शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
2
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
3
मुंबईतील राजकीय नेत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शौचालयात गाठले आणि...
4
IND vs AUS : बढती मिळताच अय्यरनं टीम इंडियाला जिंकून दिली ट्रॉफी; घरच्या मैदानात कांगारुंची शिकार
5
गाझातील सत्ता सोडण्यास नकार दिल्यास हमासची धुळधाण उडवू, डोनाल्ट ट्रम्प यांची ताकिद 
6
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
7
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
8
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
9
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
10
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
11
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
12
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
13
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
14
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
15
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
16
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
17
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
18
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
19
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
20
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार

दिवाळीच्या पूर्वसंध्येला शेतकऱ्यांची वीज कार्यालयावर धडक

By admin | Updated: October 22, 2014 23:11 IST

वीज भारनियमन रद्द करा व पुरेशा दाबाचा वीजपुरवठा नियमित करण्याच्या मागणीसाठी संतप्त शेतकरी दिवाळीच्या पूर्वसंध्येला येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यकारी अभियंता कार्यालयावर धडकले.

मोर्शी : वीज भारनियमन रद्द करा व पुरेशा दाबाचा वीजपुरवठा नियमित करण्याच्या मागणीसाठी संतप्त शेतकरी दिवाळीच्या पूर्वसंध्येला येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यकारी अभियंता कार्यालयावर धडकले. त्यांनी कार्यकारी अभियंत्यांना घेराव घालून आपली मागणी रेटली. यावर्षी जानेवारी महिन्यात झालेल्या गारपिटीमुळे शेतकरी आणि संत्रा बागाईतदारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यातच पावसाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांच्या हातचे पीक गेले. त्यामुळे शेतकरी मेटाकुटीस आला आहे. या विपरीत परिस्थितीतही ज्यांच्याकडे ओलिताची सोय आहे आणि अप्पर वर्धा धरणातून ज्यांनी पाण्याची उचल केली अशा शेतकऱ्यांना पुरेशा दाबाने आणि वेळापत्रकाप्रमाणे अखंडित विजेचा पुरवठा मागील पंधरवाड्यापासून होत नसल्याचे चित्र आहे. यासंदर्भात दोन वेळा राज्य वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता आणि कनिष्ठ अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी निवेदन देऊनही हा प्रश्न कायमच होता. त्यामुळे बुधवारी जवळपास २०० च्या वर संतप्त शेतकरी विदर्भ जनसंग्रामचे आप्पा गेडाम यांच्या नेतृत्वात राज्य वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता चौधरी यांच्या कार्यालयात धडकले आणि हा प्रश्न जोपर्यंत निकाली निघणार नाही तोपर्यंत कार्यालयातून हलणार नाही, अशी भूमिका घेतली होती. अखंडित आणि पुरेशा दाबाअभावी अनेक शेतकऱ्यांच्या मोटारी आणि स्टार्टर जळाल्या. याप्रकरणी कार्यकारी अभियंता ना.तु. चौधरी, सहायक अभियंता खाटके यांनी मंगळवारी वरिष्ठांना विजेचा दाब वाढविण्याची विनंती केली. अधिकारी आणि त्यांची चमू १० टक्यांनी भारक्षमता वाढवून देणार असल्याचे, शिवाय संध्याकाळ पर्यंत हा प्रश्न निकाली निघण्याचे आश्वासन दिले. पाळा, सुपाळा, भाईपूर परिसरातील बंद पडलेल्या तीन डीबी बदलविण्यात आल्याचे आणि उर्वरित दोन डीबी तातडीने बदलवून देण्यात येणार असल्याचेही यावेळी अधिकाऱ्यांनी सांगितले.