शहरं
Join us  
Trending Stories
1
अहिल्यानगर येथे रांगोळीवरून तणाव, CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “जाणीवपूर्वक...”
2
बैलाला साखळी घालतात तसे दिसते; अजित पवार ज्वेलरी शॉपच्या उद्घाटनाला गेले, गोल्डमॅन म्हणून वावरणाऱ्यांना फटकारले
3
एका सल्ल्यासाठी ₹११ कोटी! पीकेंच्या कमाईचे आकडे पाहून चक्रावून जाल; ₹९८ कोटी दान केले...
4
'त्या नारी शक्तीचे एक उदाहरण...', पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जॉर्जिया मेलोनी यांच्या आत्मचरित्राला प्रस्तावना लिहिली
5
प्रशांत किशोर यांची 3 वर्षांची कमाई बघून थक्क व्हाल, जन सूरज पक्षाला डोनेट केले तब्बल 98 कोटी!
6
अरेरे! लहान वयात केस पिकले, नारळाच्या तेलात 'हे' मिसळा; चिंता सोडा, पांढऱ्या केसांना टाटा करा
7
'तुला तुरुंगामध्ये टाकेन हा, मी तुला सांगतोय'; अजित पवारांच्या संतापाचा कडेलोट, दीड कोटींच्या उधारीचं प्रकरण काय?
8
'हे' मेड इन इंडिया मॅसेजिंग अ‍ॅप घेणार WhatsApp ची जागा? दुर्गम भागातील लोकांना होणार फायदा?
9
एशिया कप 2025 चा हिरो: विजयाचा तिलक लावला खरा, पण कुटुंबाचे २०२२ पर्यंत स्वत:चे घर नव्हते...; वडील इलेक्ट्रीशिअन...
10
ऑटो कंपन्यांचे पाकिस्तानातून पलायन! सरकारकडून सेकंड हॅन्ड गाड्यांना आयात करण्यासाठी परवानगी
11
PM मोदींच्या 'X' पोस्टने पाकिस्तानचे मंत्री मोहसिन नकवी अन् ख्वाजा आसिफचा 'थयथयाट', म्हणाले...
12
वनप्लस १३ नंतर १४ नाही, थेट १५ सिरीज बाजारात आणणार; भारतात कधी लाँच होणार... 
13
Ahilyanagar: मुस्लीम धर्मगुरूंच्या नावाची रस्त्यावर रांगोळी; अहिल्यानगरमध्ये तणाव, 'रास्ता रोको'नंतर लाठीचार्ज
14
सणासुदीच्या काळात सावध राहा! सायबर गुन्हेगार AI वापरुन करतायेत फसवणूक; कसं राहाल सुरक्षित?
15
IND vs PAK : क्रिकेटमध्ये राजकारण आणणारा तू पहिला कॅप्टन! सूर्यानं पाक पत्रकाराला असा दिला रिप्लाय (VIDEO)
16
'अगदी बरोबर केलं...!'; पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्या विनय नरवाल यांचे वडील टीम इंडियावर खुश!
17
आता टीम इंडियाला मिळणार नाही आशिया चषकाची ट्रॉफी? काय आहे ICCचा नियम, जाणून घ्या
18
जन्मदातीने सोडलं, परदेशी जोडप्यानं सांभाळलं; ३८ वर्षांनी स्वित्झर्लंडची नताशा मुंबईत, खऱ्या आईला भेटली
19
भारताविरोधात लढत होता पाकिस्तानी नेव्हीचा अधिकारी, खेळलाही...; पण गुडघे टेकत पराभूत झाला...
20
ज्यांनी भावाची चौकशी केली नाही, ते गावाची काय करणार; शिवाजी सावंतांचा तानाजी सावंतांवर आरोप

इलेकट्रॉनिक मीटरची सक्ती नावापुरतीच !

By admin | Updated: February 6, 2017 00:13 IST

शासनाने राज्यात आॅटोचालकांना परवाना देतानाच आॅटोमध्ये ईलेक्ट्रॉनिक मीटर लावणे सक्तीचे केले आहे.

अंमलबजावणी केव्हा? : अधिकाऱ्यांच्या कारवाया थंडबस्त्यात संदीप मानकर अमरावतीशासनाने राज्यात आॅटोचालकांना परवाना देतानाच आॅटोमध्ये ईलेक्ट्रॉनिक मीटर लावणे सक्तीचे केले आहे. पण यासंदर्भाची अंमलबजावणी केवळ नावापुरतीच असून प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या कारवाया थंडावल्यामुळे आॅटोमधील मीटर केवळ पांढरा हत्ती बनल्याचे निदर्शनास येत आहे. शासनाच्या आदेशानव्ये आरटीओने आॅटोचे पासिंग देतानाच आॅटोमध्ये ईलेक्ट्रॉनिक मीटर लावणे सक्तीचे केले आहे. पण अनेक वर्र्षांपासून ना तर नागरिक या निर्णयाला स्वीकारत आहेत, ना आॅटोचालकांची या निर्णयाची अंमलबजावणी करण्याची मानसिकता आहे. त्यामुळे शहरातील आॅटो नियमांचे उल्लंघन करीत बिनबोभाट धावत आहेत. एका चौकातून दुसऱ्या चौकात आॅटोमध्ये प्रवास करायचा असेल तर प्रतिप्रवासी १० रुपयांचा दर आकारण्यात येतो. तीन-एकचे पासिंग असतानाही चार ते पाच प्रवासी आॅटोमध्ये बसविण्यात येतात. त्यामुळे शहरात मोठ्या प्रमाणात नियमबाह्य प्रवासी वाहतूक करण्यात येत आहे. याकडे प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या मोटार वाहन निरीक्षकांचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे कारवाया थंडबस्त्यात पडल्यामुळे कुठल्याही चांगल्या निर्णयाची अंमलबजावणी होत नाही. नियमाने ईलेक्ट्रॉनिक्स मीटरच्या दराने प्रवास केला तर पहिल्या किमी. ला १० रुपये व नंतर प्रत्येक किमीला. ८ रुपयांप्रमाणे दर आकारण्यात येतो. हा दर प्रवाशांच्यादेखील हिताचा नसल्याने त्यांना शहरात काही अंतरापर्यंत जरी प्रवास केला तर त्यांना अतिरिक्त दर मोजावे लागतात. त्यामुळे नागरिकही या निर्णयाचे स्वागत करीत नाही. सध्या पेट्रोल व डिझेलचे दर वाढल्यामुळे आॅटोचालकांनाही एक प्रवासी आॅटोमध्ये नेणे परवडत नाही. परंतु शासनाने काही वर्षांपूर्वी काढलेल्या ईलेक्ट्रॉनिक मीटर लावण्यासंदर्भाच्या अध्यादेशाचे काय? व या कायद्याची अंमलबजावणी होत नसेल तर आॅटोमध्ये ईलेक्ट्रॉनिक्स मीटर बसविणे सक्तीचे का, हा प्रश्न सामान्य नागरिकांना पडला आहे. अमरावती जिल्ह्यामध्ये ३१ डिसेंबर २०१६ पर्यंत अधिसुचित क्षेत्रातील ई-मीटर बसविलेल्या एकूण जुने व नवीन आॅटोरिक्षाची संख्या असलेले ४ हजार ८८५ आॅटो रस्त्यावर धावत आहेत. २०११ मध्ये करण्यात आली होती निर्धारित दर प्रादेशिक परिवहन प्राधिकरण अमरावती यांच्या ४ नोेव्हेंबर २०११ रोजी झालेल्या सभेत सदर दर निच्छित करण्यात आले होते. या दरांना मंजुरी देण्यात आली होती. यानंतर ४ अ‍ॅगस्ट्र रोजी झालेल्या सभेत दरवाढी प्रस्तावावर चर्चा होऊन याला दरवाढीची मागणी नसल्यामुळे २०११ चे दर कायम ठेवण्यात आले होते. परंतु यासंदर्भात कुठलेही अंमलबजावणी झाली नाही. जेव्हा आॅटो पासिंग करण्यासाठी येतो तेव्हा ते फॉलटी आहे का? ते तपासण्यात येते तसेच रीडिंग तपासण्यात आल्यानंतरच पासिंग करण्यात येते. जर अंमलबजावणी होत नसेल तर कारवार्इंचे आदेश देण्यात येतील. - श्रीपाद वाडेकर, प्रादेशिक परिवहन अधिकारी, अमरावती