शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
2
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
3
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
4
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS
5
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
6
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
7
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
8
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
9
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
10
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
11
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
12
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
13
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
14
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
15
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
16
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
17
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
18
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
19
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
20
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मनोरंजन महागले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2019 21:58 IST

टेलिकॉम रेग्युलेटरी अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडियाने ‘पे चॅनल’ची पॅकेज प्रणाली केबल आॅपरेटरांना लागू केल्यामुळे मनोरजंन महागले आहे.

ठळक मुद्देट्रायच्या नियमांची अंमलबजावणी : ग्राहकांची केबल आॅपरेटरकडे धाव

वैभव बाबरेकर ।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : टेलिकॉम रेग्युलेटरी अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडियाने ‘पे चॅनल’ची पॅकेज प्रणाली केबल आॅपरेटरांना लागू केल्यामुळे मनोरजंन महागले आहे.१ फेब्रुवारीपासून आपले आवडते चॅनल निवडण्याची संधी ग्राहकांना मिळाली आहे. मात्र, ग्राहकांनी आवडती चॅनल घेतल्यानंतरही केबलचे भाडे पूर्वीपेक्षा अधिक झाल्याची वस्तुस्थिती आहे. पूर्वी २०० ते २५० रुपयांमध्ये मिळणाऱ्या बहुतांश चॅनलसाठी ग्राहकांना आता ३०० ते ४०० रुपयांपेक्षा अधिकचा खर्च करावा लागत आहे. त्यामुळे ग्राहकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.ग्राहकांमध्ये मनोरंजनासाठी कमीत कमी पैसा खर्च करण्याची धारणा आहे. पूर्वी अ‍ॅनालॉग चॅनल्स पाहताना ग्राहकांना केवळ शंभर रुपयेच खर्च करावे लागत होते. त्यानंतर सेटटॉप बॉक्सने सर्वांनाच डिजीटल प्रणालीची भुरळ पाडली. मात्र, केबल भाडे शंभरावरून थेट दोनशे रुपयांपर्यंत पोहोचले. २०० ते २५० रुपयांमध्ये ग्राहकांना सर्व प्रकारची चॅनल मिळत असल्याने ग्राहक समाधानी होते. मात्र, आता ट्रायच्या नवीन प्रणालीमुळे केबल भाडे मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. भारतीय दुरसंचार विनियामक प्राधिकरणाने लागू केलेल्या नवीन प्रणालीची अमंलबजावणी सुरु झाल्याने अमरावतीमधील ग्राहकांनी केबल आॅपरेटरकडे धाव घेतली आहे. केबल आॅपरेटर ग्राहकांकडून अर्ज भरून घेत असून, त्यामध्ये ग्राहकांना आवडेल ते चॅनल्स निवडण्याची संधी मिळाली आहे.‘फ्री टू एअर’च्या १०० चॅनल्ससाठी ग्राहकांना १३० रुपये मोजावे लागणार आहेत. या व्यतिरिक्त पे चॅनल्ससाठी वेगळी रक्कम ग्राहकांना मोजावी लागत आहे. १३० रुपये फ्री टू एअर चॅनल्स, ग्राहकांनी निवडलेले पे चॅनल्स व जीएसटी १८ टक्के ही सर्व रक्कम ३०० ते ४०० रुपयांच्या घरात जात आहे. ग्राहकांना पूर्वीपेक्षा अधिक केबल भाडे भरावे लागत असल्यामुळे आता ग्राहकांचा विरोध सुरु झाला आहे. ग्राहक केबल आॅपरेटरांवर रोष व्यक्त करीत असून, काही ग्राहक तर जिल्हा प्रशासनाकडे दाद मागण्यासाठी सुध्दा जाणार असल्याचे बोलले जाते.पे चॅनल बंद,फ्री टू एअर सुरू१ फेबु्रवारी २०१९ रोजीपासून शहरातील बहुतांश एसएसओंनी पे चॅनल्स बंद केली असून, केवळ फ्री टू एअर चॅनल्स सुरु ठेवली आहेत. केबल आॅपरेटरांकडून मिळालेले अर्ज ग्राहक भरून देत आहे. मात्र, प्रत्येक ग्राहकांचे आवडीचे चॅनल्स अ‍ॅक्टिव्ह करताना केबल आॅपरेटरांची दमछाक उडाली आहे. शहरात बहुतांश केबल आॅपरेटरांच्या घरी व कार्यालयावर ग्राहकांची मोठी गर्दी आहे. प्रत्येक ग्राहक आपआपल्या आवडीनिवडीचे चॅनल्स सुरु करण्यासाठी चढाओढ करीत असल्याने हे स्थिती बनली आहे.केबलचे चॅनल आता पुर्वीपेक्षा महाग झाले आहे. मनोरंजनासाठी इतका खर्च करणे, सर्व सामान्यांच्या आवाक्याबाहेरचे आहे. पूर्वीप्रमाणेच दर करण्याची मागणी शासनाकडे करू.- प्रशांत कंठाळे, ग्राहकग्राहकांकडून अर्ज भरून त्यांना आवडेल तीच चॅनल्स दिले जात आहे. मात्र, केबलच्या दरात वाढ झाल्याने ग्राहकांच्या रोषाला आम्हालाच सामोरे जावे लागत आहे.- निलेश ठाकरे,केबल आॅपरेटर.