शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

शिक्षकांच्या सेवानिवृत्ती प्रश्नासाठी शिक्षणमंत्र्यांना साकडे

By admin | Updated: November 4, 2015 00:16 IST

राज्याच्या शिक्षण विभागात १ नोव्हेंबर २००५ पूर्वी अंशत: अनुदानित, विनाअनुदानित शाळांमध्ये सेवेत रुजू झालेले ...

विद्यापीठात चर्चा : शिक्षण संघर्ष समितीने निवेदनातून केली मागणी अमरावती : राज्याच्या शिक्षण विभागात १ नोव्हेंबर २००५ पूर्वी अंशत: अनुदानित, विनाअनुदानित शाळांमध्ये सेवेत रुजू झालेले शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचा प्रश्न सोडविण्यासाठी रविवारी राज्याचे शालेय, तंत्र शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना साकडे घालून मागणीचे निवेदन सादर करण्यात आले. गत १४ वर्षांपासूनच्या लढ्याला न्याय प्रदान करण्यात यावा, अशी मागणी शिक्षण संघर्ष समितीच्यावतीने करण्यात आली.ना. विनोद तावडे हे रविवारी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात नवीन विद्यापीठ कायदा तयार करण्याच्या पार्श्वभूमीवर तज्ज्ञांची मते जाणून घेण्यासाठी आले असता त्यांना सदर मागणीचे निवेदन सादर करण्यात आले. यावेळी विदर्भ जुनी पेन्शन योजना कृती समिती व शिक्षण संघर्ष समितीच्या विभागीय अध्यक्ष संगीता शिंदे ( बोंडे), सचिव विकास दिवे यांनी ना. विनोद तावडे यांच्या पुढ्यात शिक्षकांच्या संघर्षमय मागण्यांचा पाढा वाचला. ही समस्या केवळ विदर्भापुरती मर्यादित नसून ती राज्यभरातील शिक्षकांची समस्या आहे. त्यामुळे शासनाने सामाजिक जाण ठेवून १ नोंव्हेंबर २००५ पूर्वी सेवेत रुजू झालेल्या अंशत: अनुदानित, विनाअनुदानित शाळेतील कर्मचाऱ्यांना न्याय प्रदान करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. दरम्यान शिष्टमंडळाने शासन निर्णयाचा दाखला देत बहुतांश बाबी या शिक्षकांच्या बाजूने असल्याचा दावा केला. यावेळी संगीता शिंदे, विकास दिवे, शरद तिरमारे, विलास डव्हे, रुपेश टाले, सुरेश मोलके, देवेंद्र झेले, नितीन तायडे, नीलय बोंडे, प्रभाती ठवकर, श्वेता वाकोडे, संतोष बोरकर, प्रवीण जायदे, प्रवीण गुल्हाणे, नीलेश नागापुरे, हारुण शहा, सुशील इखनकर, ललित चौधरी, गोवर्धन बेदोडकर, सचिन अंजीकर, अमोल भोजने आदींनी ना.तावडे यांच्या पुढ्यात जुनी सेवानिवृत्ती योजना लागू करण्यासाठी साकडे घातले. (प्रतिनिधी)इर्विन चौकात धरणे आंदोलन१ नोव्हेंबरपूर्वी अंशत: अनुदानित, विनाअनुदानित शाळांतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी रविवारी येथील इर्विन चौकातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरात अन्यायग्रस्त शिक्षकांनी काळ्या फिती लावून धरणे आंदोलन केले. यावेळी शासन धोरणाचा निषेध नोंदविला. धरणे, आंदोलनानंतर शिक्षकांचे शिष्टमंडळ ना. विनोद तावडे यांच्या भेटीसाठी विद्यापीठात गेलेत. ना.तावडे यांना प्रश्न, समस्यांच्या गाऱ्हाणी अन्यायग्रस्तांनी अवगत केल्यात.तोडगा काढण्याचे शालेय शिक्षणमंत्र्यांचे आश्वासनगत १४ वर्षांपासूनचा शिक्षकांचा प्रश्न सोडविताना काही तांत्रिक अडचणी येत असल्या तरी त्या शासनस्तरावर सोडविण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. त्याकरिता ९ नोव्हेंबर रोजी मंत्रालयात बैठक बोलावण्यात आली आहे. निश्चितच तोडगा निघेल, यात शंका नाही, असे आश्वासन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी शिष्टमंडळाला दिले.