शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
3
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
4
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
5
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
6
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
7
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
8
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
9
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
10
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
11
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
12
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
13
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
14
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
15
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
16
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
17
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर
18
'निराधार आणि बेजबाबदार'; राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाने सोडले मौन, काय दिले उत्तर?
19
IND vs ENG 5th Test: Gus Atkinson चा 'पंजा'! टीम इंडियानं २० धावांत गमावल्या ४ विकेट्स! अन्...
20
सेबीच्या नियमांना फाटा देऊन शेअर्सची खरेदी-विक्री, पण धोकाही मोठा! 'ग्रे मार्केट'ची Inside Story

इलेकट्रॉनिक मीटरची सक्ती नावापुरतीच !

By admin | Updated: February 6, 2017 00:13 IST

शासनाने राज्यात आॅटोचालकांना परवाना देतानाच आॅटोमध्ये ईलेक्ट्रॉनिक मीटर लावणे सक्तीचे केले आहे.

अंमलबजावणी केव्हा? : अधिकाऱ्यांच्या कारवाया थंडबस्त्यात संदीप मानकर अमरावतीशासनाने राज्यात आॅटोचालकांना परवाना देतानाच आॅटोमध्ये ईलेक्ट्रॉनिक मीटर लावणे सक्तीचे केले आहे. पण यासंदर्भाची अंमलबजावणी केवळ नावापुरतीच असून प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या कारवाया थंडावल्यामुळे आॅटोमधील मीटर केवळ पांढरा हत्ती बनल्याचे निदर्शनास येत आहे. शासनाच्या आदेशानव्ये आरटीओने आॅटोचे पासिंग देतानाच आॅटोमध्ये ईलेक्ट्रॉनिक मीटर लावणे सक्तीचे केले आहे. पण अनेक वर्र्षांपासून ना तर नागरिक या निर्णयाला स्वीकारत आहेत, ना आॅटोचालकांची या निर्णयाची अंमलबजावणी करण्याची मानसिकता आहे. त्यामुळे शहरातील आॅटो नियमांचे उल्लंघन करीत बिनबोभाट धावत आहेत. एका चौकातून दुसऱ्या चौकात आॅटोमध्ये प्रवास करायचा असेल तर प्रतिप्रवासी १० रुपयांचा दर आकारण्यात येतो. तीन-एकचे पासिंग असतानाही चार ते पाच प्रवासी आॅटोमध्ये बसविण्यात येतात. त्यामुळे शहरात मोठ्या प्रमाणात नियमबाह्य प्रवासी वाहतूक करण्यात येत आहे. याकडे प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या मोटार वाहन निरीक्षकांचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे कारवाया थंडबस्त्यात पडल्यामुळे कुठल्याही चांगल्या निर्णयाची अंमलबजावणी होत नाही. नियमाने ईलेक्ट्रॉनिक्स मीटरच्या दराने प्रवास केला तर पहिल्या किमी. ला १० रुपये व नंतर प्रत्येक किमीला. ८ रुपयांप्रमाणे दर आकारण्यात येतो. हा दर प्रवाशांच्यादेखील हिताचा नसल्याने त्यांना शहरात काही अंतरापर्यंत जरी प्रवास केला तर त्यांना अतिरिक्त दर मोजावे लागतात. त्यामुळे नागरिकही या निर्णयाचे स्वागत करीत नाही. सध्या पेट्रोल व डिझेलचे दर वाढल्यामुळे आॅटोचालकांनाही एक प्रवासी आॅटोमध्ये नेणे परवडत नाही. परंतु शासनाने काही वर्षांपूर्वी काढलेल्या ईलेक्ट्रॉनिक मीटर लावण्यासंदर्भाच्या अध्यादेशाचे काय? व या कायद्याची अंमलबजावणी होत नसेल तर आॅटोमध्ये ईलेक्ट्रॉनिक्स मीटर बसविणे सक्तीचे का, हा प्रश्न सामान्य नागरिकांना पडला आहे. अमरावती जिल्ह्यामध्ये ३१ डिसेंबर २०१६ पर्यंत अधिसुचित क्षेत्रातील ई-मीटर बसविलेल्या एकूण जुने व नवीन आॅटोरिक्षाची संख्या असलेले ४ हजार ८८५ आॅटो रस्त्यावर धावत आहेत. २०११ मध्ये करण्यात आली होती निर्धारित दर प्रादेशिक परिवहन प्राधिकरण अमरावती यांच्या ४ नोेव्हेंबर २०११ रोजी झालेल्या सभेत सदर दर निच्छित करण्यात आले होते. या दरांना मंजुरी देण्यात आली होती. यानंतर ४ अ‍ॅगस्ट्र रोजी झालेल्या सभेत दरवाढी प्रस्तावावर चर्चा होऊन याला दरवाढीची मागणी नसल्यामुळे २०११ चे दर कायम ठेवण्यात आले होते. परंतु यासंदर्भात कुठलेही अंमलबजावणी झाली नाही. जेव्हा आॅटो पासिंग करण्यासाठी येतो तेव्हा ते फॉलटी आहे का? ते तपासण्यात येते तसेच रीडिंग तपासण्यात आल्यानंतरच पासिंग करण्यात येते. जर अंमलबजावणी होत नसेल तर कारवार्इंचे आदेश देण्यात येतील. - श्रीपाद वाडेकर, प्रादेशिक परिवहन अधिकारी, अमरावती