शहरं
Join us  
Trending Stories
1
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे उत्तर
2
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
3
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
4
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
5
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
6
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
7
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
8
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
9
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
10
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
11
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
12
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
13
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
14
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
15
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
16
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळायला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
17
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
18
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
19
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
20
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...

रानभाज्या खा अन् निरोगी राहा, मेळघाटसह जिल्ह्यात ६६ रानभाज्यांची नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:16 IST

रानभाज्या खा अन् निरोगी राहा….. मेळघाटसह जिल्ह्यात ६६ रानभाज्यांची नोंद अनिल कडू परतवाडा : सातपुड्याच्या कुशीत कोरकू आदिवासी बांधवांचे ...

रानभाज्या खा अन् निरोगी राहा…..

मेळघाटसह जिल्ह्यात ६६ रानभाज्यांची नोंद

अनिल कडू

परतवाडा : सातपुड्याच्या कुशीत कोरकू आदिवासी बांधवांचे वसतिस्थान असलेल्या मेळघाट या समृद्ध वन्यप्रदेशासह जिल्ह्यात एकूण ६६ रानभाज्यांची नोंद घेण्यात आली आहे.

परतवाडा येथील आयुर्वेद रत्न आणि सेवानिवृत्त वनक्षेत्रपाल तथा औषधी वनस्पतीसह रानभाज्यांचे अभ्यासक रा. भ. गिरी यांनी या ६६ रानभाज्यांची नोंद केली आहे. यात पानभाज्या, फुलभाज्या, शेंगभाज्या, फळभाज्या यांचा समावेश आहे.

आरोग्यदायी रानभाज्या ऋतुमानानुसार सहज उपलब्ध होतात. निसर्गाचा हा समृद्ध ठेवा आहे. या रानभाज्यांमध्ये लोह, तंतुमय पदार्थ व इतर खनिजे आणि अनेक औषधी गुणधर्म असतात. निसर्गतः उगवलेल्या या रानभाज्या प्रदूषणमुक्त ठरतात. रानभाज्यांच्या सेवनामुळे शरीराला दीर्घकाळ आरोग्यदायी लाभ होतात.

पाऊस सुरू झाला की, रानावनात जंगलात शेताच्या बांधावर गावाशेजारी या रानभाज्या उगवू लागतात. पावसाळ्यात रानभाज्यांची चंगळ राहते. नैसर्गिक पद्धतीने उगवलेल्या प्रदूषणमुक्त या भाज्या आरोग्यासाठी चांगल्या राहतात. या भाज्या खायलाही रुचकर लागतात. वर्षभर मेथी, शेपू, पालक, कोबी, फ्लॉवर, तोंडली, कारले, भोपळा, वांगी खाणाऱ्यांनाही या रानभाज्या हव्या असतात. पण, रानभाज्यांची ओळख नसल्यामुळे ते त्यापासून दूर राहतात. मेळघाटातील आदिवासी बांधव आणि गावपातळीवरील जुनी मंडळी व जाणकार आजही या भाज्यांचे नियमित सेवन करतात.

दरम्यान, कर्टुली, अंबाडी, लाल अंबाडी, भारंगी, तरोटा, अळू, वाघाटे, बांबू, शमी, उंबर, पाथर, मालकांगुनी,सुरण, पांढरी मुसळी, शेवगा, भोकर, आघाडा, जिवतीची फुले या रानभाज्यांची ओळख प्रसंगानुरूप सर्वांनाच आहे.

या रानभाज्यांना राजाश्रय देण्याचा कृषी विभागाने प्रयत्न चालविला आहे. रानभाज्यांची लोकांना ओळख व्हावी. त्याचे महत्त्व पटावे. रान भाज्यांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी, याकरिता रानभाज्यांचे मार्केटिंग करण्याचा निर्णय राज्य शासनाच्या कृषी विभागाने घेतला आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात ९ ऑगस्ट या जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून रानभाजी महोत्सव ठीक ठिकाणी कृषी विभागाकडून भरवला जात आहे.

--- या रानभाज्या आपल्याला ठावूक आहेत का?---

* वाघाटी-- हा एक वेल असून, त्याच्या कोवळ्या फळांची भाजी आषाढी एकादशीच्या दुसऱ्या दिवशी खाण्याची प्रथा आहे. आषाढी एकादशीला वाघाटीचा मान आहे. ती एक रोगप्रतिकारक शक्ती वाढविणारी रानभाजी आहे.

* आघाडा-- आघाडा पावसाळ्यात जंगलात व शिवारात आपोआप उगवून वर येतो. आघाड्याच्या कोवळ्या पाल्याची भाजी करतात. आघाड्यात झिंक, तांबे, कॅल्शियम भरपूर प्रमाणात आहे. आघाड्यात हाडे मजबूत करायचे गुण आहेत. मधुमेहींसाठीही आघाडा उपयुक्त आहे.

* केना--- विड्याच्या पानाच्या आकाराची, परंतु थोडी लहान वनस्पती पावसाळ्यात उगवते. केनाच्या पानांची भजी किंवा भाजी करतात. या भाजीमुळे पचन क्रिया होऊन पोट साफ होते. लघवी साफ होण्यास मदत होते. त्वचाविकार, सूज आदी विकार कमी होतात.

* तरोटा-- पावसाळ्यात हा तरोटा उगवतो. या तरोट्याच्या कोवळ्या पानांची भाजी करतात. मेथीच्या भाजी सारखी ती लागते. पुढे याला पिवळी फुले येतात आणि बारीक करंगळीसारख्या शेंगा लागतात. तेव्हा या पानांची भाजी केल्या जात नाही. बियांपासून कॉफी, लाडू तसेच खाद्यरंगही बनवतात. तरोटा चर्मरोगावर अत्यंत उपयुक्त आहे. अंगाला येणारी खाज, सर्व प्रकारची खरूज, बारक्या गाठी याच्या सेवनाने नाहीशा होतात. पानांची भाजी शरीरातील वात व कफदोष कमी करतात. पित्तज, हृदयविकार, श्वास, खोकला यात पानांचा रस मधातून देतात.

* कर्टुले -- कर्टुले/कटुले ही सुद्धा रानभाजी आहे. पावसाळ्यात जंगलात नैसर्गिकपणे वेल उगवतात. कर्टुल्याची फळ श्रावण भाद्रपद महिन्यात विकायला येतात. या कर्टुल्याची भाजी करतात. कर्टुले/ कटुले हे औषधी गुणांनी युक्त आहेत. यात मोठ्या प्रमाणात विटामिन्स, मिनरल्स आणि फायबर उपलब्ध आहेत. मधुमेहामध्ये या भाजीचे नियमित सेवन केल्यास रक्तातील साखर कमी होते.

* शेवगा - शेवग्याची पाने, शेंगा, फुले, मूळ उपयुक्त आहेत. हा वार्षिक वृक्ष आहे. शेवग्याच्या कोवळ्या पानांची व शेंगांची भाजी करतात. शेवग्यामध्ये दुधाच्या चौपट कॅल्शियम, संत्र्याच्या सहापट जीवनसत्व व केळाच्या तीन पट पोटॅशियम तसेच लोह व प्रथिने असतात. शारीरिक व मानसिक थकवा, जडपणा या भाजीने कमी होतो. यामध्ये जंतुनाशक गुणधर्म असून मधुमेह व उच्च रक्तदाबावर शेवगा उपयुक्त आहे.

* अळू- अळू,आरवी व धोपा या नावानेही ओळखले जाते. ही एक रानभाजी असून अळूच्या पानांची भाजी करतात. आळुच्या पानाच्या वड्याही करतात. अळू ही औषधी वनस्पती आहे.

* या रानभाज्या झाल्या दुर्मीळ--

-- जिवतीची फुले :- ही एक रानभाजी आहे. ती बहुतांश भागातून नष्ट झालेली आहे. काही ठराविक भागातच ती आढळून येते. या दुर्मीळ अशा फुलांची भाजी केली जाते. औषधी गुणधर्मयुक्त या जिवतीच्या फुलांचा टॉनिक म्हणून वापर केला जातो. चवनप्राशमध्ये त्याचा वापर होतो.

*-- सफेद मुसळी-- ही औषधी युक्त शक्तिवर्धक रानभाजी जंगलातून जवळपास नाहीशी झाली आहे. शिवारात काही लोक त्याचे पीक घेतात. सफेद मुसळीच्या कोवळ्या पानांची भाजी करतात.

* कडुसले - ही एक दुर्मीळ, शिवारात आढळणारी रानभाजी आहे. कारल्याप्रमाणे त्याची भाजी करतात. मधुमेहामध्ये साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्याकरिता त्याचा उपयोग होतो. कडुसले ही रानभाजी तणनाशकाच्या फवारणीमुळे जवळजवळ नष्ट झाली आहे.

* कोट-

शक्तिवर्धक रानभाज्या

सफेद मुसळी, घोटवेल शक्तिवर्धक असून मालकांगणी बुद्धिवर्धक आहे. वाघाटी रोगप्रतिकारक शक्ती वाढविते. कर्टुले डायबिटीजवर उपयुक्त आहेत. कंदही औषधी गुणधर्मांनी युक्त आहे. कर्टुल्यात मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन, मिनरल्स व फायबर आहेत. सर्वच रानभाज्या आरोग्यदायी आहेत. रानभाज्यांमध्ये लोह, तंतुमय पदार्थ, व इतर खनिजे आणि औषधी गुणधर्म आहेत.

- रा.भ. गिरी, आयुर्वेदरत्न सेवानिवृत्त वनाधिकारी.