शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
3
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
4
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
5
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
6
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
7
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
8
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
9
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
10
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
11
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
12
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
13
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
14
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
15
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
16
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
17
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
18
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
19
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
20
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे

३ जानेवारीला पृथ्वीचे सूर्यापासून सर्वांत कमी अंतर; खगोलतज्ज्ञांची माहिती

By गजानन उत्तमराव मोहोड | Updated: December 29, 2023 20:29 IST

मानवी जीवनावर कोणताही अनिष्ट परिणाम नाही

अमरावती : पृथ्वी सूर्याभोवती फिरते; परंतु अचूक वर्तुळाकार मार्गाने फिरत नाही तर लंब वर्तुळाकार मार्गाने फिरत असते. कधी सूर्यापासून लांब असते, तर कधी सूर्यापासून जवळ असते. साधारणपणे ३ जानेवारीदरम्यान पृथ्वी ही सूर्यापासून सर्वांत कमी अंतरावर असते. हे अंतर १४.७१ कोटी कि.मी. राहत असल्याची माहिती खगोलतज्ज्ञांनी दिली.

नेहमी हे अंतर सरासरी १५ कोटी किमीदरम्यान असते. या दिवशी पृथ्वी जुलै महिन्याच्या तुलनेत ५० लाख कि.मी.ने सूर्याच्या जवळ राहणार आहे. पृथ्वी व सूर्य यांच्यातील अंतर कमी असण्याच्या घटनेला ‘उपसूर्य’ असे म्हणतात. सूर्य हा तप्त वाळूचा गोळा असून यामध्ये हायड्रोजनपासून हेलियम बनण्याची क्रिया अहोरात्र सुरू राहते. सूर्याच्या केंद्रामध्ये एका सेकंदात ६५ कोटी ७० लाख टन हायड्रोजन जळतो व त्यापासून ६५ कोटी २५ लाख हेलियम तयार होते.

हा शोध सन १९३९ मध्ये हॅन्स बेथ या वैज्ञानिकाने लावला. सूर्यावर ज्या भागावर तापमान कमी होते त्या भागावर सौर डाग पडतात. या डागाचे चक्र ११ वर्षांचे असते. या डागाचा शोध सन १९८३ मध्ये श्वाबे नावाच्या वैज्ञानिकांनी लावला आहे. या डागाचे आतापर्यंत २३ चक्र पूर्ण झाले. फेब्रुवारी २००८ पासून २४ वे चक्र सुरू झाले आहे. या खगोलीय घटनेचा मानवी जीवनावर कोणताही परिणाम होणार नसल्याची माहिती मराठी विज्ञान परिषदेचे विभागीय अध्यक्ष प्रवीण गुल्हाने व हौशी खगोल अभ्यासक विजय गिरुळकर यांनी दिली.सूर्याचे आयुष्य १० अब्ज वर्षे

सूर्याला आकाशगंगेच्या मध्याभोवती एक चक्कर मारण्यास २२५ दशलक्ष वर्षे लागतात. सूर्य हा आकाशगंगेच्या मध्याभोवती २५० किमी प्रति सेकंद या वेगाने फिरत आहे. आजपर्यंत सूर्याचे २० चक्कर पूर्ण झाले. सूर्याचे वय निश्चित करणारे पहिले वैज्ञानिक सर आर्थर एडिंग्टन आहेत. सूर्याचे एकूण आयुष्य १० अब्ज वर्षे आहे, त्यापैकी पाच अब्ज वर्षे संपले आहेत. म्हणजेच पाच अब्ज वर्षांनी सूर्याचा मृत्यू हा श्वेत व बटू ताऱ्यात होईल.

टॅग्स :Earthपृथ्वी