शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
2
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
3
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
4
"देशाला दिशा देण्याऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
5
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
6
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
7
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
8
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
9
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
10
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
11
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
12
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
13
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
14
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
15
मथुरा श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरण: हिंदू पक्षाला झटका, शाही ईदगाहला वादग्रस्त ढाचा घोषित करण्याची मागणी HC नं फेटाळली
16
ENG vs IND : जलद शतकी खेळीसह Jamie Smith चा पराक्रम! १४८ वर्षांत असं पहिल्यांदा घडलं
17
'रामायण'मध्ये दिग्गज कलाकारांची फौज रावणावर तुटून पडणार, अमिताभसह कोण साकारणार कोणती भूमिका?
18
'बिहार की बेटी', PM मोदींनी उल्लेख केलेल्या त्रिनिदादच्या पंतप्रधान कोण? बिहारशी काय संबंध?
19
एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीसांनी घेतले शरद पवारांचे नाव
20
Video: मोठी बातमी! एकनाथ शिंदेंकडून पुण्यात 'जय महाराष्ट्र' पाठोपाठ 'जय गुजरात'चा नारा; आधीच मराठी-हिंदी वाद...

विंधन विहिरीचे वीज देयक नागरिकांच्या माथी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2019 06:00 IST

सार्वजनिक नळाच्या पाण्यासाठी महापालिकेचा मोठ्या प्रमाणावर खर्च होत असल्याबाबत नागपूर लेखापरीक्षण कार्यालयाकडून आक्षेप नोंदविण्यात आलेला आहे. यामध्ये आस्थापना व वीज देयकांवरच्या खर्चावर हा आक्षेप आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणद्वारे शहरात जलवाहिन्यांचे जाळे आहे.

ठळक मुद्देमहापालिकेला खर्च झेपवेना । नवीन हातपंपामध्येही आता २०० मीटर अंतराची अट

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : महापालिका क्षेत्रात भूजलाच्या अमर्याद उपशावर नियंत्रण मिळविण्यासाठी नवीन विंधन विहिरी व हातपंपाबाबत महापालिकेने धोरणात्मक निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता नवीन विंधन विहिरीला जुन्या हातपंपापासून २०० मीटरची अट निश्चित करण्यात आली, तर अस्तित्वातील महापालिकेच्या विंधन विहिरीच्या वीजदेयकाचा खर्च नागरिकांच्या माथी मारण्यात आलेला आहे.महानगरात वैयक्तिक घरगुती पाणीपुरवठा हा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत करण्यात येतो. शहरात पाणीपुरवठ्यासाठी महापालिका व मजीप्रा या शासनाच्या दोन यंत्रणा आहेत. महापालिकेची उद्याने, दवाखाना व इतर सार्वजनिक ठिकाणी महापालिकेच्या यंत्रणेमार्फत पाणीपुरवठा करण्यात येतो. राज्य शासनाने २५ जून २०१८ रोजी अधिसूचना काढून भूजलाच्या अमर्याद उपशावर नियंत्रण तसेच एकात्मिक पद्धतीने विकास व व्यवस्थापन होण्यासाठी तसेच जमिनीखालील सार्वजनिक पिण्याचे पाण्याचे जतन करण्याच्या अनुषंगाने हरकती मागितल्या होत्या. अद्याप ही प्रक्रिया पुढे सरकलेली नाही. मात्र, या दृष्टीने महापालिकेने पावले उचलली आहेत.सार्वजनिक नळाच्या पाण्यासाठी महापालिकेचा मोठ्या प्रमाणावर खर्च होत असल्याबाबत नागपूर लेखापरीक्षण कार्यालयाकडून आक्षेप नोंदविण्यात आलेला आहे. यामध्ये आस्थापना व वीज देयकांवरच्या खर्चावर हा आक्षेप आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणद्वारे शहरात जलवाहिन्यांचे जाळे आहे. मात्र, ज्या भागात महापालिकाद्वारे मोफत पाणीपुरवठा होत आहे, त्या ठिकाणी नागरिक मजीप्राची जोडणी घेत नाहीत. परिणामी मजीप्राने वीज जोडणीच केलेली नाही. सद्यस्थितीत शहरात ३७७९ हातपंप व ४०६३ विंधन विहीरी आहेत. तरीही नगरसेवकांद्वारे या विषयाची वाढती मागणी आहे. यामुळे वीज देयकांमध्ये वाढ होऊन भूजलात मोठ्या प्रमाणात घट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वसाधारण सभेत चर्चेला आलेल्या प्रशासकीय विषयान्वये यावर आता बंधन घालण्यात आलेली आहे. मात्र, महापालिकेचे उद्यान, कार्यालये, दवाखाने व स्मशानभूमी किंवा सार्वजनिक वापराच्या जागा येथे अत्यंत आवश्यकता असल्यासएक हातपंप किंवा विद्यृत पंपासह बोअरवेल देण्याबाबत सदस्यांनी सहमती दर्शविली आहे.महापालिकेच्या ७६४ विंधन विहीरीमहापालिकेच्या महादेवखोरी परिसरात ४४५ व म्हाडा कॉलनी येथे ३१९ विंधन विहिरींद्वारे पाण्याचा पुरवठा करण्यात येतो. यासाठी तीन पंप आॅपरेटर आणि कनिष्ठ लिपिक वीज देयकाची नोंद व देयक सादर करण्यासाठी आहेत. महानगरात ३७७९ हातपंप व विंधन विहिरींवर २८४ वीज पंपाचे कनेक्शन आहे. या देयकापोटी दरमहा पाच लाखांवर खर्च येतो. प्रतिघर ६८ रुपये घेण्याचा महापालिकेचा ठराव आहे. परंतु, नागरिकांकडून देयक भरण्यास टाळाटाळ केली जाते.देयक भरण्यास महापालिकेचा नकारमहापालिकेने घेतलेल्या ठरावान्वये यापुढे विंधन विहिरींवर महापालिकेद्वारे वीज पंप बसविण्यात येणार नाही. हे देयक आता पाण्याचा वापर करणारे संबंधित नागरिक किंवा सेवाभावी संस्था यांनी भरावे. काही ठिकाणी ग्रुप कनेक्शन करून देयक भरावे. महापालिका यापुढे कोणतेही वीज देयक भरणार नाही, असा ठराव करण्यात आलेला आहे. ज्या ठिकाणी मजीप्राची जलवाहिनी नाही व नैसर्गिक टंचाईचा भाग आहे, अशाच ठिकाणी हातपंप बसविण्यात येणार आहे. नवीन हातपंप मंजूर करावयाचा असल्यास जुन्या हातपंपापासून किमान २०० मीटर अंतर अनिवार्य आहे.

टॅग्स :Waterपाणी