शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
4
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
5
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
6
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
7
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
8
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
9
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
10
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
11
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

‘एक पेड मेेरे माॅं के नाम’, देशात १४० कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प

By गणेश वासनिक | Updated: June 23, 2024 15:13 IST

केंद्र शासनाची भारतीयांना साद, सुखाची सावली अन् आईचं झाड

अमरावती : तुम्हाला मायेची ऊब हवी तर मग आईच्या नावे प्रत्येक भारतीयाने एक वृक्ष लावावा आणि त्याला जगवावे. कारण पर्यावरणाचा होणारा ऱ्हास रोखण्यासाठी केंद्र शासनाने १४० कोटी जनतेच्या खांद्यावर १४० कोटी वृक्ष लागवडीची जबाबदारी सोपवली आहे. ‘एक पेड मेरे माॅं के नाम’ ही संकल्पना राबविण्याचा निर्धार सोडला आहे. आईच्या नावाने लावलेले झाड भविष्यात मुलांना नक्कीच सुखाची सावली देईल, यात दुमत नाही.

पावसाळा आला की, शासनाला वृक्ष लागवडीची आठवण येते. कारण राज्यात दरवर्षी ५० कोटी वृक्ष लागवडीचा ध्यास असला, तरी यंदा महाराष्ट्र वृक्ष लागवडीमध्ये कमालीचा माघारलेला आहे. दर्जेदार रोपे तयार करण्यासाठी वन विभाग अथवा सामाजिक वनीकरण विभागाच्या रोपवाटिकेला आवश्यक तेवढा निधी महसूल विभाग देत नसल्याची ओरड आहे. गेल्या ३ वर्षांपासून मग्रारोहयो कामाचा जवळपास ५ कोटींचा निधी अद्यापही मिळालेला नाही. असे असताना महसूल विभाग रोपे तयार करण्याची सक्ती वन विभागावर करताना दिसून येतो. जिल्हा परिषद, पंचायत समिती दरवर्षी वृक्ष लागवड करतात. मात्र त्यातील किती वृक्ष जिवंत राहतात, याबाबत लक्ष देण्याची गरज आहे.

एक पेड मेरे माॅं के नामकेंद्र शासनाच्या पर्यावरण वने आणि हवामान बदल विभागाचे सचिव लीला नंदन यांनी देशात नवीन योजना सुरू केली आहे. भारताची लोकसंख्या १४० कोटी असताना तेवढीच झाडे लागावी, याकरिता ‘एक पेड मेरे माॅं के नाम’ याला वृक्ष रोपवनाशी जोडलेले आहे. देशातील सर्व विभाग, स्वयंसेवी संस्थांना या मोहिमेत सहभागी केले जाईल. यंदा १४० कोटी वृक्ष या माध्यमातून देशात लावले जाणार आहेत.

संरक्षण दलाला देणार मोफत वृक्षपोलिस, संरक्षण दल यांच्याकडे मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ, जमीन आहे. मात्र आर्थिक तरतूद नसल्याने पोलिस व संरक्षण दलाला किमान ५ हजार रोपे मोफत देण्याचा मानस वन विभागाचा आहे. पर्यावरणाचा समतोल साधण्याकरिता अशा विभागांच्या पडिक जमिनीत वृक्ष लागवड झाल्यास रोपवनांचे टार्गेट पूर्ण होणार असल्याबाबतची शक्कल लढवली जात आहे.