शहरं
Join us  
Trending Stories
1
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
2
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
3
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
4
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
5
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
6
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
7
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
8
बाबर आझम, मोहम्मद रिझवानचं T20 करियर संपलं? नव्या पाकिस्तानी कोचने संघातून काढलं बाहेर
9
अंधश्रद्धेचा कळस! ११ वर्षे मूल नाही, मांत्रिकाची महिलेला मारहाण; पाजलं घाणेरडं पाणी, झाला मृत्यू
10
नाशिकच्या सिडकोत भर रस्त्यात वृद्धाचा खुन; दहा दिवसांत दुसरी घटना 
11
Sonu Sood : बैल पाठवतो म्हटला होता, मदत केली का? नेटकऱ्याच्या प्रश्नावर सोनू सूदनं बँक स्टेटमेंट केलं शेअर
12
अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती
13
'पंचायत'च्या प्रधानजींचे होते विवाहबाह्य संबंध, 'या' अभिनेत्याच्या पत्नीसोबत चाललं अफेअर
14
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?
15
“हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका दुटप्पी”: हर्षवर्धन सपकाळ
16
भाजप आमदाराच्या मुलाच्या गाडीची दुचाकीला धडक; रुग्णालयात नेईपर्यंत तरुणाने सोडले प्राण
17
"जनसुरक्षा कायदा हा हुकूमशाहीचा परमोच्च बिंदू, फडणविसांचे हुकूमशाही मनसुबे हाणून पाडा", जनसुरक्षा कायद्याला काँग्रेसचा विरोध
18
MS धोनीच्या मार्गात आला अडथळा! Captain Cool Trademark अर्जावर आक्षेप, कारण...
19
म्हणे, यांना इंग्रजी येत नाही, त्यांच्या देशात परत पाठवा; ब्रिटिश महिलेची भारतीय कर्मचाऱ्यांवर आगपाखड
20
ट्रम्प टॅरिफचा बाजारावर परिणाम नाही? कोटक महिंद्रात सर्वाधिक वाढ, तर घसरणाऱ्यांमध्ये टाटाचा शेअर

समाज ऋणाच्या उत्तराईसाठी आलो शिक्षण क्षेत्रात

By admin | Updated: May 22, 2016 00:11 IST

लहानपणापासूनच समाजासाठी काहीतरी विशेष करावे, असे वाटत होते.

प्रवीण पोटे : पीआर पोटे ग्रुप आॅफ इंन्स्टिट्युटमधील विद्यार्थ्यांचा गौरवअमरावती : लहानपणापासूनच समाजासाठी काहीतरी विशेष करावे, असे वाटत होते. शिक्षणक्षेत्रात गेले नऊ वर्षे कसे गेले हे कळलेच नाही सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी व समाजाच्या उत्तरदायीत्वासाठी शिक्षणक्षेत्रात आपणं कार्य करीत असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी केले.ते येथील सांस्कृतिक भवन येथे शनिवारी पीआर पोटे पाटील ग्रृप आॅफ इन्स्टिट्यूशनतर्फे आयोजित आॅफर लेटर डिस्ट्रीब्युशन समारंभाप्रसंगी बोलत होते. यावेळी पालकंमंत्र्यांनी विद्यार्थ्यांशी दिलखुलास चर्चा केली. ते म्हणाले, चांगला विद्यार्थी घडावा तो देशाचा चांगला नागरिक व्हावा यासाठी वेळप्रसंगी विद्यार्थ्यांना शिक्षा केली असेल त्याला प्रसादही मिळाला असेल. परंतु आज जे महाविद्यालयातून विद्यार्थी घडत आहेत त्यांना देशातील व विदेशातील अनेक नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंट मिळत आहे. ज्या विद्यार्थ्याला सहजस्थितीत नोकरीची गरज नसेल त्यांनी प्रशासकीय सेवेकडे वळावे व अमरावतीच्या मातीचे नाव मोठे करावे महाराष्ट्रात चांगले बदल घडवून आणायचे असेल तर या मातीतील विद्यार्थी पुढे आले पाहिजे. यावेळी व्यासपीठावर पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक, पीआर पोटे ग्रुपचे उपाध्यक्ष दिलीप निंभोरकर, संचालक डि.जी. वाकोडे, प्राचार्य एस.डी. वाकोडे, उपप्राचार्य महंमद झुयर, मोनिका उपाध्य आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी यावेळी पोलीस आयुक्त दत्तात्रेय मंडलिक यांनी विद्यार्थ्यांना मौलिक मागदर्शन करून देशाचे चांगले नागरिक होण्याचे आवाहन त्यांनी केले. २३९ विद्यार्थ्यांना नामांकित कंपनीत रोजगाराची संधी महाविद्यालयाने उपलब्ध करून दिली आहे. यावेळी या विद्यार्थ्यांना आॅफर लेटर डिस्ट्रीब्यूशन देऊन गौरविण्यात आले. यावेळी अनेक प्राध्यापकांचा सत्कारही करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन सागर सोनखासकर, स्नेहा पांडे, आभार प्रशांत ठोंबरे यांनी केले. यावेळी सर्व प्राध्यापक वृंद, कर्मचारी व विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)मी दहावीत सहावेळा शाळा बदलणारा नामवंत विद्यार्थी माझे शिक्षण अतिशय मजेशीर झाले. विरंगुळा करीत ना. पोटे म्हणाले, वडिलांच्या नोकरीच्या बदलीमुळे का होेईना दहावीत शिक्षण घेताना सहा शाळा बदलाव्या लागल्या. नंतर मी सातारा येथे सैनिकी स्कूलमध्ये शिकलो. असा मी नामवंत विद्यार्थी होतो. आज हा विद्यार्थी महाराष्ट्रात नामवंत ठरला आहे. यावर उपस्थितांमध्ये हास्याचे फवारे उडाले. जिद्द व चिकाटीने आपणही कुठलेही यश संपादन करू शकता, असा मौलिक सल्ला व विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारा संदेशच त्यांनी उपस्थिताना दिला.