शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

विजेचा लपंडाव, शेती पिके धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2018 01:40 IST

महिन्यापासून सुरू असलेल्या विजेच्या लपंडावामुळे व वाढत्या तापमानामुळे जमिनीला भेगा पडल्या आहेत. तूर, कपाशी पिके पाण्याअभावी सुकत आहेत. केळी, संत्रा पिकांना भारनियमनाचा जबर फटका बसला असून, संत्रा पिकाला पुरेशी पाण्याची मात्रा मिळत नसल्याने ती गळून खाली पडत आहेत.

ठळक मुद्देआठ तासांचे भारनियमन : शेतकऱ्यांना चारच तास वीजपुरवठा, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्कपथ्रोट/अचलपूर : महिन्यापासून सुरू असलेल्या विजेच्या लपंडावामुळे व वाढत्या तापमानामुळे जमिनीला भेगा पडल्या आहेत. तूर, कपाशी पिके पाण्याअभावी सुकत आहेत. केळी, संत्रा पिकांना भारनियमनाचा जबर फटका बसला असून, संत्रा पिकाला पुरेशी पाण्याची मात्रा मिळत नसल्याने ती गळून खाली पडत आहेत. यामुळे संत्राफळांचा सडा पाहून व्यापारी वर्ग बाग खरेदी करण्यास तयार नाहीत.शासनाने शेतकºयांच्या शेतीला आठ तास वीज देऊन पाणी पुरविण्याची व्यवस्था केली जाईल, असे आश्वासन दिले होते. मात्र. लपंडावामुळे शेतकºयांना केवळ चारच तास पाणी मिळत असून ते पिकांना पुरेसे नसल्याने पिकांची अवस्था दयनीय झाली आहे. गतवषीर्पेक्षा यावर्षी अचलपूर तालुक्यात व परिसरात सर्वात कमी पावसाची नोंद झाली. त्यामुळे धरणे भरली नाहीत. विहिरीचा जलस्तर वाढले नाही. भर पावसाळ्यात विहिरीच्या खोदकामाला शेतकºयांनी सुरुवात केली आहे. त्यातच विजेचा लपंडाव सुरू असल्याने ते पीक वाचविण्याची कसरत करण्यास असमर्थ आहेत. त्यामुळे पिकाला लागलेला खर्च निघणेही कठीण असल्याचे चित्र आहे. शासन व प्रशासनाने विजेचा लपंडावाचा प्रश्न सोडवावा, अशी शेतकºयांची मागणी आहे. शेतातील नांगरणी, वखरणी, डवरणी, उखरी आदी कामे बंद असल्यामुळे शेतकºयाला पिकांना पाणी देण्याचे एकच काम शिल्लक आहे. तेही विजेच्या लपंडावामुळे शक्य नसल्याने त्यांना शेतात दिवसभर विजेची प्रतीक्षा करून घरची वाट धरावी लागत आहे. त्यामुळे त्यांचा वेळही वाया जात आहे. वीजपुरवठा सुरळीत केल्यास मजूर वगार्लाही काम मिळेल, या बाबीकडे शासनाने लक्ष देणे गरजेचे आहे.वीज वितरण कंपनीची कानउघाडणी कराशेतकºयांच्या पिकाला पाणी देण्याकरिता वीजपुरवठा सुरळीत ठेवावे, ही बाब शासनाने गंभीरतेने घेतली खरी, मात्र, वीज वितरण कंपनीची उदासिनता याला कारणीभूत ठरत आहे. वीज वितरण कंपनीची कानउघाडणी करण्याची नितांत गरज आहे, असे संतप्त शेतकरी नामदेव नारायण नागे यांनी प्रतिक्रिया दिली.शेतकरी हा देशाचा पोशिंदा असे म्हणून त्याची बोळवण केली जाते. मात्र, शेतकºयांची भिस्त पिकावर असताना वीज वितरण कंपनी या गळचेपी धोरणाकडे शासनाने लक्ष देणे गरजेचे आहे.- सुधाकर हावरे,शेतकरी, पथ्रोट

टॅग्स :electricityवीज