शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

विजेचा लपंडाव, शेती पिके धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2018 01:40 IST

महिन्यापासून सुरू असलेल्या विजेच्या लपंडावामुळे व वाढत्या तापमानामुळे जमिनीला भेगा पडल्या आहेत. तूर, कपाशी पिके पाण्याअभावी सुकत आहेत. केळी, संत्रा पिकांना भारनियमनाचा जबर फटका बसला असून, संत्रा पिकाला पुरेशी पाण्याची मात्रा मिळत नसल्याने ती गळून खाली पडत आहेत.

ठळक मुद्देआठ तासांचे भारनियमन : शेतकऱ्यांना चारच तास वीजपुरवठा, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्कपथ्रोट/अचलपूर : महिन्यापासून सुरू असलेल्या विजेच्या लपंडावामुळे व वाढत्या तापमानामुळे जमिनीला भेगा पडल्या आहेत. तूर, कपाशी पिके पाण्याअभावी सुकत आहेत. केळी, संत्रा पिकांना भारनियमनाचा जबर फटका बसला असून, संत्रा पिकाला पुरेशी पाण्याची मात्रा मिळत नसल्याने ती गळून खाली पडत आहेत. यामुळे संत्राफळांचा सडा पाहून व्यापारी वर्ग बाग खरेदी करण्यास तयार नाहीत.शासनाने शेतकºयांच्या शेतीला आठ तास वीज देऊन पाणी पुरविण्याची व्यवस्था केली जाईल, असे आश्वासन दिले होते. मात्र. लपंडावामुळे शेतकºयांना केवळ चारच तास पाणी मिळत असून ते पिकांना पुरेसे नसल्याने पिकांची अवस्था दयनीय झाली आहे. गतवषीर्पेक्षा यावर्षी अचलपूर तालुक्यात व परिसरात सर्वात कमी पावसाची नोंद झाली. त्यामुळे धरणे भरली नाहीत. विहिरीचा जलस्तर वाढले नाही. भर पावसाळ्यात विहिरीच्या खोदकामाला शेतकºयांनी सुरुवात केली आहे. त्यातच विजेचा लपंडाव सुरू असल्याने ते पीक वाचविण्याची कसरत करण्यास असमर्थ आहेत. त्यामुळे पिकाला लागलेला खर्च निघणेही कठीण असल्याचे चित्र आहे. शासन व प्रशासनाने विजेचा लपंडावाचा प्रश्न सोडवावा, अशी शेतकºयांची मागणी आहे. शेतातील नांगरणी, वखरणी, डवरणी, उखरी आदी कामे बंद असल्यामुळे शेतकºयाला पिकांना पाणी देण्याचे एकच काम शिल्लक आहे. तेही विजेच्या लपंडावामुळे शक्य नसल्याने त्यांना शेतात दिवसभर विजेची प्रतीक्षा करून घरची वाट धरावी लागत आहे. त्यामुळे त्यांचा वेळही वाया जात आहे. वीजपुरवठा सुरळीत केल्यास मजूर वगार्लाही काम मिळेल, या बाबीकडे शासनाने लक्ष देणे गरजेचे आहे.वीज वितरण कंपनीची कानउघाडणी कराशेतकºयांच्या पिकाला पाणी देण्याकरिता वीजपुरवठा सुरळीत ठेवावे, ही बाब शासनाने गंभीरतेने घेतली खरी, मात्र, वीज वितरण कंपनीची उदासिनता याला कारणीभूत ठरत आहे. वीज वितरण कंपनीची कानउघाडणी करण्याची नितांत गरज आहे, असे संतप्त शेतकरी नामदेव नारायण नागे यांनी प्रतिक्रिया दिली.शेतकरी हा देशाचा पोशिंदा असे म्हणून त्याची बोळवण केली जाते. मात्र, शेतकºयांची भिस्त पिकावर असताना वीज वितरण कंपनी या गळचेपी धोरणाकडे शासनाने लक्ष देणे गरजेचे आहे.- सुधाकर हावरे,शेतकरी, पथ्रोट

टॅग्स :electricityवीज