शहरं
Join us  
Trending Stories
1
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
2
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
3
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे उत्तर
4
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
5
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
6
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
7
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
8
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
9
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
10
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
11
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
12
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
13
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
14
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
15
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
16
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
17
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
18
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
19
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
20
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान

४९ ग्रामपंचायतींना निवडणुकीचे वेध

By admin | Updated: March 18, 2015 00:19 IST

तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींना सध्या निवडणुकीचे वेध लागले आहेत.

लोकमत विशेषसुमित हरकूट चांदूरबाजारतालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींना सध्या निवडणुकीचे वेध लागले आहेत. यात ४२ ग्रामपंचायतचा कार्यकाळ पुर्णत्वास येत असल्याने आणि ७ ठिकाणी पदे रिक्त असल्याने निवडणुका होत आहेत. अर्थसंकल्पीय अधिवेशन संपताच कोणत्याही क्षणी निवडणुका जाही0र होणार असल्याची शक्यता वर्तविल्या जात आहे.होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीमधील विशेष बाब म्हणजे उमेदवारांना आपला अर्ज आॅनलाईन भरावा लागणार आहे. हा अर्ज उमेदवाराला कोणत्याही सुविधा केंद्रावरुन भरता येणार आहे. त्यासाठी तालुक्यातील सर्वच संगणक सुविधा केंद्र चालकांना एक दिवसांचे प्रशिक्षणही देण्यात येणार आहे. त्यामुळे तहसील कार्यालयातील गर्दी कमी होऊन सुविधा केंद्रावर गर्दी वाढणार आहे. ग्रामपंचायत निवडणुकीच्या इतिहासात प्रथम मतदान केंद्रावर त्याच ठीकाणी काही तासातच निवडणुक निकाल जाहिर होणार आहे. या बद्दल ग्रामिण भागात कुतूहूल निर्माण झाले आहे.अद्याप पर्यंत निवडणुक कार्यक्रम जाहिर झाला नसला तरी, तालुका महसुल प्रशासनाकडून निवडणुकीची तयारी पूर्ण झाली आहे, असे निवडणुक विभागाचे नायब तहसीलदार सैफन नदाफ यांनी सांगीतले. यात मतदार यादी वरील हरकती व सूचना मागून अंतीम मतदार यादी प्रसिध्द करण्याचे पहिल्या टप्याचे काम पूर्ण झाले असल्याची माहिती त्यांनी दिली. एप्रीलच्या शेवटच्या आठवड्यात किंवा मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात निवडणुका होण्याची शक्यता वर्तविल्या जात आहे. निवडणुकीसाठी गावपातळी वरील पक्षाचे नेते कामाला लागले आहेत. त्या प्रमाणे उमेदवारांची चाचपणी सुरु झाली आहे. कोणत्या प्रभागात, कोणत्या समाजाची मते अधिक आहेत अशा ठिकाणी कोणता उमेदवार निवडूण येऊ शकतो किंवा प्रभागातील कोणत्या तीन उमेदवारांच्या जातीची बेरीज सर्वाधीक होऊन आपले तीनही उमेदवार कसे निवडून येऊ शकतील याचीही शक्यता पडताळून पाहिल्या जात आहे. अपक्ष लढण्याची इच्छा असलेले उमेदवार आपले गणित जमविण्याच्या तयारीत आहे. ग्रामपंचायत निवडणूक लोकप्रतिनिधींसाठीही प्रतिष्ठेची राहाणार आहे.