शहरं
Join us  
Trending Stories
1
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
2
Mumbai Fire: विधान भवनाच्या प्रवेशद्वाराजवळ आग; शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची माहिती
3
'सिमकार्ड नको, आता काहीतरी मोठे करा...', हरियाणाच्या तारीफला पाकिस्तानने दिले होते 'हे' काम!
4
अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाचं निदान, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती
5
८व्या वेतन आयोगानंतर पगार आणि पेन्शन किती वाढेल? कधी लागू होईल? कोणाला मिळेल फायदा?
6
"आजाराबद्दल ऐकून काळजी वाटली, आम्ही तुमच्या सोबत..."; PM मोदींनी जो बायडेनना दिला धीर
7
एसीची सर्व्हिसिंग करण्याची योग्य वेळ तुम्हाला माहितीय का? अन्यथा बसेल मोठा फटका
8
मोसादचा सर्वात खतरनाक गुप्तहेर...! एली कोहेनला चौकात फाशी दिलेली, त्याला आज ६० वर्षे झाली; इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन
9
CJI साठी काय असतो प्रोटोकॉल? महाराष्ट्र दौऱ्यावर आलेले सरन्यायाधीश गवई झाले नाराज
10
10th Pass Job: दहावी पास उमेदवारांसाठी बँकेत चांगल्या पगाराची नोकरी, लगेच करा अर्ज!
11
पाकिस्तानला माहिती देणे चूक नाही, गंभीर गुन्हा...राहुल गांधींची जयशंकर यांच्यावर घणाघाती टीका
12
India Pakistan War : मोठा खुलासा! सीमेवरील तणावाच्या काळात चीनने पाकिस्तानसाठी हेरगिरी केली
13
मीठ ते विमान... पण सुरुवात कुठून? जमशेदजी टाटांच्या पहिल्या व्यवसायाची अनोखी गोष्ट
14
ज्योती मल्होत्रा, अन् नवांकुर चौधरीसह ते 10 लोक कोण, ज्यांच्यावर देशद्रोहाचा आरोप?
15
Mumbai: धक्कादायक! अडीच वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करून हत्या; आईसह तिच्या प्रियकराला अटक
16
अनिल अंबानी पुन्हा ॲक्शन मोडमध्ये! मुकेश अंबानींना देणार टक्कर? भूतानसोबत २००० कोटींचा करार
17
प्यार तूने क्या किया! डिजिटल अफेअर्स म्हणजे काय, भारतात का लोकप्रिय होतोय रिलेशनशिप ट्रेंड?
18
IPL मध्ये आतापर्यंत खेळले १२०० क्रिकेटर्स, पण 'ही' कामगिरी करणारा साई सुदर्शन 'एकमेव'!!
19
जिथे होते लष्कर-ए-तोयबाचे तळ, तिथेच १४ दिवस प्रशिक्षण घेत होती ज्योती मल्होत्रा! नवा खुलासा
20
मॅनेजरच्या वागणुकीनं नैराश्य, कामाच्या दबावामुळे २५ वर्षीय इंजिनिअरनं उचललं टोकाचं पाऊल

रिद्धपूर येथे मराठी विद्यापीठ स्थापन करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2018 22:22 IST

राज्य शासनाने मराठी विद्यापीठ मुंबई येथे प्रस्तावित केले आहे. परंतु, मोर्शी तालुक्यातील रिद्धपूर येथे मराठीतील दोन्ही आद्य ग्रंथांचे लेखन झाले असल्याने याच ठिकाणी मराठी विद्यापीठ स्थापन करावे, ....

ठळक मुद्देमागणी : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

आॅनलाईन लोकमतअमरावती : राज्य शासनाने मराठी विद्यापीठ मुंबई येथे प्रस्तावित केले आहे. परंतु, मोर्शी तालुक्यातील रिद्धपूर येथे मराठीतील दोन्ही आद्य ग्रंथांचे लेखन झाले असल्याने याच ठिकाणी मराठी विद्यापीठ स्थापन करावे, अशी मागणी खा. आनंदराव अडसूळ यांच्या नेतृत्वात जि.प. उपाध्यक्ष दत्ता ढोमणे यांनी जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांना शनिवारी निवेदनाद्वारा केली.मराठीमधील आद्य गद्य ग्रंथ ‘लीळाचरित्र’ तसेच आद्य पद्य ग्रंथ ‘महदंबेचे धवळे’ यांचे लेखन रिद्धपूर येथे झाले. आद्य संशोधक, चरित्रकार माहिमभट्ट यांनी येथेच ‘वाजेश्वरी’ या स्थानावर शके १२०० मध्ये लीळाचरित्राची निर्मिती केली. या गं्रथामुळेच मराठीची ओळख झाली. ही मराठी भाषिकांसाठी गौरवाची बाब आहे. येथेच महानुभावीय संतांनी लिखाण केले आहे. येथेच हजारोंच्या संख्येत हस्तलिखिते पूर्वजांचा वारसा म्हणून जतन केली आहे. सरसंघचालक मोहन भागवत यांनीही भेटीदरम्यान मराठी विद्यापीठ रिद्धपूर येथेच होण्यास सहमती दर्शविली. मात्र, आता मराठी विद्यापीठ मुंबई येथे नेण्याचा घाट रचला जात आहे. हा महानुभावीय वाङ्मयावर व मराठी भाषिकांवर अन्यायकारक निर्णय असल्याचे निवेदनात म्हटले आहे. याचा शासनाने गांभीर्याने विचार करावा, अशी मागणी झेडपी उपाध्यक्ष दत्ता ढोमणे यांनी केली. यावेळी जि.प.अध्यक्ष नितीन गोंडाणे उपस्थित होते.महानुभाव पंथीयांची काशी म्हणून रिद्धपूर हे गाव देशभर ओळखले जाते. या गावाचे महत्त्व लक्षात घेऊन व भाविकांच्या भावनांचा आदर करण्यासाठी रिद्धपूर येथेच मराठी विद्यापीठाची स्थापना शासनाने करणे आवश्यक आहे.- दत्ता ढोमणे,उपाध्यक्ष, जिल्हा परिषद