शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

ई-वन वाघीण, मृत शोभाराम आणि राजकारण !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2019 06:00 IST

ब्रह्मपुरी येथील जंगलातून दोन महिन्यांपुर्वी मेळघाटातील डोलार जंगलात आणलेल्या या वाघिणीच्या दहशतीखाली ४० खेडी जगत होती. कधी लहान बालकास, कधी शेळी, गुरेढोरे यांच्यावर हल्ले करता-करता शुक्रवारी वाघिणीने चक्क मनुष्यवधाचा गुन्हा केला .

ठळक मुद्देदोन महिन्यांची दहशत संपुष्टात : आदिवासींनी घेतला मोकळा श्वास

श्यामकांत पाण्डेय ।लोकमत न्यूज नेटवर्कधारणी : मेळघाटातील राजकीय वातावरण सध्या इ-वन वाघिणीच्या हल्ल्यात ठार झालेल्या शोभाराम चव्हाण यांच्या मृत्यूने चांगलेच तापले आहे. मृताच्या परिजनांना राजकारण्यांनी काय दिले, हे गेल्या तीन दिवसांत कळेनासे झाले आहे. तरीसुद्धा जे काही करण्यात आले, ते केवळ आमच्या म्हणण्यानुसार झाले, याचे श्रेय घेण्यावरून राजकीय पुढाऱ्यांचे वक्तव्य सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.दादरा येथील शोभाराम कालुसिंग चव्हाण हा ३० आॅगस्टच्या रात्री सवंगड्यांसह शेतातील कामे आटोपून रात्री ८ वाजता आपल्या घराकडे निघाला होता. मात्र, ही रात्र त्याच्यासाठी शेवटची रात्र ठरणार, याची कल्पनाही त्याला नव्हती. काही अंतरावर असलेले गाव डोळ्यांसमोर दिसत असतानाच रस्त्याच्या बाजूने ई-वन वाघिणीने शोभारामवर हल्ला केला. त्याला वाचवण्यासाठी गेलेल्या दिलीप सरदार चव्हाण यालासुद्धा वाघिणीने गंभीर जखमी केले. मानव आणि प्राणी यांच्या या युद्धात शोभारामला जीव गमवावा लागला आणि दिलीप चव्हाण हा अमरावती येथील रुग्णालयात उपचार घेत आहे.ब्रह्मपुरी येथील जंगलातून दोन महिन्यांपुर्वी मेळघाटातील डोलार जंगलात आणलेल्या या वाघिणीच्या दहशतीखाली ४० खेडी जगत होती. कधी लहान बालकास, कधी शेळी, गुरेढोरे यांच्यावर हल्ले करता-करता शुक्रवारी वाघिणीने चक्क मनुष्यवधाचा गुन्हा केला . ही वाघीण मेळघाटातील जंगलातून बाहेर निघावी, यासाठी माजी आमदार राजकुमार पटेल यांनी शासनाला सात दिवसाची अल्टिमेटम देताच प्रशासन जागे झाले. परंतु, तोपर्यंत फार उशीर झाला होता. वनविभागाला अशा घटनेची प्रतीक्षाच होती, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. शोभाराम चव्हाण यांच्या मृत्यूनंतर अमरावतीच्या खासदार नवनीत राणा, मेळघाटचे आमदार प्रभुदास भिलावेकर, माजी आमदार केवलराम काळे आणि राजकुमार पटेल यांच्यासह युवक काँग्रेसचे पंकज मोरे यांनी मृताच्या कुटुंबाला भेट देऊन जणू आपणच त्यांचे खरे पालक आहोत, या तºहेने ते प्रसिद्धी माध्यमांसमोर आले.राजकारणाला रंगतअवघ्या काही दिवसांवर विधानसभा निवडणुकीची निवडणूक आयोगाकडून घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये आपण किती मोठ्या प्रमाणात सक्रिय आहोत, हे दाखविण्यासाठी वाघिणीच्या प्रकरणात आपले अस्तित्व सर्व राजकीय नेत्यांनी आपापल्या परीने दाखविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. खºया अर्थाने मेळघाटातील राजकारणाला रंगत चढली.उशिराचे शहाणपणई-वन वाघीण, मृत शोभाराम आणि राजकारण याची सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा गाजत आहे. या प्रकरणात आपणच सर्वात मोठी भूमिका बजावली, याचे श्रेय घेण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. मानवाचा जीव राजकारणापेक्षा मोठा नाही, हे कधी उमगेल ?

टॅग्स :Tigerवाघ