शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
5
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
6
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
7
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
8
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
9
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
10
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
11
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
12
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
13
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
14
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
15
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
16
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
17
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
18
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
19
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
20
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!

दिवाळीच्या पूर्वसंध्येला शेतकऱ्यांची वीज कार्यालयावर धडक

By admin | Updated: October 22, 2014 23:11 IST

वीज भारनियमन रद्द करा व पुरेशा दाबाचा वीजपुरवठा नियमित करण्याच्या मागणीसाठी संतप्त शेतकरी दिवाळीच्या पूर्वसंध्येला येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यकारी अभियंता कार्यालयावर धडकले.

मोर्शी : वीज भारनियमन रद्द करा व पुरेशा दाबाचा वीजपुरवठा नियमित करण्याच्या मागणीसाठी संतप्त शेतकरी दिवाळीच्या पूर्वसंध्येला येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यकारी अभियंता कार्यालयावर धडकले. त्यांनी कार्यकारी अभियंत्यांना घेराव घालून आपली मागणी रेटली. यावर्षी जानेवारी महिन्यात झालेल्या गारपिटीमुळे शेतकरी आणि संत्रा बागाईतदारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यातच पावसाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांच्या हातचे पीक गेले. त्यामुळे शेतकरी मेटाकुटीस आला आहे. या विपरीत परिस्थितीतही ज्यांच्याकडे ओलिताची सोय आहे आणि अप्पर वर्धा धरणातून ज्यांनी पाण्याची उचल केली अशा शेतकऱ्यांना पुरेशा दाबाने आणि वेळापत्रकाप्रमाणे अखंडित विजेचा पुरवठा मागील पंधरवाड्यापासून होत नसल्याचे चित्र आहे. यासंदर्भात दोन वेळा राज्य वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता आणि कनिष्ठ अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी निवेदन देऊनही हा प्रश्न कायमच होता. त्यामुळे बुधवारी जवळपास २०० च्या वर संतप्त शेतकरी विदर्भ जनसंग्रामचे आप्पा गेडाम यांच्या नेतृत्वात राज्य वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता चौधरी यांच्या कार्यालयात धडकले आणि हा प्रश्न जोपर्यंत निकाली निघणार नाही तोपर्यंत कार्यालयातून हलणार नाही, अशी भूमिका घेतली होती. अखंडित आणि पुरेशा दाबाअभावी अनेक शेतकऱ्यांच्या मोटारी आणि स्टार्टर जळाल्या. याप्रकरणी कार्यकारी अभियंता ना.तु. चौधरी, सहायक अभियंता खाटके यांनी मंगळवारी वरिष्ठांना विजेचा दाब वाढविण्याची विनंती केली. अधिकारी आणि त्यांची चमू १० टक्यांनी भारक्षमता वाढवून देणार असल्याचे, शिवाय संध्याकाळ पर्यंत हा प्रश्न निकाली निघण्याचे आश्वासन दिले. पाळा, सुपाळा, भाईपूर परिसरातील बंद पडलेल्या तीन डीबी बदलविण्यात आल्याचे आणि उर्वरित दोन डीबी तातडीने बदलवून देण्यात येणार असल्याचेही यावेळी अधिकाऱ्यांनी सांगितले.