शहरं
Join us  
Trending Stories
1
"वहां से गोली चलेगी, यहां से गोला चलेगा"; PM मोदींचा उच्चस्तरीय बैठकीत लष्कराला स्पष्ट मेसेज
2
कर्जावर जगणारा पाकिस्तान लढाऊ विमानं, ड्रोन अन् बॉम्ब खरेदीसाठी एवढा पैसा आणतो कुठूण? सैन्याचे उद्योगधंदे जाणून थक्क व्हाल!
3
'...तर पाकिस्तानला विनाशकारी उत्तर दिलं जाईल', अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांसोबत PM मोदींची चर्चा
4
लोणावळ्यात गुलाबी सुटकेसमध्ये आढळलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले, दोघांना अटक, हत्येचे कारण...
5
दहशतवाद्यांना स्थानिकांची मदत; काश्मीरमध्ये 20 ठिकाणी छापे, स्लीपर सेल मॉड्यूलचा पर्दाफाश
6
मंदिरात दिवा लावण्यासाठी गेलेल्या वृद्ध महिलेची 8 ग्रँम सोने व १० ग्रँम चांदीसाठी हत्या
7
Seema Haider : "तुला कोणीही मारणार नाही, तू परत ये"; ढसाढसा रडली सीमाची बहीण, मोदींकडे मागितली मदत
8
१० वर्षांच्या प्रवासानंतर, एकमेकांचे झाले, अक्षय-साधनाचा सुंदर क्षण, पाहा भावूक करणारा Video
9
तिरंगी वनडे मालिकेत टीम इंडियाचा डंका! यजमान श्रीलंकेला पराभूत करत हरमनप्रीत ब्रिगेडनं जिंकली ट्रॉफी
10
पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर अन् युद्धविराम...राहुल गांधींची PM मोदींना पत्राद्वारे मोठी मागणी
11
Operation Sindoor Live Updates: 'आता फक्त पीओके परत करण्यावरच चर्चा होणार'; भारताने प्रस्ताव फेटाळला
12
'1971 आणि 2025 ची परिस्थिती वेगळी', युद्धविराम अन् इंदिरा गांधींबाबत शशी थरुर स्पष्टच बोलले
13
Chandrapur Tiger Attack: चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात ३ महिलांचा मृत्यू, गावकऱ्यांमध्ये घबराट
14
पर्सनल लोन फेडलं नाही तर बँक काय कारवाई करते? कर्ज घेताना काय काळजी घ्यावी?
15
हृदयद्रावक! पत्नी आणि २ महिन्यांच्या मुलाला मारुन पतीने संपवलं जीवन; मेसेजमध्ये मांडली व्यथा
16
Murali Naik : "शहीद झालो तर पार्थिव तिरंग्यात..."; मुरली नाईक यांच्या वडिलांनी सांगितली लेकाची शेवटची इच्छा
17
SIP मध्ये गुंतवणूक करताना बहुतेक गुंतवणूकदार 'या' चुका करतात; थेट परताव्यावर होतो परिणाम
18
Yogi Adityanath : "पाकिस्तानला विचारा 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्राची ताकद काय आहे?"; योगी आदित्यनाथ कडाडले
19
नाशिकला अवकाळी पावसाने झोडपले; शहरात तासभर गडगडाट अन् कडकडाट
20
"मी मोठी झाल्यावर सैन्यात भरती होईन आणि बदला घेईन"; शहीद जवानाच्या लेकीचा निर्धार

विजेचा लपंडाव, शेती पिके धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2018 01:40 IST

महिन्यापासून सुरू असलेल्या विजेच्या लपंडावामुळे व वाढत्या तापमानामुळे जमिनीला भेगा पडल्या आहेत. तूर, कपाशी पिके पाण्याअभावी सुकत आहेत. केळी, संत्रा पिकांना भारनियमनाचा जबर फटका बसला असून, संत्रा पिकाला पुरेशी पाण्याची मात्रा मिळत नसल्याने ती गळून खाली पडत आहेत.

ठळक मुद्देआठ तासांचे भारनियमन : शेतकऱ्यांना चारच तास वीजपुरवठा, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्कपथ्रोट/अचलपूर : महिन्यापासून सुरू असलेल्या विजेच्या लपंडावामुळे व वाढत्या तापमानामुळे जमिनीला भेगा पडल्या आहेत. तूर, कपाशी पिके पाण्याअभावी सुकत आहेत. केळी, संत्रा पिकांना भारनियमनाचा जबर फटका बसला असून, संत्रा पिकाला पुरेशी पाण्याची मात्रा मिळत नसल्याने ती गळून खाली पडत आहेत. यामुळे संत्राफळांचा सडा पाहून व्यापारी वर्ग बाग खरेदी करण्यास तयार नाहीत.शासनाने शेतकºयांच्या शेतीला आठ तास वीज देऊन पाणी पुरविण्याची व्यवस्था केली जाईल, असे आश्वासन दिले होते. मात्र. लपंडावामुळे शेतकºयांना केवळ चारच तास पाणी मिळत असून ते पिकांना पुरेसे नसल्याने पिकांची अवस्था दयनीय झाली आहे. गतवषीर्पेक्षा यावर्षी अचलपूर तालुक्यात व परिसरात सर्वात कमी पावसाची नोंद झाली. त्यामुळे धरणे भरली नाहीत. विहिरीचा जलस्तर वाढले नाही. भर पावसाळ्यात विहिरीच्या खोदकामाला शेतकºयांनी सुरुवात केली आहे. त्यातच विजेचा लपंडाव सुरू असल्याने ते पीक वाचविण्याची कसरत करण्यास असमर्थ आहेत. त्यामुळे पिकाला लागलेला खर्च निघणेही कठीण असल्याचे चित्र आहे. शासन व प्रशासनाने विजेचा लपंडावाचा प्रश्न सोडवावा, अशी शेतकºयांची मागणी आहे. शेतातील नांगरणी, वखरणी, डवरणी, उखरी आदी कामे बंद असल्यामुळे शेतकºयाला पिकांना पाणी देण्याचे एकच काम शिल्लक आहे. तेही विजेच्या लपंडावामुळे शक्य नसल्याने त्यांना शेतात दिवसभर विजेची प्रतीक्षा करून घरची वाट धरावी लागत आहे. त्यामुळे त्यांचा वेळही वाया जात आहे. वीजपुरवठा सुरळीत केल्यास मजूर वगार्लाही काम मिळेल, या बाबीकडे शासनाने लक्ष देणे गरजेचे आहे.वीज वितरण कंपनीची कानउघाडणी कराशेतकºयांच्या पिकाला पाणी देण्याकरिता वीजपुरवठा सुरळीत ठेवावे, ही बाब शासनाने गंभीरतेने घेतली खरी, मात्र, वीज वितरण कंपनीची उदासिनता याला कारणीभूत ठरत आहे. वीज वितरण कंपनीची कानउघाडणी करण्याची नितांत गरज आहे, असे संतप्त शेतकरी नामदेव नारायण नागे यांनी प्रतिक्रिया दिली.शेतकरी हा देशाचा पोशिंदा असे म्हणून त्याची बोळवण केली जाते. मात्र, शेतकºयांची भिस्त पिकावर असताना वीज वितरण कंपनी या गळचेपी धोरणाकडे शासनाने लक्ष देणे गरजेचे आहे.- सुधाकर हावरे,शेतकरी, पथ्रोट

टॅग्स :electricityवीज