शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
2
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
3
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
4
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
5
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
6
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
7
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
8
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
9
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त
10
Operation Sindoor : "मुलाच्या मृत्यूचा बदला घेतला"; पर्यटकांसाठी जीव धोक्यात घातलेल्या आदिलच्या वडिलांची प्रतिक्रिया
11
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
12
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
13
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ
14
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
15
Operation Sindoor Live Updates: देशाच्या विविध भागांत मॉकड्रिल आणि ब्लॅकआऊट
16
भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्या वस्तूंचा व्यापार होतो? किती आहे टॅरिफ?
17
तणाव वाढवायचा नाही, पण...; अजित डोवाल यांची अमेरिका,ब्रिटन आणि सौदीसह अनेक देशांशी चर्चा!
18
"भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर केलेला हल्ला अभिमानास्पद, आता...", उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया
19
Jemimah Rodrigues: जेमिमा रॉड्रिग्जनं दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांना धु-धू धुतलं, ऐतिहासिक शतक ठोकलं!
20
Operation Sindoor:'आम्ही झोपलेलो होतो अन् मोठा स्फोट झाला, असं वाटलं सूर्य उगवला'; मध्यरात्री पाकिस्तानात काय घडलं?

नैतिकचा मृतदेह सापडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2018 22:53 IST

काटआमला गावानजीक नाल्याच्या पुलावरून वाहणाऱ्या पाण्यात दुचाकी घसरल्याने दोन चिमुकले बुधवारी रात्री वाहून गेले होते. धनश्रीचा मृतदेह गुुरुवारी सापडला, तर तब्बल ४० तासानंतर गाळात फसलेला नैतिकचा मृतदेह शोधपथकाच्या हाती लागला. या दोघांवर शुक्रवारी बहाद्दरपूर या त्यांच्या गावी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार पार पडले.

ठळक मुद्दे४० तास शोधमोहीम : दोघांवर बहाद्दरपूरमध्ये अंत्यसंस्कार

लोकमत न्यूज नेटवर्कबडनेरा : काटआमला गावानजीक नाल्याच्या पुलावरून वाहणाऱ्या पाण्यात दुचाकी घसरल्याने दोन चिमुकले बुधवारी रात्री वाहून गेले होते. धनश्रीचा मृतदेह गुुरुवारी सापडला, तर तब्बल ४० तासानंतर गाळात फसलेला नैतिकचा मृतदेह शोधपथकाच्या हाती लागला. या दोघांवर शुक्रवारी बहाद्दरपूर या त्यांच्या गावी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार पार पडले.बहाद्दरपूर येथील जगदीश चौरे, मुलगी धनश्री, मुलगा नैतिक व वडील मारुती यांची दुचाकी काटआमलाच्या नाल्यावरून वाहणाºया पाण्यात स्लीप झाल्याने चौघेही नाल्यात पडले. यात जगदीश चौरे यांची दोन्ही मुले वाहून गेले. दुसºया दिवशी मुलीचा मृतदेह दोन किलोमीटर अंतरावर पाण्यातच आढळून आला. मात्र, बराच शोध घेऊनदेखील सात वर्षाच्या नैतिकचा मृतदेह आढळला नाही. शुक्रवारी सकाळी ९ वाजता शोधपथकाने शोधमोहीम पुन्हा सुरू केली. दुपारी १२ वाजता नैतिकचा मृतदेह शंभर मीटरवर मध्यभागी पाण्यात आढळून आला. उशिरा रात्री नैतिकच्या मृतदेहाचे अंत्यसंस्कार पार पडले.पालकमंत्र्यांकडून शोकसंवेदनाकाटआमला येथील दुर्घटनेत मुले गमावणाºया चौरे कुटुंबीयांबद्दल पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी शुक्रवारी शोकसंवेदना व्यक्त केल्या. याप्रसंगी कोंडेश्वरी नदीवरील पुलासह जिल्ह्यातील आवश्यक त्या सर्व पुलांची उंची वाढवावी तसेच तत्काळ सुरक्षा कठडे बसविण्याबाबत निर्देश ना. पोटे यांनी अधीक्षक अभियंत्यांना दिले. चौरे कुटुंबीयांना शासनाकडून शक्य ती सर्व मदत केली जाईल, असेही त्यांनी सांगितले. पावसाळा लक्षात घेता, पूल व वाहतूक सुरक्षेबाबत आवश्यक दुरुस्त्या व सुविधा उभारण्याबाबत पालकमंत्र्यांकडून दोन महिन्यांपूर्वीही विभागाला स्पष्ट निर्देश देण्यात आलेत.जिल्हाधिकारी कार्यालयाचे पथक पोहोचलेजिल्हाधिकारी कार्यालयाचे शोध व बचाव पथक घटनेच्या ठिकाणी दुसऱ्या दिवशी पोहोचलेच नव्हते. तलाठी एस.एस. गिल, मनपाच्या फायर ब्रिगेडचे कर्मचारी, बडनेरा पोलीस ठाण्याचे कर्मचारी व परिसरातील नागरिकांनी नैतिकच्या शोधकार्यात झटत होते. तथापि, साहित्याअभावी त्यांना यश आले नाही. तब्बल तिसऱ्या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयाचे २५ जणांचे पथक बोट, जॅकेट व इतर साहित्यासह नैतिकचा शोध घेण्यासाठी पाण्यात उतरले. या पथकाने अवघ्या दोन तासांत नैसतिकचा मृतदेह शोधून काढला.