शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

१३२ ग्रामपंचायतींमध्ये सरपंच-उपसरपंचांची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 05:01 IST

सरपंच व उपसरपंचपदाची ही निवडणूक प्रक्रिया १८ फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. त्यामुळे आमचे इतके  सरपंच अन् इतक्या गावांवर आमचा झेंडा असा कुठलाही दावा महाआघाडी वा भाजप व अन्य राजकीय पक्षांनी केलेला नाही. ५५३ ग्रामपंचायतमधील सरपंच, उपसरपंचपदाची निवड झाल्यानंतरच राजकीय पक्षांकडून दावे-प्रतिदावे केले जाणार आहेत. 

ठळक मुद्देशुक्रवारी पुन्हा १३२ ग्रामपंचायतमध्ये निवड, अनेक ठिकाणी नवी समीकरणे, जिल्ह्यातील ५५३ ग्रामपंचायतींसाठी १८ फेब्रुवारीपर्यंत निवडले जाणार नवे नेतृत्व

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : सार्वत्रिक निवडणूक झालेल्या जिल्ह्यातील ५५३ ग्रामपंचायतींपैकी गुरुवारी १३२ ग्रामपंचायतींमध्ये सरपंच व उपसरपंचपदाची निवड करण्यात आली. १४ तालुक्यांतील १३२ ग्रामपंचायतींमध्ये तहसीलदारांनी नेमलेल्या अध्यासी अधिकाऱ्यांनी ही निवडणूक प्रक्रिया पार पाडली. सरपंच व उपसरपंचपदाची ही निवडणूक प्रक्रिया १८ फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. त्यामुळे आमचे इतके  सरपंच अन् इतक्या गावांवर आमचा झेंडा असा कुठलाही दावा महाआघाडी वा भाजप व अन्य राजकीय पक्षांनी केलेला नाही. ५५३ ग्रामपंचायतमधील सरपंच, उपसरपंचपदाची निवड झाल्यानंतरच राजकीय पक्षांकडून दावे-प्रतिदावे केले जाणार आहेत. दरम्यान, वरूडमधील  पुसला, घोराड, हातुर्णा ग्रामपंचायतीवर काँग्रेसचे सरपंच, तर वडाळा, ईत्तमगाव, पवनी  येथे भाजप समर्थित सरपंच विराजमान झाले. राष्ट्रवादीला मांगरूळी आणि महाविकास आघाडीला आमनेर आणि कुरळीचे सरपंचपद मिळाले. देऊतवाड्यात काँग्रेस-भाजप युतीचा सरपंच विराजमान झाल्याचा दावा स्थानिक स्तरावरून करण्यात आला. दर्यापूर तालुक्यातील करतखेडा येथील पाच सदस्यपदे रिक्त असल्याने सभा गठित झाली नाही. याच तालुक्यातील सासन रामापूर येथे सरपंचपदासाठी अर्ज प्राप्त झाला नाही. अचलपूर तालुक्यातील वडनेर भुजंग येथील सरपंचपद रिक्त राहिले. दरम्यान, १२ फेब्रुवारी रोजीदेखील १४ तालुक्यांतील १३२ ग्रामपंचायतींमध्ये सरपंच व उपसरपंच निवडले जाणार आहेत. १८ फेब्रुवारीपर्यंत ही सरपंच व उपसरपंचपदाची निवडणूक प्रक्रिया चालणार आहे. त्यानंतर जिल्ह्यातील ५५३ ग्रामपंचायतींमधील राजकीय स्थितीचे चित्र स्पष्ट होणार आहे. १४ ग्रामपंचायती आधीच अविरोध झाल्या आहेत. 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतsarpanchसरपंच