शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
6
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
7
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
8
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
9
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
10
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
11
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
12
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
13
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
14
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
15
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
16
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
17
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
18
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
19
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

पुत्रवियोगानंतरही ‘त्या’ माऊलीने जपले समाजभान!

By admin | Updated: July 30, 2016 00:02 IST

मातृहृदय प्रचंड हळवे असते म्हणतात. आईचा जीव तिच्या मुलांमध्येच गुंतलेला असतोे.

रूढी-परंपरांना फाटा : गरजू विद्यार्थ्यांना साहित्य वाटपअमरावती : मातृहृदय प्रचंड हळवे असते म्हणतात. आईचा जीव तिच्या मुलांमध्येच गुंतलेला असतोे. मुलाच्या वियोेगाचे दु:ख पचविण्याची वेळ एखाद्या आईवर आली तर ती कोलमडून पडते. पण, येथील एका माऊलीने मात्र, पुत्रवियोगानंतरही सामाजिक भान कायम ठेवले आणि मुलाच्या स्मृतिदिनी गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्याचा अनोखा पायंडा पाडला. नलिनी किशोर तायडे असे या दु:खी माऊलीचे नाव आहे. स्थानिक चपराशीपुऱ्यात त्यांचे घर. चांदूररेल्वे तालुक्यातील कृषी विभागामध्ये त्या शिपाई पदावर कार्यरत आहेत. आर्थिक स्थितीही बेताचीच. काही वर्षांपूर्वी त्यांच्या पतीचे निधन झाले. पदरी दोन मुले व मुलगी. परंतु नियती एवढ्यावरच थांबली नाही. सर्व काही सुरळीत सुरू असताना त्यांचा मोठा मुलगा धीरज याला कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराने ग्रासले. उपचार केलेत. परंतु त्याने या जगाचा निरोप घेतला. पतीनिधनाचे दु:ख पचवून कशीबशी सावरलेली ही माऊली पुन्हा कोलमडून पडली. जगण्याचा आधारच निघून गेला. परंतु मुळातच खंबीरपणा अंगी असल्याने त्यांनी स्वत:ला सावरले. थरथरणाऱ्या पावलांनी त्या पुन्हा उभ्या ठाकल्यात. कुटुंबाला धीर दिला. समाजासमोर ठेवला आदर्शअमरावती : नलिनीताई दरवर्षी २५ जुलै रोजी मुलाच्या स्मृतीप्रित्यर्थ चपराशीपुऱ्यातील महिंद्र विद्यालयातील गरजू विद्यार्थ्यांना गणवेश आणि वह्या-पुस्तकांचे वाटप करतात. समाजात स्वत:ची इवली-इवली दु:खे वर्षानुवर्षे कुरवाळत बसणारे अनेक लोक आपण अवतीभवती पाहतो. पण, दु:खाच्या कोषातून बाहेर पडून दुसऱ्यांचे दु:ख जाणून समाजापुढे आदर्श निर्माण करणाऱ्या नलिनीताई या विरळ्याच. नलिनीतार्इंचा ‘धीरज’ कॅन्सरने ओढून नेला असला तरी त्याच्या स्मृती आणि मुलगी तसेच धाकटा मुलगा स्वप्नील यांच्या आधाराने त्या आपल्या कौटुंबिक आणि सामाजिक जबाबदाऱ्या देखील धिरोदात्तपणे पेलत आहेत. (प्रतिनिधी)इतरांनी घ्यावा आदर्शआधी पतीचे निधन आणि मग जगण्याचा आधार असलेला मुलगा गमावल्यानंतरही नलिनीताई खंबीर राहिल्या. नेटाने त्यांनी संसार रेटला. फारसे शिक्षणही नाही आणि आर्थिक स्त्रोतही बळकट नाहीत. पण, समाजासाठी काही तरी करण्याची ईच्छा मात्र प्रबळ. त्यामुळेच कर्मकांडाला फाटा देऊन गरजू विद्यार्थ्यांना जमेल तसे शालेय साहित्य पुरविण्याचा पायंडा त्यांनी पाडला आहे. दरवर्षी मुलाच्या स्मृतीदिनी त्या हा उपक्रम राबवितात.