शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
2
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
3
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
4
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
5
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
6
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
7
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
8
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
9
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
10
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
11
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
12
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
13
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
14
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
15
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
16
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
17
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
18
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
19
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
20
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा

तक्रारींचे निराकरण करणे हेच पोलिसांचे कर्तव्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2019 01:44 IST

नागरिकांच्या तक्रारींचे निराकरण करणे, त्यांना समस्यांतून मुक्त करणे, तक्रारींच्या अनुषंगाने त्यांचे समाधान करणे हेच पोलिसांचे कर्तव्य आहे. त्या पद्धतीने पोलीस यंत्रणेला सूचना देऊ. अशा पद्धतीने पोलिसांनी कामे केल्यास नागरिकांचा पोलिसांविरुद्ध रोष राहणार नाही.

ठळक मुद्देमकरंद रानडे : अतिसंवेदनशील परिसराकडे विशेष लक्ष ठेवणार

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : नागरिकांच्या तक्रारींचे निराकरण करणे, त्यांना समस्यांतून मुक्त करणे, तक्रारींच्या अनुषंगाने त्यांचे समाधान करणे हेच पोलिसांचे कर्तव्य आहे. त्या पद्धतीने पोलीस यंत्रणेला सूचना देऊ. अशा पद्धतीने पोलिसांनी कामे केल्यास नागरिकांचा पोलिसांविरुद्ध रोष राहणार नाही. पोलिसांची प्रतिमा मलीन होणार नाही, असे मत नवनियुक्त विशेष पोलीस महानिरीक्षक मकरंद रानडे यांनी माध्यमांसमोर व्यक्त केले.आयजी मकरंद रानडे यांनी एम.कॉम.चे शिक्षण पूर्ण केल्यानंतर मराठवाड्यातील आंध्रा बँकेत कर्तव्य बजावले. पिंपरी चिचवड येथे दहा महिने अपर पोलीस आयुक्तपद भूषविले. तत्पूर्वी त्यांनी राज्यातील १० प्रमुख युनिटची धुरा सांभाळली होती. नाशिक, पुणे, मुंबई, रायगड, सिंधुदुर्ग, नागपूरनंतर पुणे व पिंपरी चिचवड येथील पोलीस विभागात कर्तव्य बजावले.मकरंद रानडे हे १९८८ मध्ये डीवायएसपी पदावर रुजू झाले. त्यानंतर सेवाज्येष्ठतेनुसार त्यांना २००२ मध्ये आयपीएसचा दर्जा प्राप्त झाला. नाशिक येथील कुंभमेळ्यातील सुरक्षेची जबाबदारी रानडे यांनी पार पाडली. तेथील सुरक्षेविषयी रानडे यांना दोन वेळा बोलाविण्यात आले होते. २००४ मध्ये रानडे यांना राष्ट्रपती पदकाने भूषविण्यात आले. त्यांना पोलीस महासंचालक आणि भारत सरकारचे बोधचिन्ह मिळाले. पुणे येथील पिंपरी चिंचवड येथून पदोन्नत बदली होऊन मकरंद वानखडे यांनी नुकताच अमरावती परिक्षेत्रात विशेष पोलीस महानिरीक्षक पदभार स्वीकारला.अमरावती परिक्षेत्रातील पाचही जिल्ह्यांचा आढावा घेऊन, विविध पोलीस ठाण्यांना व अधिकाऱ्यांना भेटी देऊन, कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचे प्रयत्न मकरंद रानडे हे करणार आहेत. प्रलंबित प्रकरणांकडे विशेष लक्ष देऊन, ती निकाली काढण्यास प्राधान्य राहणार आहे.नागरिक न्यायाच्या अपेक्षेने पोलिसांकडे येतात. त्यांना सौजन्यपूर्ण वागणूक देणे, त्यांची समस्या ऐकून त्याचे निराकरण करणे, याबाबत दखल घेऊ. नागरिकांचे समाधान करण्याकडे लक्ष दिले जाईल. नागरिकांच्या तक्रारींचे निराकरण करून त्यांना न्याय दिल्यास ते समाधानी होतात. त्यावेळी पोलिसांची प्रतिमा उंचावते, असे मत स्पेशल आयजी मकरंद रानडे यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केले.सर्व जिल्ह्यांना भेटी देऊन संवेदनशील परिसराकडे विशेष लक्ष दिले जाईल, असे ते म्हणाले.

टॅग्स :Policeपोलिस