शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

तक्रारींचे निराकरण करणे हेच पोलिसांचे कर्तव्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2019 01:44 IST

नागरिकांच्या तक्रारींचे निराकरण करणे, त्यांना समस्यांतून मुक्त करणे, तक्रारींच्या अनुषंगाने त्यांचे समाधान करणे हेच पोलिसांचे कर्तव्य आहे. त्या पद्धतीने पोलीस यंत्रणेला सूचना देऊ. अशा पद्धतीने पोलिसांनी कामे केल्यास नागरिकांचा पोलिसांविरुद्ध रोष राहणार नाही.

ठळक मुद्देमकरंद रानडे : अतिसंवेदनशील परिसराकडे विशेष लक्ष ठेवणार

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : नागरिकांच्या तक्रारींचे निराकरण करणे, त्यांना समस्यांतून मुक्त करणे, तक्रारींच्या अनुषंगाने त्यांचे समाधान करणे हेच पोलिसांचे कर्तव्य आहे. त्या पद्धतीने पोलीस यंत्रणेला सूचना देऊ. अशा पद्धतीने पोलिसांनी कामे केल्यास नागरिकांचा पोलिसांविरुद्ध रोष राहणार नाही. पोलिसांची प्रतिमा मलीन होणार नाही, असे मत नवनियुक्त विशेष पोलीस महानिरीक्षक मकरंद रानडे यांनी माध्यमांसमोर व्यक्त केले.आयजी मकरंद रानडे यांनी एम.कॉम.चे शिक्षण पूर्ण केल्यानंतर मराठवाड्यातील आंध्रा बँकेत कर्तव्य बजावले. पिंपरी चिचवड येथे दहा महिने अपर पोलीस आयुक्तपद भूषविले. तत्पूर्वी त्यांनी राज्यातील १० प्रमुख युनिटची धुरा सांभाळली होती. नाशिक, पुणे, मुंबई, रायगड, सिंधुदुर्ग, नागपूरनंतर पुणे व पिंपरी चिचवड येथील पोलीस विभागात कर्तव्य बजावले.मकरंद रानडे हे १९८८ मध्ये डीवायएसपी पदावर रुजू झाले. त्यानंतर सेवाज्येष्ठतेनुसार त्यांना २००२ मध्ये आयपीएसचा दर्जा प्राप्त झाला. नाशिक येथील कुंभमेळ्यातील सुरक्षेची जबाबदारी रानडे यांनी पार पाडली. तेथील सुरक्षेविषयी रानडे यांना दोन वेळा बोलाविण्यात आले होते. २००४ मध्ये रानडे यांना राष्ट्रपती पदकाने भूषविण्यात आले. त्यांना पोलीस महासंचालक आणि भारत सरकारचे बोधचिन्ह मिळाले. पुणे येथील पिंपरी चिंचवड येथून पदोन्नत बदली होऊन मकरंद वानखडे यांनी नुकताच अमरावती परिक्षेत्रात विशेष पोलीस महानिरीक्षक पदभार स्वीकारला.अमरावती परिक्षेत्रातील पाचही जिल्ह्यांचा आढावा घेऊन, विविध पोलीस ठाण्यांना व अधिकाऱ्यांना भेटी देऊन, कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचे प्रयत्न मकरंद रानडे हे करणार आहेत. प्रलंबित प्रकरणांकडे विशेष लक्ष देऊन, ती निकाली काढण्यास प्राधान्य राहणार आहे.नागरिक न्यायाच्या अपेक्षेने पोलिसांकडे येतात. त्यांना सौजन्यपूर्ण वागणूक देणे, त्यांची समस्या ऐकून त्याचे निराकरण करणे, याबाबत दखल घेऊ. नागरिकांचे समाधान करण्याकडे लक्ष दिले जाईल. नागरिकांच्या तक्रारींचे निराकरण करून त्यांना न्याय दिल्यास ते समाधानी होतात. त्यावेळी पोलिसांची प्रतिमा उंचावते, असे मत स्पेशल आयजी मकरंद रानडे यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केले.सर्व जिल्ह्यांना भेटी देऊन संवेदनशील परिसराकडे विशेष लक्ष दिले जाईल, असे ते म्हणाले.

टॅग्स :Policeपोलिस