शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने शस्त्रसंधी मोडली, अफगाणिस्तानवर हल्ला; चिडलेले तालिबान म्हणतेय, 'आता तुम्हाला तोडणार'
2
"घरात एवढा मोठा व्यवहार होतो अन्..."; पार्थ पवारांच्या जमीन व्यवहारावरून वडेट्टीवार यांचा अजित पवारांना थेट सवाल
3
कोकणात ठाकरे आणि शिंदे गट एकत्र येणार? राणेंच्या बालेकिल्ल्यात भाजपाला आव्हान देणार, गुप्त बैठक झाल्याची चर्चा
4
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! SBI नवीन आयपीओ आणण्याच्या तयारीत, ८ हजार कोटींपर्यंत उभे करण्याचा प्लॅन
5
अमेरिकेचा चीनला मोठा झटका! आणखी एका कंपनीने कामकाज केलं बंद; ४०० कर्मचाऱ्यांची नोकरी गेली
6
कमाईच नव्हे, दिवसाला ७ कोटी दानही ! 'हे' आहेत भारताचे टॉप 10 दानशूर; अंबानी, अदानी कितवे?
7
'मनी हाइस्ट' पाहून १५० कोटींची फसवणूक; लोकांना 'असं' अडकवायचे जाळ्यात, झाला पर्दाफाश
8
स्विमिंग पूलसाठी खोदायला गेला, सापडले घबाड! घराच्या बागेत सापडली सोन्याची बिस्कीटे अन् नाणी..., सरकारने त्यालाच देऊन टाकले...
9
"या गोष्टी बाहेर जाणं चूक आहे..."; राज ठाकरेंनी सुनावल्यानंतर पिट्याभाईची पहिली प्रतिक्रिया
10
Ambadas Danve : Video - "वोटचोरीनंतर 'खतचोरी', भाजपाच्या रुपाने कुंपणच शेत खातंय"; अंबादास दानवेंचा घणाघात
11
दिल्ली विमानतळाच्या एटीसीमध्ये तांत्रिक बिघाड; १०० हून अधिक विमानफेऱ्या रखडल्या, विलंबाने 
12
Infosys Buyback 2025: २२ टक्के प्रीमिअमवर शेअर पुन्हा खरेदी करणार इन्फोसिस; रेकॉर्ड डेट निश्चित, कोणाला होणार फायदा?
13
“मुलाचे ३०० कोटींचे व्यवहार पित्याला ज्ञात नाही, तुमचे तुम्हाला पटते का”; कुणी केली टीका?
14
बिहारमध्ये जेव्हा जेव्हा ५ टक्के मतदान वाढले, तेव्हा सरकार पडले; काल ८.५ टक्के मतदान वाढ कशाचे संकेत?
15
Anna Hazare: पार्थ पवार जमीन घोटाळा, अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “कुटुंबाचे संस्कार...”
16
Stock Market Today: शेअर बाजार जोरदार आपटला, सेन्सेक्स ४५० अंकांनी घसरला; निफ्टीही २५,४०० च्या खाली
17
Astro Tips: शुक्रवारी लक्ष्मी उपासनेसाठी तुम्ही कापराचे 'हे' उपाय करता का? मिळते धन-समृद्धी!
18
'ऑपरेशन सिंदूरमध्ये ८ विमाने पडली'; 'टॅरिफ'ने भारत-पाक युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा नवा गौप्यस्फोट
19
जगातील सर्वात महागडं पॅकेज; मस्क यांची कमाई सिंगापूर, UAE, स्वित्झर्लंडच्या GDP पेक्षाही अधिक, किती मिळणार सॅलरी?
20
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी

नागरिकत्व संशोधन कायद्याविरोधात अमरावतीत एल्गार, विविध संघटनांचा सहभाग

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2019 21:39 IST

केंद्र शासनाने पारित केलेल्या नागरिकत्व संशोधन विधेयकाविरोधात गुरुवारी जिल्ह्यात हजारो मोर्चेकरी एकवटले.

 अमरावती - केंद्र शासनाने पारित केलेल्या नागरिकत्व संशोधन विधेयकाविरोधात गुरुवारी जिल्ह्यात हजारो मोर्चेकरी एकवटलेत. ‘हम भारत के लोग’ असे म्हणत त्यांनी  नागरिकत्व संशोधन विधेयकाविरोधात  जिल्हा कचेरीवर धडक दिली. अचलपूर, परतवाडा, तिवसा, नांदगाव खंडेश्वर, मोर्शी येथेही तहसील व उपविभागीय कार्यालयावर मूक मोर्चा काढून विरोध करण्यात आला. या मोर्चात मुस्लिम समुदायाची उपस्थिती लक्षणीय होती. अमरावती येथे इर्विन चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मूक मोर्चा निघाला. भारत मुक्ती मोर्चा, भारत मुक्ती पार्टी, जमियत उलेमा-ए-हिंद, भीम आर्मी, महामानव संघटना, बारा बलुतेदार संघटना, आंबेडकरवादी रिपब्लिकन पार्टी, ओबीसी महासभा, आप, टिपू सुल्तान ब्रिगेड, टिपू सुल्तान सेना, एमआयएम, इंडियन युनियन मुस्लिम लिग, युथ मुस्लिम लिग, पहल फाऊंडेशन (बडनेरा), विदर्भ उर्दू साहित्य समिती आदी ३६ संघटनांचा यात सहभाग होता. मोर्चेक-यांवर लक्ष ठेवण्यासाठी पोलिसांचा फौजफाटा होता. यावेळी मोर्चेक-यांनी विविध घोषणा फलकांद्वारे आपल्या समस्येकडे लक्ष वेधले. हा मूक मोर्चा जिल्हा कचेरीवर पोलिसांनी अडविला.यानंतर मोर्चातील शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी नितीन व्यवहारे यांना मागणीचे निवेदन सादर केले. हे निवेदन राष्ट्रपती, पंतप्रधानांकडे पाठविण्याची विनंती करण्यात आली. यावेळी मोर्चातील प्रमुख वक्त्यांनी उपस्थित जनसमुदायाला संबोधित करताना सदर अन्यायकारक विधेयक रद्द करण्याची मागणी केली. बडनेरा शहरातही नागरिकत्व संशोधन विधेयकाला विरोध करण्यात आला. पाण्याच्या टाकीवर चढून निदर्शने करण्यात आली. यावेळी आंदोलकांनी सीएबी/सीएएस २०१९ विधेयक रद्द करण्याची मागणी केली. हातात राष्ट्रध्वज अन् फलकनागरिकत्व संशोधन विधयेकाविरोधात १९ डिसेंबर रोजी काढण्यात आलेल्या मोर्चात सहभागी झालेल्या मोर्चेकºयांच्या हाती राष्ट्रध्वज आणि मागणीचे फलक झळकत होते. ‘हम भारत के लोग’, ‘भारत हमारी जन्मभूमी है’ असे लक्षवेधी फलक नागरिकांचे लक्ष वेधणारे ठरले.

पोलिसांचा तगडा बंदोबस्तनागरिकत्व संशोधन विधेयकाविरोधात तीव्र विरोध दर्शविण्यासाठी हजारोंच्या संख्येने नागरिकांनी गुरुवारी जिल्हा कचेरीवर मूक मोर्चा काढला. या मोर्चादरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, याकरिता इर्र्विन चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात चोख पोलीस बंदोबस्त लावला होता. यावेळी पोलीस आयुक्त संजयकुमार बाविस्कर हे स्वत: या मोर्चावर लक्ष ठेवून होते.

टॅग्स :citizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकAmravatiअमरावती