शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
2
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
3
Mumbai Fire: विधान भवनाच्या प्रवेशद्वाराजवळ आग; शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची माहिती
4
'सिमकार्ड नको, आता काहीतरी मोठे करा...', हरियाणाच्या तारीफला पाकिस्तानने दिले होते 'हे' काम!
5
बाजारात चढ-उतार! इन्फोसिससह 'हे' शेअर्स घसरले; तुमच्या पोर्टफोलिओवर काय परिणाम?
6
Mumbai: नाल्यात अडकलेल्या मुलीला वाचवण्याच्या प्रयत्नात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
7
"त्यांनी माझं पॅकअप केलं होतं..", आमिर खानमुळे 'तारक मेहता...' फेम अभिनेत्याची गेली नोकरी
8
IPL 2025: "धोनीचे फॅन्स खरे आहेत, बाकीच्यांचे..."; हरभजन सिंगने विराट कोहलीवर केला शाब्दिक हल्ला?
9
अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाचं निदान, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती
10
८व्या वेतन आयोगानंतर पगार आणि पेन्शन किती वाढेल? कधी लागू होईल? कोणाला मिळेल फायदा?
11
"आजाराबद्दल ऐकून काळजी वाटली, आम्ही तुमच्या सोबत..."; PM मोदींनी जो बायडेनना दिला धीर
12
एसीची सर्व्हिसिंग करण्याची योग्य वेळ तुम्हाला माहितीय का? अन्यथा बसेल मोठा फटका
13
मोसादचा सर्वात खतरनाक गुप्तहेर...! एली कोहेनला चौकात फाशी दिलेली, त्याला आज ६० वर्षे झाली; इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन
14
CJI साठी काय असतो प्रोटोकॉल? महाराष्ट्र दौऱ्यावर आलेले सरन्यायाधीश गवई झाले नाराज
15
10th Pass Job: दहावी पास उमेदवारांसाठी बँकेत चांगल्या पगाराची नोकरी, लगेच करा अर्ज!
16
पाकिस्तानला माहिती देणे चूक नाही, गंभीर गुन्हा...राहुल गांधींची जयशंकर यांच्यावर घणाघाती टीका
17
India Pakistan War : मोठा खुलासा! सीमेवरील तणावाच्या काळात चीनने पाकिस्तानसाठी हेरगिरी केली
18
मीठ ते विमान... पण सुरुवात कुठून? जमशेदजी टाटांच्या पहिल्या व्यवसायाची अनोखी गोष्ट
19
ज्योती मल्होत्रा, अन् नवांकुर चौधरीसह ते 10 लोक कोण, ज्यांच्यावर देशद्रोहाचा आरोप?
20
अनिल अंबानी पुन्हा ॲक्शन मोडमध्ये! मुकेश अंबानींना देणार टक्कर? भूतानसोबत २००० कोटींचा करार

पाच हजार लोकसंख्येवरील ग्रामपंचायतीला अभियंता

By admin | Updated: May 11, 2015 23:59 IST

गावातील कामे करण्यासाठी ग्रामपंचायतींना अधिकार देण्यात आले आहेत. मात्र संबंधित कामात तांत्रिक कामकाज ...

२८ गावांचा समावेश : गट अभियंता ९ तर पंचायत अभियंता १९अमरावती : गावातील कामे करण्यासाठी ग्रामपंचायतींना अधिकार देण्यात आले आहेत. मात्र संबंधित कामात तांत्रिक कामकाज करण्यासाठी अधिकार नव्हते. त्यामुळे ती कामे प्रलंबित राहत असल्याचे शासनाच्या निदर्शनास आले. त्यावन शासनाने राज्यातील पाच हजाराच्यावर लोकसंख्या असलेल्या दोन हजार ७५ ग्रामपंचायतींना पंचायत अभियंता देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता ग्रामपंचायत स्तरावरील कामे तातडीने मार्गी लावणे शक्य होणार आहे. यामध्ये जिल्ह्यातील २८ ग्रामपंचायतीमध्ये अभियंत्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गावपातळीवर विकासाचे केंद्रबिंदू असलेल्या ग्रामपंचायत ही सक्षम करण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने पावले उचलली आहेत. त्याअंतर्गत आता तेरावा वित्त आयोग २५-१५ योजनेचा निधी यासह अन्य विकास कामांचा निधी आता पंचायत समितीकडे न येता ग्रामपंचायतींना देण्यात येत आहे. त्यामुळे ग्रामपंचायतींना काही कामे करण्याचा अधिकार प्राप्त झाला ओ. त्यात ज्या ग्रामपंचायतींचे उत्पनन ५० हजारापर्यंत आहे. त्या ग्रामपंचायतींना १० लाख आणि ज्याचे उत्पन्न ५० हजारापुढे आहे त्या ग्रामपंचायतींना १५ लाखांपर्यंतची कामे करण्याचे अधिकार दिले आहेत. त्यासंदर्भातील अध्यादेशही नुकताच जाहीर करण्यात आला आहे. या माध्यमातून होणाऱ्या विकासकामांसाठी राज्यातील ग्रामपंचायतींना कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध होत आहे. ती कामे करताना अनेकदा योग्य तांत्रिक मार्गदर्शन मिळत नसल्याने राज्यामध्ये केलेल्या एका पाहणीमध्ये संबंधित गावातील कामे निधी असूनही तांत्रिक कारणामुळे प्रलंबित राहत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे आता शासनाने राज्यातील २ हजार ७५ ग्रामपंचायतींना पंचायत अभियंता देण्याचा निर्णय घेतला आहे.अवैध बांधकामाला लागणार ब्रेकग्रामपंचायत पातळीवर अनेकदा ग्रामपंचायतीला कल्पना न देताच अनेक बांधकामे केली जातात. ग्रामपंचायतीत पंचायत अभियंता नेमल्यामुळे बांधकामाच्या संबंधित सर्व बाबींवर संबंधित अभियंता देखरेख ठेवणार आहे. त्यामुळे गावपातळीवर होणाऱ्या सर्व बांधकामावर त्यांचे लक्ष राहून अवैध बांधकामाला आळा बसणार आहे.नऊ पंचायत समितीत गट अभियंताजिल्ह्यात राजीव गांधी पंचायत सशक्तीकरण अभियाना अंतर्गत नऊ पंचायत समिती स्तरावर गट अभियंता नियुक्त करण्यात आले आहेत. यामध्ये अमरावती, तिवसा, भातकुली, चांदूरबाजार, दर्यापूर, चांदूररेल्वे, धामणगाव रेल्वे, नांदगाव खंडेश्वर व मोर्शी पंचायत समितीचा समावेश आहे. या ग्रामपंचायतीत पंचायत अभियंतापथ्रोट, गौरखेडा कुंभी, कांडली, तळेगाव ठाकूर, करजगाव, शिरजगाव बंड, कुटुंगा, कापूसतळणी, बेनोडा शहीद, वडनेरगंगाई, नांदगाव खंडेश्वर, गायवाडी, पुसला, धारणी, घाटलाडकी, यावली शहीद, धामणगाव गढी, वाठोडा शुक्लेश्वर आणि वलगाव या १९ ग्रामपंचायतीत पंचायत अभियंता नियुक्त केले आहे.