शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
4
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
5
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
6
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
7
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
8
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
9
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
10
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
11
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
12
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
13
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
14
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
15
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
16
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
17
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
18
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
19
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
20
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
Daily Top 2Weekly Top 5

निवडणूक खर्च बाजार समित्यांच्याच माथी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2017 23:05 IST

सहकार विभागाच्या नव्या मसुद्याप्रमाणे बाजार समित्यांची निवडणूक राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण घेणार असले तरी निवडणुकांचा खर्च मात्र, बाजार समित्यांनाच करावा लागणार आहे.

ठळक मुद्देमसुद्यात नमूद : डबघाईस आलेल्या समित्यांची स्थिती अवघड

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : सहकार विभागाच्या नव्या मसुद्याप्रमाणे बाजार समित्यांची निवडणूक राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण घेणार असले तरी निवडणुकांचा खर्च मात्र, बाजार समित्यांनाच करावा लागणार आहे. आता निवडणुकांचा खर्च कित्येक पटीने वाढणार असल्याने डबघाईस आलेल्या बाजार समित्यांना आगामी निवडणुका अवघड जागेचे दुखणे ठरणार आहेत.सहकार विभागाने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत किमान १० आर जमीन धारणा असलेल्या शेतकºयांना मताधिकार दिलेला आहे. याची अधिसूचना काढली व आता निवडणुकीची नियमावली राजपत्रात जाहीर केली. यावर ३० नोव्हेंबरपर्यंत पणन संचालकाकडे आक्षेप मागविले आहेत. थेट जनतेमधून निवडून आलेले नगराध्यक्ष व सरपंचासाठी इतर पक्षाच्या तुलनेत सत्तापक्षाला अधिक कौल मिळाल्याने भाजपने सहकारातही चंचुप्रवेशासाठी अधिनियमात बदल केला. आता शेतकºयांना बाजार समित्यांमध्ये मताधिकार दिल्याने आगामी निवडणुकांत शेतकरी मतदारसंघ वाढणार आहे. त्यासाठीची क्लिष्ट प्रक्रिया जिल्हाधिकाºयांच्या देखरेखीत पार पडणार आहे.शासनाने शेतकºयांना मताधिकार दिल्याने प्रस्थापितांचा एकाधिकार मोडीत निघणार आहे. मतदार बदलामुळे निवडणुकांचा नवीन मसुदा आता राज्य शासनाने तयार केला आहे. त्यानुसार राज्य सहकारी प्राधिकरणाकडे बाजार समिती निवडणुकीची जबाबदारी सोपविली आहे. शासनाच्या या बदलामुळे आता बाजार समिती निवडणुकांचा खर्च वाढणार आहे. तो खर्च बाजार समित्यांनाच करावा लागणार आहे.उत्पन्नाचे साधन तोकडेजिल्ह्यात अमरावती, अचलपूर, दर्यापूर व धामणगाव वगळता उर्वरित बाजार समित्यांची आर्थिक स्थिती जेमतेमच आहे. त्यामुळे निवडणुकीचा वाढीव खर्च करणे आता बाजार समित्यांच्या आवाक्याबाहेरचे झाले आहे. यापूर्वी एक लाखाच्या निवडणूक खर्चाचीही तरतूद नसल्यामुळे तिवसा बाजार समितीची निवडणूक होऊ शकली नव्हती. परिणामी या ठिकाणी दोन वर्षे प्रशासकीय राजवट होती. आता हा खर्च पाच लाखांवर पोहोचणार आहे. त्या तुलनेत या बाजार समित्यांजवळ उत्पन्नाचे साधन तोकडे असल्यामुळे आगामी निवडणूक खर्चाचा डोलारा कसा सांभाळावा, असा या बाजार समित्यांसमोर उभा ठाकला आहे.-तर समिती सदस्य ठरणार अपात्रज्या व्यक्तीला न्यायालयाने दोषी ठरविले व या अपराधासाठी सहा महिन्यांपेक्षा अधिक मुदतीची शिक्षा न्यायालयाने दिली, तसेच वयाचे २१ वर्षे पूर्ण व्हायचे आहे ती विकल मनाची असल्याचे न्यायालयाने घोषित केले आहे. ती अमुक्त व नादान आहे. ती व्यक्ती बहिरी व मुकी आहे वा बाजार समितीची थकबाकीदार आहे. बाजार समिती किंवा शासनाची कर्मचारी आहे. त्या व्यक्तीचा किंवा भागिदारीत प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष बाजार समितीच्या रोजगारात वा हितसंबध आहे, त्यांनी अधिनियमाचा अधिक वेळा भंग केला वा विक्रेते, अडत्याला रकमा प्रदान करण्यास कसूर केल्या ती अपात्र ठरेल. आहे.