शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

‘टॉप अप मॉडेल’ प्रभावीपणे राबवा, राज्याच्या प्रधान सचिवांचे निर्देश

By गणेश वासनिक | Updated: February 13, 2024 19:15 IST

राज्य शासनाच्या २८ जुलै २०२३ च्या निर्णयानुसार वनीकरण आणि मृद व जलसंधारण कामांसाठी टॉप अप मॉडेलला मंजुरी देण्यात आली आहे.

अमरावती : राज्यात वनीकरण, मृद व जलसंधारण कामांसाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनांचे अभिसरण करून योजनेंतर्गत फरकाची रक्कम अदा करण्याचे प्रारूप (टॉप अप मॉडेल) प्रभावीपणे राबवा, असे निर्देश राज्याच्या महसूल व वने विभागाचे प्रधान सचिवांनी दिले आहेत. त्याअनुषंगाने वनविभागाचे प्रधान मुख्य वनसंरक्षकांना पत्र पाठविण्यात आले आहे.

राज्य शासनाच्या २८ जुलै २०२३ च्या निर्णयानुसार वनीकरण आणि मृद व जलसंधारण कामांसाठी टॉप अप मॉडेलला मंजुरी देण्यात आली आहे. मात्र अभिसरण योजनेला वनखात्यातून प्रचंड विरोध होत आहे. वनाधिकारी-कर्मचारी ही योजना राबविण्यास नकारघंटा देत आहे. तथापि, काहीही झाले तरी अभिसरण योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी झालीच पाहिजे, असे निर्देश प्रधान सचिव (वने) बी. वेणुगोपाल रेड्डी यांनी दि. १२ फेब्रुवारी २०२४ रोजी प्रधान मुख्य वनसंरक्षक शैलेश टेभुर्णीकर यांच्या नावे जारी केल्याने एकच तारांबळ उडाली आहे. मात्र, टॉप अप मॉडेल हे यंदापासून नव्याने अंमलबजावणी करण्यात येणार आहे. यात वनविभाग, नियोजन विभाग (रोहयो यंत्रणा), ग्रामविकास आणि पंचायत राज विभाग आदी विभागांचा सहभाग असणार आहे.अभिसरण योजनेसाठी या महत्त्वाचा मुद्द्यांवर आहे फोकस- टॉप अप मॉडेलमध्ये कामांचे ठराव घेणे-मजुरांचा समावेश करून ग्रामपंचायतींकडून मंजूर करणे- ग्रामपंचायतीची तातडीने ग्रामसभा घेणे.- मुख्य वनसंरक्षक / वनसंरक्षक यांनी कामांचा दररोज आढावा घेणे- पुरक लेबर बजेटमध्ये प्रस्तावित रोपवन कामे करणे- मोठी रोपे लागवडीसाठी वापरण्याची जबाबदारी वृत्त प्रमुखांवर असेल.- अभिसरण योजनेची धुरा सामाजिक वनीकरण विभागाकडे- दर आठवड्याला किमान दोन वेळा आढावा घेणे, क्षेत्रीय भेटी घेऊन मार्गदर्शन करणे.- या योजनेच्या अंमलबजावणीसाठी आराखडा तयारकरून ऑनलाइनप्रणाली विकसित करणे.- विहित कालमर्यादेत प्रभावी अंमलबजावणीसाठी एसओपी तयार करणे.वन बल प्रमुखांचा अहवालाकडे दुर्लक्षअभिसरण योजनेच्या अभ्यासासाठी नेमलेल्या समितीकडून प्राप्त अहवालाच्या अनुषंगाने वनबल प्रमुख शैलेश टेंभुर्णीकर यांनी प्रधान सचिव रेड्डी यांना सुयोग्य असा अहवाल सादर केला आहे. चालू आर्थिक वर्षातील कालावधी लक्षात घेता योजनेंतर्गत प्राप्त अनुदान ‘टॉप अप मॉडेल’नुसार खर्ची घालणे घाईचे होईल, असे कळविले आहे. तरीही वन बलप्रमुखांचा अहवालाकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचे वास्तव आहे.

टॅग्स :Amravatiअमरावती