शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

१५ रुपयांत मिळालेल्या मीटरला ५१ हजारांचे वीज बिल; कोरोनाकाळातील झटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2020 22:08 IST

Amravati News महावितरणने दर्यापूर तालुक्यातील लेहेगाव रेल्वे येथील रहिवासी असलेल्या मजूर दाम्पत्याला ५१ हजार १४० रुपयांचे वीज बिल दिले आहे.

ठळक मुद्देलेहेगाव येथील शेतमजुराला महावितरणचा धक्का

लोकमत न्यूज नेटवर्क

अमरावती : महावितरणने दर्यापूर तालुक्यातील लेहेगाव रेल्वे येथील रहिवासी असलेल्या मजूर दाम्पत्याला ५१ हजार १४० रुपयांचे वीज बिल दिले आहे. दारिद्र्यरेषेखालील या कुटुंबाचा अवघ्या तीन सीएफएल बल्बचा वीजवापर आहे. कोरोनाकाळातील हे अव्वाच्या सव्वा बिल भरायचे कसे, या विचारांनीच त्यांचा हात-पाय गळाले आहे.

सुखदेवराव मालखेडे (६५) असे सदर व्यक्तीचे नाव आहे. भूमिहीन असलेले सुखदेवराव हे मजुरी करतात. गावात मिळालेल्या तीन खोल्यांच्या घरकुलात ते पत्नीसह वास्तव्यास आहेत. त्यांच्याक़डे विजेच्या उपकरणाच्या नावावर तीन सीएफएल बल्ब आहेत. तेदेखील दिवसा बंद असतात आणि रात्रीदेखील निद्राधीन होण्यापूर्वी बंद केले जातात. यावरून त्यांचा वीजवापर हा केवढा असेल, याची कल्पना यावी. सुखदेवरावांनी शेवटचे वीज बिल लॉकडाऊनपूर्वी १६०० रुपये भरले होते. त्यानुसार काही हजारांपर्यंत बिल अपेक्षित असताना, महावितरणने ५० हजारांवर बिल देऊन त्यांना ‘हायव्होल्टेज’ धक्का दिला आहे.

हिन्यांपासून त्यांच्या वीज मीटरचे आकडे महावितरण कर्मचाऱ्यांनी घेतले नाही. अद्ययावत मोबाईल नसल्याने महावितरणच्या आवाहनानुसार वीज मीटरचे छायाचित्र पाठविता आले नाही. आता आलेले अवाढव्य बिल आवाक्याबाहेरचे आहे.

पेपरला देता?  मीटर मिळणार नाही

बिल मिळाल्याच्या दुसऱ्याच दिवशी घरी आलेल्या वीज कर्मचाऱ्यापुढे सुखदेवरावांकडे तक्रार दिली. मात्र, घटनाक्रम पेपरला द्याच, असे आव्हान सदर कर्मचाऱ्याने दिले. आधी सांगितले असते, तर मीटर बदलून दिले असते. आता मात्र आम्ही काहीच करणार नाही, असे म्हणत सदर कर्मचाऱ्याने हात वर केल्याचे सुखदेवराव मालखेडे यांनी सांगितले.

आपले बिल आपली जबाबदारी

कोरोनाकाळातील अवाढव्य वीज बिल माफ होणार, असे सांगितले जात होते. मात्र, त्या भूमिकेपासून फारकत घेत खुद्द वीजमंत्र्यांनी लोकांना बिलाच्या माफीबाबत तूर्तास कोणतीही भूमिका घेणार नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे वीज बिल भरावेच लागणार हे स्पष्ट आहे. मात्र, त्यासाठी घर गहाण ठेवायचे का, असा प्रश्न मालखेडे यांनी उपस्थित केला.

विजेचा लपंडाव

कोकर्डा फीडरवरील लेहेगाव रेल्वे हे शेवटचे गाव आहे. त्यामुळे विजेच्या लपंडावाचा सर्वाधिक त्रास लेहेगाव येथील नागरिकांना होतो. त्याकडे महावितरण दुर्लक्ष करीत असल्याबाबत नागरिक रोष व्यक्त करीत आहेत.

टॅग्स :electricityवीज