शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

संपूर्ण जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2018 21:56 IST

शासनाने जाहीर केलेल्या दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये जिल्ह्यातील १४ पैकी केवळ पाच तालुके आहेत. इतरही नऊ तालुक्यांतील दुष्काळी परिस्थिती गंभीर आहे. त्यामुळे शासनाने संपूर्ण जिल्ह्यातच दुष्काळ जाहीर करावा, असा प्रस्ताव जिल्हा परिषद सदस्य सुनील डिके यांनी शुक्रवारी स्थायी समितीत मांडला. हा ठराव गटनेता बबलू देशमुख व इतर सदस्यांनी एकमताने पारित केला.

ठळक मुद्देजिल्हा परिषद : स्थायी समितीत ठराव पारित, सर्व तालुक्यांमध्ये गंभीर स्थिती

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शासनाने जाहीर केलेल्या दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये जिल्ह्यातील १४ पैकी केवळ पाच तालुके आहेत. इतरही नऊ तालुक्यांतील दुष्काळी परिस्थिती गंभीर आहे. त्यामुळे शासनाने संपूर्ण जिल्ह्यातच दुष्काळ जाहीर करावा, असा प्रस्ताव जिल्हा परिषद सदस्य सुनील डिके यांनी शुक्रवारी स्थायी समितीत मांडला. हा ठराव गटनेता बबलू देशमुख व इतर सदस्यांनी एकमताने पारित केला. सदर ठराव शासनाकडे पाठविला जाणार आहे.शासनामार्फत राज्यातील १५१ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला. त्यामध्ये जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी, अचलपूर, चिखलदरा, मोर्शी आणि वरूड या पाच तालुक्यांचा समावेश आहे. मात्र, दर्यापूर, भातकुली, अमरावती, चांदूर बाजार, धारणी, धामणगाव रेल्वे, चांदूर रेल्वे, नांदगाव खंडेश्वर, तिवसा अशा नऊ तालुक्यांमध्ये पर्जनमान्य कमी आहे. येथे पिकांचे नुकसान आहे. त्यामुळे या तालुक्यांमध्येदेखील शासनाने दूष्काळ जाहीर करावा, असा प्रस्ताव सदस्य सुनील डिके यांनी जिल्हा परिषद स्थायी समितीत मांडला. त्याला सर्व पदाधिकारी व सदस्यांनी समर्थन देत ठराव मंजूर करून घेतला. तो शासनाकडे पाठविला जातात आहे. यावेळी सभेला जिल्हा परिषद अध्यक्ष नितीन गोंडाणे, उपाध्यक्ष दत्ता ढोमणे, सभापती बळवंत वानखडे, सुशीला कुुकडे, वनिता पाल, काँग्रेसचे गटनेता बबलू देशमुख, सदस्य बाळासाहेब हिंगणीकर, महेंद्रसिंह गैलवार, सुहासिनी ढेपे, प्रियंका दगडकर आदींनी अनुमोदन दिले.