शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
2
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
3
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
4
Stock Market Today: १७८ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकमध्ये जोरदार तेजी, FMGC आपटले
5
नियंत्रण कक्षात आला एक फोन कॉल; अवघ्या १२ मिनिटांत पोलिस पोहचले अन् मिळालं जीवदान
6
टॅरिफवर ट्रम्प यांचा आणखी एक यु-टर्न; आता 'या'वरील आयात शुल्क कमी करण्याची घोषणा
7
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
8
Akshaya Tritiya 2025: सोन्याची किंमत पाहून फुटतोय घाम? 'हा' आहे २४ कॅरेट सोनं स्वस्तात खरेदी करायचा जुगाड
9
भरत जाधवचं 'सही रे सही' नाटक कधी निरोप घेणार? केदार शिंदे म्हणाले, "ज्या दिवशी तो..."
10
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
11
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
12
शाहरुख, सलमान की आमिर- कोणासोबत काम करायला जास्त आवडतं?; परेश रावल म्हणाले...
13
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
14
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
15
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
16
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
17
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
18
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
19
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
20
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या

तक्रारींचे निराकरण करणे हेच पोलिसांचे कर्तव्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2019 01:44 IST

नागरिकांच्या तक्रारींचे निराकरण करणे, त्यांना समस्यांतून मुक्त करणे, तक्रारींच्या अनुषंगाने त्यांचे समाधान करणे हेच पोलिसांचे कर्तव्य आहे. त्या पद्धतीने पोलीस यंत्रणेला सूचना देऊ. अशा पद्धतीने पोलिसांनी कामे केल्यास नागरिकांचा पोलिसांविरुद्ध रोष राहणार नाही.

ठळक मुद्देमकरंद रानडे : अतिसंवेदनशील परिसराकडे विशेष लक्ष ठेवणार

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : नागरिकांच्या तक्रारींचे निराकरण करणे, त्यांना समस्यांतून मुक्त करणे, तक्रारींच्या अनुषंगाने त्यांचे समाधान करणे हेच पोलिसांचे कर्तव्य आहे. त्या पद्धतीने पोलीस यंत्रणेला सूचना देऊ. अशा पद्धतीने पोलिसांनी कामे केल्यास नागरिकांचा पोलिसांविरुद्ध रोष राहणार नाही. पोलिसांची प्रतिमा मलीन होणार नाही, असे मत नवनियुक्त विशेष पोलीस महानिरीक्षक मकरंद रानडे यांनी माध्यमांसमोर व्यक्त केले.आयजी मकरंद रानडे यांनी एम.कॉम.चे शिक्षण पूर्ण केल्यानंतर मराठवाड्यातील आंध्रा बँकेत कर्तव्य बजावले. पिंपरी चिचवड येथे दहा महिने अपर पोलीस आयुक्तपद भूषविले. तत्पूर्वी त्यांनी राज्यातील १० प्रमुख युनिटची धुरा सांभाळली होती. नाशिक, पुणे, मुंबई, रायगड, सिंधुदुर्ग, नागपूरनंतर पुणे व पिंपरी चिचवड येथील पोलीस विभागात कर्तव्य बजावले.मकरंद रानडे हे १९८८ मध्ये डीवायएसपी पदावर रुजू झाले. त्यानंतर सेवाज्येष्ठतेनुसार त्यांना २००२ मध्ये आयपीएसचा दर्जा प्राप्त झाला. नाशिक येथील कुंभमेळ्यातील सुरक्षेची जबाबदारी रानडे यांनी पार पाडली. तेथील सुरक्षेविषयी रानडे यांना दोन वेळा बोलाविण्यात आले होते. २००४ मध्ये रानडे यांना राष्ट्रपती पदकाने भूषविण्यात आले. त्यांना पोलीस महासंचालक आणि भारत सरकारचे बोधचिन्ह मिळाले. पुणे येथील पिंपरी चिंचवड येथून पदोन्नत बदली होऊन मकरंद वानखडे यांनी नुकताच अमरावती परिक्षेत्रात विशेष पोलीस महानिरीक्षक पदभार स्वीकारला.अमरावती परिक्षेत्रातील पाचही जिल्ह्यांचा आढावा घेऊन, विविध पोलीस ठाण्यांना व अधिकाऱ्यांना भेटी देऊन, कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचे प्रयत्न मकरंद रानडे हे करणार आहेत. प्रलंबित प्रकरणांकडे विशेष लक्ष देऊन, ती निकाली काढण्यास प्राधान्य राहणार आहे.नागरिक न्यायाच्या अपेक्षेने पोलिसांकडे येतात. त्यांना सौजन्यपूर्ण वागणूक देणे, त्यांची समस्या ऐकून त्याचे निराकरण करणे, याबाबत दखल घेऊ. नागरिकांचे समाधान करण्याकडे लक्ष दिले जाईल. नागरिकांच्या तक्रारींचे निराकरण करून त्यांना न्याय दिल्यास ते समाधानी होतात. त्यावेळी पोलिसांची प्रतिमा उंचावते, असे मत स्पेशल आयजी मकरंद रानडे यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केले.सर्व जिल्ह्यांना भेटी देऊन संवेदनशील परिसराकडे विशेष लक्ष दिले जाईल, असे ते म्हणाले.

टॅग्स :Policeपोलिस