मुलगा स्वप्नील यांच्या आधाराने त्या आपल्या कौटुंबिक आणि सामाजिक जबाबदाऱ्या देखील धिरोदात्तपणे पेलत आहेत. (प्रतिनिधी)इतरांनी घ्यावा आदर्शआधी पतीचे निधन आणि मग जगण्याचा आधार असलेला मुलगा गमावल्यानंतरही नलिनीताई खंबीर राहिल्या. नेटाने त्यांनी संसार रेटला. फारसे शिक्षणही नाही आणि आर्थिक स्त्रोतही बळकट नाहीत. पण, समाजासाठी काही तरी करण्याची ईच्छा मात्र प्रबळ. त्यामुळेच कर्मकांडाला फाटा देऊन गरजू विद्यार्थ्यांना जमेल तसे शालेय साहित्य पुरविण्याचा पायंडा त्यांनी पाडला आहे. दरवर्षी मुलाच्या स्मृतीदिनी त्या हा उपक्रम राबवितात.