शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
2
भाजप बनला सर्वांत मोठा पक्ष, तरी नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री? डावलणे अशक्य, हे आहे कारण
3
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
4
'फर्स्ट पास्ट द पोस्ट'चा धक्का; राजदच्या मतांची टक्केवारी भाजपपेक्षा अधिक; पण पराभूत
5
आजचे राशीभविष्य,१५ नोव्हेंबर २०२५: मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता; शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळा
6
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
7
मेगाब्लॉक, जम्बोब्लॉकमुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या होणार प्रवास खोळंबा
8
बीबीसीने मागितली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माफी
9
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
10
मुंबईत राहून मिळत आहे माथेरानच्या थंडीचा आनंद, पारा १८ अंशांवर; तापमान १६ अंशांवर उतरणार?
11
बिहारप्रमाणे पश्चिम बंगालमधील ‘जंगलराज’ हटवणारच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला निर्धार
12
लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण; प्रशांत किशोर यांच्या ‘जन सुराज’ला भोपळा
13
ऑफलाइनही भरता येणार उमेदवारी अर्ज
14
डाळी, भाज्या, इंधनामुळे येऊ लागले स्वस्ताईचे दिवस, घाऊक महागाई घटून उणे १.२१ टक्क्यावर; २७ महिन्यांचा गाठला नीचांक
15
दुर्बल लोकांविरुद्ध गुन्हा करणाऱ्यांना दया नाही, विशेष पॉक्सो न्यायालयाने सुनावले; तरुणाला १० वर्षांची शिक्षा
16
शिल्पकार राम सुतार यांच्या माध्यमातून जगभरात भारताचा लौकिक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुकौद्गगार
17
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
18
तिरंदाजी: अंकिता भकत, धीरज बोम्मादेवराने पटकावली सुवर्णपदके
19
मुंबई विद्यापीठाच्या प्राध्यापकांचे १७ नोव्हेंबरपासून आंदोलन
20
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

१३२ ग्रामपंचायतींमध्ये सरपंच-उपसरपंचांची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 05:01 IST

सरपंच व उपसरपंचपदाची ही निवडणूक प्रक्रिया १८ फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. त्यामुळे आमचे इतके  सरपंच अन् इतक्या गावांवर आमचा झेंडा असा कुठलाही दावा महाआघाडी वा भाजप व अन्य राजकीय पक्षांनी केलेला नाही. ५५३ ग्रामपंचायतमधील सरपंच, उपसरपंचपदाची निवड झाल्यानंतरच राजकीय पक्षांकडून दावे-प्रतिदावे केले जाणार आहेत. 

ठळक मुद्देशुक्रवारी पुन्हा १३२ ग्रामपंचायतमध्ये निवड, अनेक ठिकाणी नवी समीकरणे, जिल्ह्यातील ५५३ ग्रामपंचायतींसाठी १८ फेब्रुवारीपर्यंत निवडले जाणार नवे नेतृत्व

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : सार्वत्रिक निवडणूक झालेल्या जिल्ह्यातील ५५३ ग्रामपंचायतींपैकी गुरुवारी १३२ ग्रामपंचायतींमध्ये सरपंच व उपसरपंचपदाची निवड करण्यात आली. १४ तालुक्यांतील १३२ ग्रामपंचायतींमध्ये तहसीलदारांनी नेमलेल्या अध्यासी अधिकाऱ्यांनी ही निवडणूक प्रक्रिया पार पाडली. सरपंच व उपसरपंचपदाची ही निवडणूक प्रक्रिया १८ फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. त्यामुळे आमचे इतके  सरपंच अन् इतक्या गावांवर आमचा झेंडा असा कुठलाही दावा महाआघाडी वा भाजप व अन्य राजकीय पक्षांनी केलेला नाही. ५५३ ग्रामपंचायतमधील सरपंच, उपसरपंचपदाची निवड झाल्यानंतरच राजकीय पक्षांकडून दावे-प्रतिदावे केले जाणार आहेत. दरम्यान, वरूडमधील  पुसला, घोराड, हातुर्णा ग्रामपंचायतीवर काँग्रेसचे सरपंच, तर वडाळा, ईत्तमगाव, पवनी  येथे भाजप समर्थित सरपंच विराजमान झाले. राष्ट्रवादीला मांगरूळी आणि महाविकास आघाडीला आमनेर आणि कुरळीचे सरपंचपद मिळाले. देऊतवाड्यात काँग्रेस-भाजप युतीचा सरपंच विराजमान झाल्याचा दावा स्थानिक स्तरावरून करण्यात आला. दर्यापूर तालुक्यातील करतखेडा येथील पाच सदस्यपदे रिक्त असल्याने सभा गठित झाली नाही. याच तालुक्यातील सासन रामापूर येथे सरपंचपदासाठी अर्ज प्राप्त झाला नाही. अचलपूर तालुक्यातील वडनेर भुजंग येथील सरपंचपद रिक्त राहिले. दरम्यान, १२ फेब्रुवारी रोजीदेखील १४ तालुक्यांतील १३२ ग्रामपंचायतींमध्ये सरपंच व उपसरपंच निवडले जाणार आहेत. १८ फेब्रुवारीपर्यंत ही सरपंच व उपसरपंचपदाची निवडणूक प्रक्रिया चालणार आहे. त्यानंतर जिल्ह्यातील ५५३ ग्रामपंचायतींमधील राजकीय स्थितीचे चित्र स्पष्ट होणार आहे. १४ ग्रामपंचायती आधीच अविरोध झाल्या आहेत. 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतsarpanchसरपंच