शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

रानभाज्या खा, प्रतिकारशक्ती वाढवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:16 IST

अमरावती : प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी व सुदृढ शरीरासाठी आहारात निरनिराळ्या भाज्यांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. या पार्श्वभूमीवर नव्या पिढीला रानभाज्यांची ...

अमरावती : प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी व सुदृढ शरीरासाठी आहारात निरनिराळ्या भाज्यांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. या पार्श्वभूमीवर नव्या पिढीला रानभाज्यांची ओळख करून देणारा महोत्सव महत्त्वपूर्ण असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी शनिवारी येथे केले.

कृषी विभागातर्फे जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सवाचा शुभारंभ पालकमंत्री ठाकूर यांच्या हस्ते १४ ऑगस्ट रोजी वलगाव येथील सिकची सभागृहात झाला, त्यावेळी त्या बोलत होत्या. याप्रसंगी आमदार सुलभा खोडके, आ. रवि राणा, माजी खासदार अनंत गुढे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष विठ्ठल चव्हाण, जिल्हाधिकारी पवनीत कौर, सीईओ अविश्यांत पंडा, जयंत देशमुख, हरिभाऊ मोहोड, जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी विजय चवाळे, अनिल खर्चान उपस्थित होते.

ग्रामीण भागात नैसर्गिकरीत्या रानभाज्या उपलब्ध होतात. त्यातून ग्रामीण नागरिकांना उत्पन्नाचे साधन उपलब्ध व्हावे, यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला आहे. अलीकडच्या काळात वाढत चाललेल्या जंक फूडच्या सवयींमुळे प्रतिकारशक्ती कमी होते. त्यामुळे अनेकदा शहरांमध्येही कुपोषण आढळून येते. आहारातील भाज्यांचे महत्व ओळखून आता महिला व बाल विकास विभागातर्फे परसबाग उपक्रम हाती घेण्यात आला आहे. भाज्यांचे महत्त्व नव्या पिढीच्या मनावर बिंबवण्यासाठी अंगणवाडीला जोडून परसबाग उपक्रम राबविण्यात येत असल्याचे पालकमंत्र्यानी सांगितले. आ. खोडके, आ. राणा, अनंत गुढे यांनीही यावेळी मार्गदर्शन केले.

बॉक्स

महोत्सवात ५९ रानभाज्यांचा समावेश

रानभाजी महोत्सवात मेळघाटसह विविध तालुक्यांतील शेतकऱ्यांनी सहभाग घेतला. रानावनात नैसर्गिकरीत्या रुजलेल्या मायाळू, मटारू, राजगिरा, पुदिना, केणा, पाथरी, आघाडा, गुळवेल, ओवा, वावडिंग, शेवगा, तरोटा, तांदुळजा, बेलफळ, जिवती, कवठ, करवंद, रानकेळी, बांबू, कर्टुले, शतावरी, भुईआवळा, सुरण, अरबी, कमळकाकडी, कपाळफोडी, उंबर आदी ५९ रानभाज्यांचे २८३ नमुने सादर करण्यात आले.