शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
3
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
4
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
5
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
6
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
7
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
8
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
9
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
10
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
11
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
12
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
13
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
14
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
15
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
16
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
17
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
18
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट
19
अरे बापरे! डोक सटकलं आणि गेम झोनच्या कर्मचाऱ्याचे नाक युवकाने हातोड्याने फोडले
20
११ कोटींची लॉटरी जिंकणारा 'तो' व्यक्ती अखेर सापडला! रस्त्यावर विकत होता कांदे-बटाटे अन्...

‘एक पेड मेेरे माॅं के नाम’, देशात १४० कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प

By गणेश वासनिक | Updated: June 23, 2024 15:13 IST

केंद्र शासनाची भारतीयांना साद, सुखाची सावली अन् आईचं झाड

अमरावती : तुम्हाला मायेची ऊब हवी तर मग आईच्या नावे प्रत्येक भारतीयाने एक वृक्ष लावावा आणि त्याला जगवावे. कारण पर्यावरणाचा होणारा ऱ्हास रोखण्यासाठी केंद्र शासनाने १४० कोटी जनतेच्या खांद्यावर १४० कोटी वृक्ष लागवडीची जबाबदारी सोपवली आहे. ‘एक पेड मेरे माॅं के नाम’ ही संकल्पना राबविण्याचा निर्धार सोडला आहे. आईच्या नावाने लावलेले झाड भविष्यात मुलांना नक्कीच सुखाची सावली देईल, यात दुमत नाही.

पावसाळा आला की, शासनाला वृक्ष लागवडीची आठवण येते. कारण राज्यात दरवर्षी ५० कोटी वृक्ष लागवडीचा ध्यास असला, तरी यंदा महाराष्ट्र वृक्ष लागवडीमध्ये कमालीचा माघारलेला आहे. दर्जेदार रोपे तयार करण्यासाठी वन विभाग अथवा सामाजिक वनीकरण विभागाच्या रोपवाटिकेला आवश्यक तेवढा निधी महसूल विभाग देत नसल्याची ओरड आहे. गेल्या ३ वर्षांपासून मग्रारोहयो कामाचा जवळपास ५ कोटींचा निधी अद्यापही मिळालेला नाही. असे असताना महसूल विभाग रोपे तयार करण्याची सक्ती वन विभागावर करताना दिसून येतो. जिल्हा परिषद, पंचायत समिती दरवर्षी वृक्ष लागवड करतात. मात्र त्यातील किती वृक्ष जिवंत राहतात, याबाबत लक्ष देण्याची गरज आहे.

एक पेड मेरे माॅं के नामकेंद्र शासनाच्या पर्यावरण वने आणि हवामान बदल विभागाचे सचिव लीला नंदन यांनी देशात नवीन योजना सुरू केली आहे. भारताची लोकसंख्या १४० कोटी असताना तेवढीच झाडे लागावी, याकरिता ‘एक पेड मेरे माॅं के नाम’ याला वृक्ष रोपवनाशी जोडलेले आहे. देशातील सर्व विभाग, स्वयंसेवी संस्थांना या मोहिमेत सहभागी केले जाईल. यंदा १४० कोटी वृक्ष या माध्यमातून देशात लावले जाणार आहेत.

संरक्षण दलाला देणार मोफत वृक्षपोलिस, संरक्षण दल यांच्याकडे मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ, जमीन आहे. मात्र आर्थिक तरतूद नसल्याने पोलिस व संरक्षण दलाला किमान ५ हजार रोपे मोफत देण्याचा मानस वन विभागाचा आहे. पर्यावरणाचा समतोल साधण्याकरिता अशा विभागांच्या पडिक जमिनीत वृक्ष लागवड झाल्यास रोपवनांचे टार्गेट पूर्ण होणार असल्याबाबतची शक्कल लढवली जात आहे.